शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

मुक्तशिक्षणच राहणार शाश्वत : मुरलीधर चांदेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 01:27 IST

बदलत्या शिक्षणाच्या प्रवाहातून पूर्णवेळ शिक्षणाची संकल्पना कालबाह्य होणार असून, मुक्त शिक्षण हीच शाश्वत शिक्षणपद्धती अस्तित्वात राहणार आहे. पारंपरिक शिक्षण व्यवस्थेत पदवीपर्यंत पोहचणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होत असल्याने अशा विद्यार्थ्यांना मुक्त शिक्षणाचा प्रवाहात आणण्यासाठी मुक्त शिक्षणाचे सक्षम धोरण तितकेच महत्त्वाचे ठरणार असल्याचे प्रतिपादन अमरावती येथील संत गाडगेबाबा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी केले.

नाशिक : बदलत्या शिक्षणाच्या प्रवाहातून पूर्णवेळ शिक्षणाची संकल्पना कालबाह्य होणार असून, मुक्त शिक्षण हीच शाश्वत शिक्षणपद्धती अस्तित्वात राहणार आहे. पारंपरिक शिक्षण व्यवस्थेत पदवीपर्यंत पोहचणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होत असल्याने अशा विद्यार्थ्यांना मुक्त शिक्षणाचा प्रवाहात आणण्यासाठी मुक्त शिक्षणाचे सक्षम धोरण तितकेच महत्त्वाचे ठरणार असल्याचे प्रतिपादन अमरावती येथील संत गाडगेबाबा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी केले. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या २४व्या दीक्षान्त समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. विद्यापीठाच्या प्रांगणात झालेल्या या सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर, कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे, परीक्षा नियंत्रक डॉ. अर्जुन घाटुळे, व्यवस्थापन मंडळ सदस्य, विद्वत परिषदेचे सदस्य व नियोजन मंडळाचे सदस्य उपस्थित होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन होते. यावेळी सुमारे दीड लाख विद्यार्थ्यांना पदवी, तर १४ विद्यार्थ्यांना सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. प्रारंभी यशवंतराव चव्हाण यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.  यावेळी चांदेकर म्हणाले, औपचारिक विद्यापीठातून शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांपेक्षा मुक्त विद्यापीठातून पदवीेघेणारा विद्यार्थी नैतिकदृष्ट्या मोठा ठरतो. केवळ शिक्ष णपूर्ण करण्यासाठी विद्यार्थी विद्यापीठात दाखल होतो आणि शिक्षणपूर्ण करतो यातून त्याच्या शिक्षणाची गरज लक्षात येते. पारंपरिक विद्या पीठात मात्र सुमारे ७७ टक्क्के विद्यार्थी हे शिक्षणापासून दूर जात असल्याचे चित्र आहे. यातीलच काही मुले पुढे मुक्त शिक्षणाकडे वळत असल्यामुळे मुक्त शिक्षणाची कल्पना प्रभावी ठरते. त्यामुळेच बदलत्या शिक्षणव्यवस्थेत मुक्त शिक्षणाची व्यापकतादेखील साचेबद्ध कर ण्याची गरज असल्याचे चांदेकर म्हणाले. दूर शिक्षणामध्ये शिकण्यावर भर आहे, तर पारंपरिक शिक्षणामध्ये शिकविण्यावर भर आहे. या पद्धतीत विद्यार्थी शिकतोच हे सांगता येत नाही. परंतु दूरशिक्षणामध्ये विद्यार्थी शिक्षणासाठीच दाखल होतो ही मुक्त शिक्षणाची ताकत असल्याचे ते म्हणाले, आर्थिक व सामाजिक रचनेची व्यवस्था म्हणून मुक्त शिक्षणाकडे पाहण्याची गरज असल्याचेही चांदेकर म्हणाले.गेल्या दोन दशकांत दूरशिक्षण पद्धतीत नोंदणीचा दर १० टक्यांनी वाढला आहे. १९६२ मध्ये दूरशिक्षणाच्या माध्यमातून शिक्षण देणारी एकमेव संस्था होती. आज ही संख्या १००च्या वर गेली आहे.१४ विद्यार्थ्यांना सुवर्णपदकया समारंभात १४ विद्यार्थ्यांना १५ सुवर्णपदके देऊन गौरविण्यात आले. त्यात काजल ठाकूर (बी.ए.), स्वाती राहाटे (बी.लिब), वसुंधरा इगवे (वृत्तपत्रविद्या), मोनाली राळेकर (एमबीए), अफीरीन कवचाली (एम.कॉम.), वर्षा माळी (बी.कॉम.), स्मिता ढाकणे (बी.एड.), प्रियांका विसे (बी.एस्सी. अ‍ॅग्रीकल्चर/ हॉर्टिकल्चर), प्रकाश कामटे (बी.सी.ए.), कोमल जुनेजा (बी.एस्सी. - एच.एस.सी.एस), तौशीफ सामनानी (बी.एस्सी. एचटीएम), बीना शर्मा (बी.आर्च), शिखर सिंग (बी.टेक- मरीन इंजिनिअरिंग), वैष्णवी चाळके (बी.एस्सी. एमएलटी) यांचा ामावेश आहे.आॅनलाइन प्रमाणपत्र प्रणालीचे उद्घाटनउत्तीर्ण विद्यार्थ्यांना आपले प्रमाणपत्र आॅनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आले. या तांत्रिक सेवेचे लोकार्पण प्रा. राम ताकवले यांच्या हस्ते करण्यात आले.  या पदवीदान सोहळ्यात पदविका १५ हजार ६३२ पदविका तसेच ४३ विद्यार्थ्यांना विशेष पारितोषिके देऊन गौरविण्यात आले आहे.

टॅग्स :universityविद्यापीठ