शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

डिस्टन्सिंगच्या नियमाचा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:35 IST

गोदावरीत मिसळतेय दूषित पाणी नाशिक : शहरातील विविध भागांमधून गोदावरी नदीपात्रात गटारीचे पाणी सोडले जात असल्याने गाेदावरीच्या प्रदूषणात वाढ ...

गोदावरीत मिसळतेय दूषित पाणी

नाशिक : शहरातील विविध भागांमधून गोदावरी नदीपात्रात गटारीचे पाणी सोडले जात असल्याने गाेदावरीच्या प्रदूषणात वाढ होत आहे. महापालिकेच्या संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष हाेत असल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. याबाबत संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

शेतकऱ्यांच्या भाजीपाला विक्री केंद्रांना प्रतिसाद

नाशिक : शहरातील विविध भागांमध्ये शेतकरी बचत गटांच्या माध्यमातून थेट ग्राहकांना भाजीपाला विक्री केली जात आहे. या केंद्रांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. ग्राहकांना रास्त दरात ताजा भाजीपाला मिळत असल्याने अनेक नागरिक या भाजीपाला विक्री केंद्रांवर जाऊन भाजी खरेदी करतात. यामुळे अनेक शेतकरी तरुणांना रोजगार प्राप्त झाला आहे.

होळकर पुलावर कचरा

नाशिक : होळकर पुलावर अनेक नागरिक निर्माल्य टाकत असल्याने या परिसराला कचराकुंडीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. मोकाट जनावरे हा कचरा अस्ताव्यस्त पसरवितात. यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरत आहे. येथे स्वच्छता करून निर्माल्य टाकण्यास प्रतिबंध करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

काजीपुऱ्यातील रुग्णालय उद‌्घाटनाच्या प्रतीक्षेत

नाशिक : जुन्या नाशिकमधील काजीपुरा भागात महापालिकेतर्फे उभारण्यात आलेले रुग्णालय गेल्या अनेक दिवसांपासून उद‌्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. आजी, माजी नगरसेवकांच्या श्रेयवादामुळे हे रुग्णालय अद्याप सुरू झाले नसल्याची चर्चा परिसरातील नागरिकांमध्ये होत आहे. याबाबत त्वरित निर्णय घेण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

धोका पत्करून भाजी विक्रीचा व्यवसाय

नाशिक : शहरातील रविवार कारंजा येथील यशवंत मंडई धोकादायक झाल्याने येथील सर्व गाळे रिकामे करण्यात आले आहेत. मात्र, अनेक भाजी विक्रेते धोका पत्करून या गाळ्यांच्या समोर बसून भाजी विक्रीचा व्यवसाय करत असल्याने भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत महापालिकेने योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

वाहतूक बेटांची दुरवस्था

नाशिक : शहरातील काही भागातील वाहतूक बेटांची दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी पालापाचोळा साचला असून, वाहतूक बेटांना बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात असून, बेटांची स्वच्छता करण्याची मागणी करण्यात येत आहे.

अवजड वाहनांची वर्दळ वाढली

नाशिक : अगर टाकळी परिसरातून अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे छोट्या वळणावर अनेकदा वाहतूक कोंडी होत आहे. मोठ्या वाहनांना वळण्यासाठी जागा अपुरी पडत असल्याचे दिसून येत आहे. या भागात अेनकवेळा लहान मुले रस्त्यावर खेळत असतात. यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत उपाययोजना करावी, अशी स्थानिकांची मागणी आहे.