शहरं
Join us  
Trending Stories
1
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाचत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
2
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
3
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
4
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
5
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...
6
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
7
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
8
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
9
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
10
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
11
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
12
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
13
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
14
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
15
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
16
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
17
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
18
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
19
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
20
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस

सर्वसामान्य ग्राहकांसाठी वरण स्वस्त, भात महाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 00:48 IST

यंदा देशात उडीद, मूग, तूर, हरभराच्या बंपर उत्पादनामुळे मागील वर्षाच्या तुलनेत डाळींचे भाव क्विंटलमागे ६०० ते तीन हजार रु पयांपर्यंत घसरले आहेत, तर बासमती तांदळाची वाढलेली निर्यात व अन्य भात पिकांचा उतारा घटल्याने तांदळाचे भाव क्विंटलमागे ५०० ते २००० हजार रु पयांनी दरम्यान वाढले आहेत. त्यामुळे यंदा वरण स्वस्त, तर भात महाग अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.

नाशिक : यंदा देशात उडीद, मूग, तूर, हरभराच्या बंपर उत्पादनामुळे मागील वर्षाच्या तुलनेत डाळींचे भाव क्विंटलमागे ६०० ते तीन हजार रु पयांपर्यंत घसरले आहेत, तर बासमती तांदळाची वाढलेली निर्यात व अन्य भात पिकांचा उतारा घटल्याने तांदळाचे भाव क्विंटलमागे ५०० ते २००० हजार रु पयांनी दरम्यान वाढले आहेत. त्यामुळे यंदा वरण स्वस्त, तर भात महाग अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. देशांतर्गत डाळींचे उत्पादन वाढविण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारने योजना विविध योजना आणल्या. त्यात पोषक वातावरणामुळे मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात व कर्नाटक या राज्यात मूग, उडीद पिकांचे भरघोस उत्पादन झाले आहे. सरकारकडे व व्यापारांकडे मागील वर्षीची तूरडाळ मोठ्या प्रमाणात शिल्लक असतानाच यावर्षीही मोठ्या प्रमाणात पीक आल्याने डाळींचे भाव गेल्या वर्षाच्या तुलनेत घसरले आहेत, तर सुगंध व चवीने खवय्यांना आकर्षित करणारा बासमतीला सध्या विदेशातून मोठी मागणी आहे. यात सर्वाधिक मागणी इराण, इराक, सौदी अरेबिया, संयुक्त अमिरातील या आखाती देशांतून होत आहे. इराणने या वर्षी बासमती तांदळाची आयात वाढविली आहे. त्याच-बरोबर, युरोपियन महासंघातील देश व अमेरिकाही मागील काही वर्षांच्या तुलनेत जास्त बासमती तांदूळ खरेदी करीत आहे. यामुळे बासमतीमध्ये मागील हंगामाच्या तुलनेत यंदा दोन हजार रु पयांपर्यंत भाववाढ झाली आहे. अस्सल बासमती सध्या दहा हजार ते आकरा हजार रु पये प्रति क्विंटलने विकला जात आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत बासमती तांदूळही एक ते दोन हजार रुपयांनी वधारला आहे. एप्रिल ते सप्टेंबर २०१७ या काळात देशातून ६३ लाख टन तांदळाची विक्र मी निर्यात झाली आहे, अशा परिस्थितीत भात (धान) उत्पादनात उतारा ३० टक्क्यांनी घसरला आहे. त्यामुळे देशात हंगामाच्या सुरु वातीलाच तांदळात क्विंटलमागे ५०० ते २००० रु पयांपर्यंत भाववाढ झाल्याने गेल्या दोन वर्षांपूर्वी सर्वसामन्यांच्या ताटातून हद्दपार झालेले वरण स्वस्त झाले आहे. त्यामुळे रोजच्या आहारातील भात मात्र महागला असला तरी यावर्षी गव्हाचे दर स्थिर असून, साखरीचे दर तीन ते चार रुपयांनी घसरल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये तांदूळ दरवाढीमुळे निर्माण झालेली नाराजी काही अंशी कमी झाल्याची दिसून येत आहे.साखर घसरली, तेल वधारलेअन्नधान्यासह यावर्षी इतर मालाच्या भावातही चढ-उतार झाले आहेत. यात प्रामुख्याने साखरीचे दर प्रतिकिलोला पाच ते सहा रुपयांनी घसरले आहेत, तर खाद्यतेलाचा १५ लिटरचा डबा ३० ते ४० रुपयांनी महागला आहे. थोडक्यात स्वयंपाकघरातील काही वस्तू महागल्या असल्या तरी काही वस्तू स्वस्त झाल्यामुळे गृहिनींना किचनचे बजट जुळविणे शक्य झाल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक