शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

पूर : सर्व उपाय कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 00:26 IST

नाशिक : पावसाळ्यात नदीपात्रातील धोका लक्षात आल्यानंतर हा जोखीम कमी करण्यासाठी उपाययोजना आखण्यात आल्या खऱ्या परंतु त्यातील जवळपास एकही उपाय प्रत्यक्षात आलेला नाही. नदीप्रवाहाला अडथळा ठरणारे पूल आणि बंधारे कायम आहेत इतकेच नव्हे तर नदीपात्रातील गाळ काढण्याचे कामदेखील झालेले नाही. शहरातील चार प्रमुख नद्यांपैकी गोदावरी नदी सर्वांत मोठी आहे. पात्र छोटे असले तरी पुराचा सर्वाधिक धोका या नदीमुळेच आहे.

नाशिक : पावसाळ्यात नदीपात्रातील धोका लक्षात आल्यानंतर हा जोखीम कमी करण्यासाठी उपाययोजना आखण्यात आल्या खऱ्या परंतु त्यातील जवळपास एकही उपाय प्रत्यक्षात आलेला नाही. नदीप्रवाहाला अडथळा ठरणारे पूल आणि बंधारे कायम आहेत इतकेच नव्हे तर नदीपात्रातील गाळ काढण्याचे कामदेखील झालेले नाही. शहरातील चार प्रमुख नद्यांपैकी गोदावरी नदी सर्वांत मोठी आहे. पात्र छोटे असले तरी पुराचा सर्वाधिक धोका या नदीमुळेच आहे.नासर्डी-वालदेवीपासून तुलनात्मक धोका कमी आहे. वाघाडीला तरी नदीपेक्षा नालाच अधिक मानले जाते. त्यातच गोदावरी बारामाही आहे. २००८ मध्ये आलेल्या महापुरानंतर शेकडो मिळकती पूररेषेत आल्या. त्यावर मात करण्यासाठी आणि पुराचा वास्तविक धोका कमी करण्यासाठी महापालिकेच्या वतीने केंद्रशासनाच्या एका विभागामार्फत अहवाल तयार करून घेण्यात आला. २०११ मध्ये हा अहवाल महापालिककडे आला. त्यात बºयाच शिफारसी असल्या तरी नदीप्रवाहाला अवरोध होणारे अडथळे हटवावेत ही सूचना होती. त्यात आनंदवलीपासून होळकर पूल असे दोन प्रमुख बंधारे हटविणे अपेक्षित होते. परंतु आनंदवलीचा बंधारा हटला नाही. होळकर पुलाखाली बंधाºयाजवळ अत्यंत जुने गेट आहे, ते हटवून मॅकेनिकल स्वयंचलित गेट बसविण्याचे ठरविण्यात आले. रखडलेले हे काम महापालिका करूच शकली नाही, आता ते स्मार्ट सिटीकडून करून घेण्यात येणार आहे. या कामाच्या निविदा मंजूर झाल्यानंतरदेखील अद्याप या कामाला मुहूर्त लागलेला नाही. गंगापूररोडवरील जुन्या पंपिंग स्टेशनजवळ नदीपात्रात महापालिकेने जलवाहिनीच्या कामासाठी कॉफर डॅम (मातीचा बंधारा) बांधला होता. ही सर्व माती ‘जैसे थे’ असून, ती हटवावी अशी सूचना होती. परंतु त्यावरील कार्यवाहीदेखील झालेली नाही. गोदावरीच नव्हे तर नासर्डी नदीवरदेखील अनेक पूल हे कमी उंचीच्या अंतरावर आहेत. त्यामुळे प्रवाहाला अडथळे निर्माण होतात.पावसाळ्यात पूर आल्यानंतर आंनदवलीपासून पुढे होळकर पूल आणि कन्नमवार पूल वगळता सर्वच पुलांना पाणी लागल्याच्या किंवा पुलावरून पाणी गेल्याच्या घटना घडल्या आहेत. नासर्डी नदीवरदेखील सातपूर गाव, आयटीआय आणि उंटवाडी, मिलिंदनगर असे सर्व पूल पाण्याखाली जातात. अशावेळी हे सबमर्सिबल पूल हटवावेत, अशी एक सूचना होती. परंतु त्यावरदेखील कोणताही पूल हटविला गेलेला नाही. (क्रमश:)-------------गोदावरी नदीच्या पुरामुळे बुडणारे कमी अंतराचे पूल हटविण्याच्या सूचनेची अंमलबजावणी झाली नाहीच उलट आणखी पूल बांधले जात आहेत. गेल्या दीड वर्षांपासून नदीच्या पलीकडे म्हणजे मखमलाबाद शिवार, हनुमावाडी शिवारात कोणीही नागरी वसाहत नसताना दोन पूल बांधले जात आहेत. त्यातील एका १८ कोटी रुपयांच्या पुलास गेल्या आठवड्यात स्थायी समितीने मान्यता दिली. गोदावरी नदीवर पुलांची संख्या इतकी वाढत आहे की पुलांची नदी म्हणून ओळख निर्माण होऊ शकते, असे काही नागरिकांचे मत आहे.--------------त्या गेटला आता पावसाळ्यानंतरच मुहूर्तअहिल्या देवी होळकर पुलाखालील नवीन गेटच्या कामावरून स्मार्ट सिटी कंपनीत बरीच भवती न भवती झाली. आता त्याचे टेंडर मंजूर होऊनदेखील बरेच दिवस झाले. परंतु काम सुरू झालेले नाही. मेरीकडून संकल्प चित्र मंजूर करून घेण्यासाठी पाठपुरावा करीत असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. त्यामुळे आता पावसाळ्यानंतर हे काम सुरू होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Nashikनाशिक