शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
4
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
5
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
6
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
7
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
8
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
9
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
10
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
11
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
12
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
13
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
14
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
15
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
16
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
17
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
18
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
19
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
20
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 

४० हेक्टरवर वृक्ष लागवडीचे लक्ष्य

By admin | Updated: June 5, 2014 01:22 IST

शहरांच्या विकासासाठी नेहमीच वृक्षांच्या बुंध्यांवर कुºहाडीचे घाव घातले जात असताना, नाशिक जिल्ह्यात कोटींच्या वृक्ष लागवडीचे लक्ष्य साध्य करीत असताना, ८० टक्के रोपे जगली आहेत.

 

नरेश हाळणोर

नाशिक दळणवळणाच्या सोयीसुविधा अन् शहरांच्या विकासासाठी नेहमीच वृक्षांच्या बुंध्यांवर कुºहाडीचे घाव घातले जात असताना, नाशिक जिल्ह्यात कोटींच्या वृक्ष लागवडीचे लक्ष्य साध्य करीत असताना, गेल्या वर्षीच्या लागवडीपैकी ८० टक्के रोपे जगली आहेत. ही बाब पर्यावरणाच्या दृष्टीने दिलासादायक असून, यंदाही ४० हेक्टर जागेवर सुमारे सव्वा लाखापेक्षा अधिक रोपांची लागवड केली जाणार आहे. राज्य शासनाने शंभर कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य गेल्या दोन वर्षांपासून निश्चित केले आहे. ज्यावर्षी हे लक्ष्य निश्चित केले नेमक्या त्याच २०१२ यावर्षी पावसाने दगा दिला आणि तयार केलेली रोपेच वाचविण्यासाठी शासनाच्या सामाजिक वनीकरण विभागाला झटावे लागले. गेल्या वर्षी मात्र पर्जन्यमान चांगले राहिल्याने जिल्ह्यातील वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट साध्य करता आले. असे असले तरी एकदा वृक्ष लागवड केल्यानंतर त्यांच्या निगराणीची समस्या शासनासमोर होती. त्यासाठी अभिनव उपक्रम राबवित रोपे जगविण्याची जबाबदारीच संबंधित यंत्रणा, ग्रामपंचायती, वनविभाग, वनीकरण, पालिकांच्या उद्यान कर्मचार्‍यांवर सोपविण्यात आली होती. त्यामुळे गेल्या वर्षी लागवड करण्यात आलेल्या रोपांपैकी ८० टक्के रोपे तगली असल्याचे सामाजिक वनीकरणाच्या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. दरम्यान, यंदाही उत्तम पाऊसपाणी होण्याचा अंदाज व्यक्त केला जात असल्याने जिल्ह्यामध्ये सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून सुमारे एक लाख ३० हजार रोपांची लागवड ४० हेक्टर जमिनीवर केली जाणार आहे. याशिवाय प्रत्येक तालुक्यातील काही ग्रामपंचायतींच्या माध्यमातून वृक्ष लागवड करण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले आहे. सामाजिक वनीकरणाकडे सद्यस्थितीत १४ लाख ३० हजार रोपे असून, यातील सव्वा लाख रोपांची ४० हेक्टर जमिनीवर लागवड केली जाणार आहे, तर उर्वरित १३ लाख रोपांची लागवड शासकीय कार्यालये, महामंडळ, औद्योगिक वसाहतींमध्ये केली जाणार आहे.