शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

सर्वसामान्य ग्राहकांसाठी वरण स्वस्त, भात महाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 00:48 IST

यंदा देशात उडीद, मूग, तूर, हरभराच्या बंपर उत्पादनामुळे मागील वर्षाच्या तुलनेत डाळींचे भाव क्विंटलमागे ६०० ते तीन हजार रु पयांपर्यंत घसरले आहेत, तर बासमती तांदळाची वाढलेली निर्यात व अन्य भात पिकांचा उतारा घटल्याने तांदळाचे भाव क्विंटलमागे ५०० ते २००० हजार रु पयांनी दरम्यान वाढले आहेत. त्यामुळे यंदा वरण स्वस्त, तर भात महाग अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.

नाशिक : यंदा देशात उडीद, मूग, तूर, हरभराच्या बंपर उत्पादनामुळे मागील वर्षाच्या तुलनेत डाळींचे भाव क्विंटलमागे ६०० ते तीन हजार रु पयांपर्यंत घसरले आहेत, तर बासमती तांदळाची वाढलेली निर्यात व अन्य भात पिकांचा उतारा घटल्याने तांदळाचे भाव क्विंटलमागे ५०० ते २००० हजार रु पयांनी दरम्यान वाढले आहेत. त्यामुळे यंदा वरण स्वस्त, तर भात महाग अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. देशांतर्गत डाळींचे उत्पादन वाढविण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारने योजना विविध योजना आणल्या. त्यात पोषक वातावरणामुळे मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात व कर्नाटक या राज्यात मूग, उडीद पिकांचे भरघोस उत्पादन झाले आहे. सरकारकडे व व्यापारांकडे मागील वर्षीची तूरडाळ मोठ्या प्रमाणात शिल्लक असतानाच यावर्षीही मोठ्या प्रमाणात पीक आल्याने डाळींचे भाव गेल्या वर्षाच्या तुलनेत घसरले आहेत, तर सुगंध व चवीने खवय्यांना आकर्षित करणारा बासमतीला सध्या विदेशातून मोठी मागणी आहे. यात सर्वाधिक मागणी इराण, इराक, सौदी अरेबिया, संयुक्त अमिरातील या आखाती देशांतून होत आहे. इराणने या वर्षी बासमती तांदळाची आयात वाढविली आहे. त्याच-बरोबर, युरोपियन महासंघातील देश व अमेरिकाही मागील काही वर्षांच्या तुलनेत जास्त बासमती तांदूळ खरेदी करीत आहे. यामुळे बासमतीमध्ये मागील हंगामाच्या तुलनेत यंदा दोन हजार रु पयांपर्यंत भाववाढ झाली आहे. अस्सल बासमती सध्या दहा हजार ते आकरा हजार रु पये प्रति क्विंटलने विकला जात आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत बासमती तांदूळही एक ते दोन हजार रुपयांनी वधारला आहे. एप्रिल ते सप्टेंबर २०१७ या काळात देशातून ६३ लाख टन तांदळाची विक्र मी निर्यात झाली आहे, अशा परिस्थितीत भात (धान) उत्पादनात उतारा ३० टक्क्यांनी घसरला आहे. त्यामुळे देशात हंगामाच्या सुरु वातीलाच तांदळात क्विंटलमागे ५०० ते २००० रु पयांपर्यंत भाववाढ झाल्याने गेल्या दोन वर्षांपूर्वी सर्वसामन्यांच्या ताटातून हद्दपार झालेले वरण स्वस्त झाले आहे. त्यामुळे रोजच्या आहारातील भात मात्र महागला असला तरी यावर्षी गव्हाचे दर स्थिर असून, साखरीचे दर तीन ते चार रुपयांनी घसरल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये तांदूळ दरवाढीमुळे निर्माण झालेली नाराजी काही अंशी कमी झाल्याची दिसून येत आहे.साखर घसरली, तेल वधारलेअन्नधान्यासह यावर्षी इतर मालाच्या भावातही चढ-उतार झाले आहेत. यात प्रामुख्याने साखरीचे दर प्रतिकिलोला पाच ते सहा रुपयांनी घसरले आहेत, तर खाद्यतेलाचा १५ लिटरचा डबा ३० ते ४० रुपयांनी महागला आहे. थोडक्यात स्वयंपाकघरातील काही वस्तू महागल्या असल्या तरी काही वस्तू स्वस्त झाल्यामुळे गृहिनींना किचनचे बजट जुळविणे शक्य झाल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक