शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
4
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
5
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
6
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
7
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
8
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
9
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
10
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
11
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
12
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
13
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
14
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
15
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
16
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
17
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
18
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
19
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
20
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान

पूर : सर्व उपाय कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 00:26 IST

नाशिक : पावसाळ्यात नदीपात्रातील धोका लक्षात आल्यानंतर हा जोखीम कमी करण्यासाठी उपाययोजना आखण्यात आल्या खऱ्या परंतु त्यातील जवळपास एकही उपाय प्रत्यक्षात आलेला नाही. नदीप्रवाहाला अडथळा ठरणारे पूल आणि बंधारे कायम आहेत इतकेच नव्हे तर नदीपात्रातील गाळ काढण्याचे कामदेखील झालेले नाही. शहरातील चार प्रमुख नद्यांपैकी गोदावरी नदी सर्वांत मोठी आहे. पात्र छोटे असले तरी पुराचा सर्वाधिक धोका या नदीमुळेच आहे.

नाशिक : पावसाळ्यात नदीपात्रातील धोका लक्षात आल्यानंतर हा जोखीम कमी करण्यासाठी उपाययोजना आखण्यात आल्या खऱ्या परंतु त्यातील जवळपास एकही उपाय प्रत्यक्षात आलेला नाही. नदीप्रवाहाला अडथळा ठरणारे पूल आणि बंधारे कायम आहेत इतकेच नव्हे तर नदीपात्रातील गाळ काढण्याचे कामदेखील झालेले नाही. शहरातील चार प्रमुख नद्यांपैकी गोदावरी नदी सर्वांत मोठी आहे. पात्र छोटे असले तरी पुराचा सर्वाधिक धोका या नदीमुळेच आहे.नासर्डी-वालदेवीपासून तुलनात्मक धोका कमी आहे. वाघाडीला तरी नदीपेक्षा नालाच अधिक मानले जाते. त्यातच गोदावरी बारामाही आहे. २००८ मध्ये आलेल्या महापुरानंतर शेकडो मिळकती पूररेषेत आल्या. त्यावर मात करण्यासाठी आणि पुराचा वास्तविक धोका कमी करण्यासाठी महापालिकेच्या वतीने केंद्रशासनाच्या एका विभागामार्फत अहवाल तयार करून घेण्यात आला. २०११ मध्ये हा अहवाल महापालिककडे आला. त्यात बºयाच शिफारसी असल्या तरी नदीप्रवाहाला अवरोध होणारे अडथळे हटवावेत ही सूचना होती. त्यात आनंदवलीपासून होळकर पूल असे दोन प्रमुख बंधारे हटविणे अपेक्षित होते. परंतु आनंदवलीचा बंधारा हटला नाही. होळकर पुलाखाली बंधाºयाजवळ अत्यंत जुने गेट आहे, ते हटवून मॅकेनिकल स्वयंचलित गेट बसविण्याचे ठरविण्यात आले. रखडलेले हे काम महापालिका करूच शकली नाही, आता ते स्मार्ट सिटीकडून करून घेण्यात येणार आहे. या कामाच्या निविदा मंजूर झाल्यानंतरदेखील अद्याप या कामाला मुहूर्त लागलेला नाही. गंगापूररोडवरील जुन्या पंपिंग स्टेशनजवळ नदीपात्रात महापालिकेने जलवाहिनीच्या कामासाठी कॉफर डॅम (मातीचा बंधारा) बांधला होता. ही सर्व माती ‘जैसे थे’ असून, ती हटवावी अशी सूचना होती. परंतु त्यावरील कार्यवाहीदेखील झालेली नाही. गोदावरीच नव्हे तर नासर्डी नदीवरदेखील अनेक पूल हे कमी उंचीच्या अंतरावर आहेत. त्यामुळे प्रवाहाला अडथळे निर्माण होतात.पावसाळ्यात पूर आल्यानंतर आंनदवलीपासून पुढे होळकर पूल आणि कन्नमवार पूल वगळता सर्वच पुलांना पाणी लागल्याच्या किंवा पुलावरून पाणी गेल्याच्या घटना घडल्या आहेत. नासर्डी नदीवरदेखील सातपूर गाव, आयटीआय आणि उंटवाडी, मिलिंदनगर असे सर्व पूल पाण्याखाली जातात. अशावेळी हे सबमर्सिबल पूल हटवावेत, अशी एक सूचना होती. परंतु त्यावरदेखील कोणताही पूल हटविला गेलेला नाही. (क्रमश:)-------------गोदावरी नदीच्या पुरामुळे बुडणारे कमी अंतराचे पूल हटविण्याच्या सूचनेची अंमलबजावणी झाली नाहीच उलट आणखी पूल बांधले जात आहेत. गेल्या दीड वर्षांपासून नदीच्या पलीकडे म्हणजे मखमलाबाद शिवार, हनुमावाडी शिवारात कोणीही नागरी वसाहत नसताना दोन पूल बांधले जात आहेत. त्यातील एका १८ कोटी रुपयांच्या पुलास गेल्या आठवड्यात स्थायी समितीने मान्यता दिली. गोदावरी नदीवर पुलांची संख्या इतकी वाढत आहे की पुलांची नदी म्हणून ओळख निर्माण होऊ शकते, असे काही नागरिकांचे मत आहे.--------------त्या गेटला आता पावसाळ्यानंतरच मुहूर्तअहिल्या देवी होळकर पुलाखालील नवीन गेटच्या कामावरून स्मार्ट सिटी कंपनीत बरीच भवती न भवती झाली. आता त्याचे टेंडर मंजूर होऊनदेखील बरेच दिवस झाले. परंतु काम सुरू झालेले नाही. मेरीकडून संकल्प चित्र मंजूर करून घेण्यासाठी पाठपुरावा करीत असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. त्यामुळे आता पावसाळ्यानंतर हे काम सुरू होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Nashikनाशिक