शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
2
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
3
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
4
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
5
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
6
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
7
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
8
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
9
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
10
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
11
Marathi News LIVE: मुंबईकरांवर पाणीसंकट, १५ मेपासून १० टक्के पाणी कपातीचा निर्णय, जलाशयात घट
12
"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा टोला
13
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
14
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
15
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
16
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
17
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
18
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
19
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
20
Travel : कोकणचा किनारा अन् शांतता अथांग... गोवाही विसरायला लावतील महाराष्ट्रातील 'हे' ५ सुपरहिट बीचेस
Daily Top 2Weekly Top 5

सात लघुप्रकल्पांपैकी चार कोरडेठाक

By admin | Updated: January 3, 2017 23:23 IST

आरक्षण : बोरीअंबेदरी, साकूर, झाडी प्रकल्पांमधून पिण्यासाठी पाणी आरक्षित

मालेगाव : तालुक्यातील सात लघुप्रकल्पांपैकी केवळ तीनच लघुप्रकल्पांमध्ये जलसाठा शिल्लक आहे, तर चार प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. चणकापूर, गिरणा धरण व स्थानिक पाणीपुरवठा योजनांवरच भविष्यात तालुक्यातील गावांची तहान भागविली जाणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून मालेगाव तालुका सातत्याने दुष्काळाशी सामना करीत आहे. गेल्यावर्षी तालुक्यात ४३ गाव व वाड्यांना २१ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता. १९७२ प्रमाणे तालुक्यात पाणीटंचाईने कळस गाठला होता. ४३ ठिकाणी टँकरच्या दररोज ४९ फेऱ्या मारून पाणी पुरविले जात होते. सातही लघुप्रकल्प कोरडेठाक पडले होती. यंदा निसर्गाने साथ दिल्यामुळे सातही प्रकल्पांमध्ये पावसाळ्यात बऱ्यापैकी पाणी होते. यामुळे पाणीटंचाईबरोबरच शेती सिंचनाचा प्रश्नही काही अंशी मार्गी लागला होता. सद्यस्थितीत तालुक्यातील सात लघुप्रकल्पांपैकी दहिकुटे, लुल्ले, अजंग, दुंधे हे चार लघुप्रकल्प कोरडेठाक पडले आहेत, तर झाडी प्रकल्पात ७१ टक्के, साकूर ४१ टक्के, तर बोरीअंबेदरीत ६३ टक्के जलसाठा आहे. या पार्श्वभूमीवर येथील प्रांताधिकारी अजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सन २०१६-१७ या वर्षातील पिण्याच्या पाण्याचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. बोरीअंबेदरी प्रकल्पातून अस्तानेला ५, जळकूला ५, टिंघरीला २, वनपटला २, कंधाणेला २ असे एकूण २६ दलघफू, तर साकूर प्रकल्पातून साकूर गावासाठी एक दलघफू, झाडी प्रकल्पातून झाडी १०, मेहुणे ११, निमगाव ११ असे ३२ दलघफू पाणी आरक्षित करण्यात आले आहे. त्यामुळे या भागातील शेती सिंचनासाठी पाणी उपलब्ध होण्याची चिन्हे दिसत नाहीत. तसेच गिरणा व चणकापूर धरणावर तालुक्यातील काही गावांचा पाणीप्रश्न मार्गी लागणार आहे. तसेच माळमाथा पाणीपुरवठा योजना, २६ गाव पाणीपुरवठा योजना, ५६ खेडी पाणीपुरवठा या योजनांद्वारे तालुक्यातील गावांना पाणीपुरवठा केला जातो. स्थानिक ग्रामपंचायतींनीही स्वतंत्रपणे पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केल्या आहेत. भविष्यात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण होऊ नये यासाठी स्थानिक प्रशासनाने पाणी वापराचे काटेकोर नियोजन करणे तसेच धरणातील जलसाठ्याची चोरी होणार नाही याकडेही लक्ष देणे गरजेचे बनले आहे. (प्रतिनिधी)