शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
5
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
6
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
7
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
8
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
9
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
10
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
11
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
12
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
13
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
14
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
15
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
16
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
17
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
18
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
19
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
20
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी

गंगापूर परिसर : गिरणारेजवळील इंदिरानगर गाळुंशीच्या लोकांची पाण्यासाठी भटकंती धरण उशाशी, कोरड घशाशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 00:35 IST

गंगापूर : तालुक्यातील इंदिरानगर गाळुंशीच्या ग्रामस्थांना कश्यपीसारख्या धरणाचा शेजार असूनही पाण्याविना वणवण भटकण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देइतरही मूलभूत सुविधा मिळत नसल्याने ग्रामस्थ त्रासले मूलभूत सुविधा पुरविता आल्या नसल्याचे चित्र

गंगापूर : तालुक्यातील इंदिरानगर गाळुंशीच्या ग्रामस्थांना कश्यपीसारख्या धरणाचा शेजार असूनही पाण्याविना वणवण भटकण्याची वेळ आली आहे. पाण्याबरोबरच इतरही मूलभूत सुविधा मिळत नसल्याने ग्रामस्थ त्रासले आहेत. ग्रामपंचायतीत म्हणणे ऐकून घेतले जात नसल्याचा आरोप पंचायतीच्या सदस्यांनी व ग्रामस्थांनी केला आहे. आरोग्य, पाणी, वीज अशा अनेक समस्यांनी ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.डोंगरावर वसलेल्या इंदिरानगर गाळुंशी गावाच्या पायथ्याशीच कश्यपी धरण असूनही गाव तहानलेले आहे. गिरणारेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या हे ग्रुप ग्रामपंचायतीचे गाव धोंडेगावपासून सन २०१६ मध्ये विभक्त होऊन नवीन ग्रामपंचायतीची स्थापना झाली. गावात दोन हजारांच्या आसपास लोकसंख्या असलेल्या या गावात सात ग्रामपंचायत सदस्य असूनदेखील शासनाच्या वतीने नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविता आल्या नसल्याचे चित्र या ठिकाणी दिसते आहे. महिलांना रोज सकाळी पहाटे ३ वाजता उठून दीड किलोमीटर पायी जाऊन पाण्यासाठी वणवण करावी लागते. शासनाच्या वतीने या गावात पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे. त्यात डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या विहिरीतून पाणी विद्युत मोटारीच्या सहाय्याने टाकीपर्यंत पोहोचवले जाते. परंतु विहिरीतच पाणी शिल्लकनसल्याने पाणी टाकीत जाणार कसे? असा प्रश्न ग्रामस्थांनी केला आहे. याबाबत शासनाच्या वतीने एकदाच कायमस्वरूपी व्यवस्था करावी जेणेकरून ग्रामस्थांना वारंवार या समस्यांना सामोरे जावे लागणार नाही, अशी मागणी पुढे येत आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्य हरी बेंडकोळी, वामन बेंडकोळी, पांडू पारधी, काशीनाथ येराळे, आभळू बेंडकोळी, निवृत्ती बेंडकोली आदी ग्रामस्थांनी आपली समस्या मांडली.