शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

४० हेक्टरवर वृक्ष लागवडीचे लक्ष्य

By admin | Updated: June 5, 2014 01:22 IST

शहरांच्या विकासासाठी नेहमीच वृक्षांच्या बुंध्यांवर कुºहाडीचे घाव घातले जात असताना, नाशिक जिल्ह्यात कोटींच्या वृक्ष लागवडीचे लक्ष्य साध्य करीत असताना, ८० टक्के रोपे जगली आहेत.

 

नरेश हाळणोर

नाशिक दळणवळणाच्या सोयीसुविधा अन् शहरांच्या विकासासाठी नेहमीच वृक्षांच्या बुंध्यांवर कुºहाडीचे घाव घातले जात असताना, नाशिक जिल्ह्यात कोटींच्या वृक्ष लागवडीचे लक्ष्य साध्य करीत असताना, गेल्या वर्षीच्या लागवडीपैकी ८० टक्के रोपे जगली आहेत. ही बाब पर्यावरणाच्या दृष्टीने दिलासादायक असून, यंदाही ४० हेक्टर जागेवर सुमारे सव्वा लाखापेक्षा अधिक रोपांची लागवड केली जाणार आहे. राज्य शासनाने शंभर कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य गेल्या दोन वर्षांपासून निश्चित केले आहे. ज्यावर्षी हे लक्ष्य निश्चित केले नेमक्या त्याच २०१२ यावर्षी पावसाने दगा दिला आणि तयार केलेली रोपेच वाचविण्यासाठी शासनाच्या सामाजिक वनीकरण विभागाला झटावे लागले. गेल्या वर्षी मात्र पर्जन्यमान चांगले राहिल्याने जिल्ह्यातील वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट साध्य करता आले. असे असले तरी एकदा वृक्ष लागवड केल्यानंतर त्यांच्या निगराणीची समस्या शासनासमोर होती. त्यासाठी अभिनव उपक्रम राबवित रोपे जगविण्याची जबाबदारीच संबंधित यंत्रणा, ग्रामपंचायती, वनविभाग, वनीकरण, पालिकांच्या उद्यान कर्मचार्‍यांवर सोपविण्यात आली होती. त्यामुळे गेल्या वर्षी लागवड करण्यात आलेल्या रोपांपैकी ८० टक्के रोपे तगली असल्याचे सामाजिक वनीकरणाच्या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. दरम्यान, यंदाही उत्तम पाऊसपाणी होण्याचा अंदाज व्यक्त केला जात असल्याने जिल्ह्यामध्ये सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून सुमारे एक लाख ३० हजार रोपांची लागवड ४० हेक्टर जमिनीवर केली जाणार आहे. याशिवाय प्रत्येक तालुक्यातील काही ग्रामपंचायतींच्या माध्यमातून वृक्ष लागवड करण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले आहे. सामाजिक वनीकरणाकडे सद्यस्थितीत १४ लाख ३० हजार रोपे असून, यातील सव्वा लाख रोपांची ४० हेक्टर जमिनीवर लागवड केली जाणार आहे, तर उर्वरित १३ लाख रोपांची लागवड शासकीय कार्यालये, महामंडळ, औद्योगिक वसाहतींमध्ये केली जाणार आहे.