शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

सटाण्यात राष्टवादीचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 01:01 IST

बागलाण तालुका त्वरित दुष्काळी जाहीर करावा, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी, शेतीपंपाची वीजबिले पूर्णपणे माफ करण्यात यावी, शेतीसिंचनासाठी वेळेवर आवर्तन देण्यात यावे, विजेचे भारनियम त्वरित रद्द करण्यात यावे, वाढती महागाई आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी या मागणीसाठी बागलाण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे बागलाण तहसील कार्यलयावर शनिवारी (दि.२७) मोर्चा काढण्यात आला.

सटाणा : बागलाण तालुका त्वरित दुष्काळी जाहीर करावा, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी, शेतीपंपाची वीजबिले पूर्णपणे माफ करण्यात यावी, शेतीसिंचनासाठी वेळेवर आवर्तन देण्यात यावे, विजेचे भारनियम त्वरित रद्द करण्यात यावे, वाढती महागाई आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी या मागणीसाठी बागलाण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे बागलाण तहसील कार्यलयावर शनिवारी (दि.२७) मोर्चा काढण्यात आला.बागलाण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे येथील शासकीय विश्रामगृहाच्या आवारात पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यानंतर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार , संजय चव्हाण, तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी, शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली बागलाण तहसील कार्यलयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चात केंद्र व राज्यातील भाजप शासनाविरु द्ध घोषणाबाजी करण्यात आली. मोर्चा तहसील आवारात येताच सभेत रु पांतर झाले. यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष अँड. रवींद्र पगार यांनी भाजप सरकार वर टीका केली. सत्तेत आल्यापासून भाजप सरकार शेतकरीविरोधी धोरण राबवित आहे. जिल्ह्यासह राज्यभरात दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. मात्र भाजपा सरकार जनतेची चेष्टा करीत आहे, असे ते म्हणाले. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना पालकत्व निभावता येत नाही. याकरिता पालकमंत्री जिल्ह्यातीलच असावा असे मत पगार यांनी व्यक्त केले.यावेळी तहसीलदार प्रमोद हिले यांना निवेदन देण्यात आले. मोर्चात गपूर मलिक शेख, राजेंद्र सोनवणे, यतिन पगार, खेमराज कोर, अधिक सावंत, संजय पवार, विजय वाघ, गटनेते काकाजी सोनवणे, जिभाऊ सोनवणे, डॉ. विठ्ठल येवलकर, रत्नाकर सोनवणे आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसdroughtदुष्काळFarmerशेतकरी