शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

पाणी परवानगीचे गौडबंगाल, ५७९ शेतकऱ्यांचे अर्ज धूळखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 1:13 PM

घोटी : नाशिक पाटबंधारे विभागाने धरणांच्या लाभक्षेत्रातुन व पाणलोट क्षेत्रातून सिंचनासाठी शेतकऱ्यांना पाणी परवानगी अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.

ठळक मुद्देपाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष : नव्याने अर्जाच्या अटीमुळे शेतकरी संतप्त

घोटी : नाशिक पाटबंधारे विभागाने धरणांच्या लाभक्षेत्रातुन व पाणलोट क्षेत्रातून सिंचनासाठी शेतकऱ्यांना पाणी परवानगी अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. मात्र गेल्या वर्षी ५७९ शेतकºयांनी केलेल्या मागणी अर्जावर अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नसल्याचे गंभीर चित्र आहे. अर्ज सादर करूनही अद्याप पाणी परवानग्या दिल्या नसतांनाही एकीकडे परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन केल्याने शेतकºयांमध्ये संताप व्यक्त होत आहे.सुपिक जमिनी धरणासाठी संपादित झाल्याने शेतकºयांना उदरनिर्वाहाचा प्रश्न पडला. यानंतर झालेल्या धरणाच्या उंची वाढीसाठी भूसंपादन झाले. त्यामुळे अनेक कुटुंब पूर्णत: भूमिहीन झाले. काही शेतकºयांनी उरलेल्या माळरानावर उदनिर्वाहासाठी जमीन सपाटीकरण करून ओलिताखाली आणण्याचा प्रयत्न केला. गेल्यावर्षी नाशिक पाटबंधारे खात्याकडे सर्व कागदपत्रांची पूर्तता करु न पाणी परवानगीसाठी अर्ज केले. संबंधितांनी वेगवेगळ्या जाचक अटी लादत अनेक प्रकारचे कागदपत्र मागवले. यानंतर शेतकºयांनी सर्व अटी, शर्ती, कागदपत्रांची पूर्तता केली. तथापि पाटबंधारे विभागाने शेतकºयांना प्रतिक्षेतच ठेवले. प्रदीर्घ कालावधीनंतर काही शेतकºयांना ठराविक कालावधीसाठीच परवानग्या देण्यात आल्या. मात्र आता अनेक अर्जदार शेतकºयांनी पाटबंधारे विभागाकडे पाणी परवानगीसाठी वर्षापूर्वी अर्ज केले आहेत. शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पागेरे यांनी शेतकºयांच्या बैठका घेऊन २०१८ मध्ये सामुहिक पाणी परवानगीसाठी नाशिक पाटबंधारे विभागाकडे अर्ज सादर केले आहेत. मागणी अर्ज करून वर्ष झाले तरी यावर्षी नव्याने अर्ज करण्याचे विभागाने सांगितल्याने शेतकरी संतप्त झाले आहे.याप्रश्नी नवीन आमदार हिरामण खोसकर यांनी लक्ष घालून न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक