शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
3
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
4
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
5
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
6
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
7
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
8
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
9
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
10
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
11
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
12
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
13
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
14
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
15
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
16
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
17
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
18
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
19
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
20
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार

जलयुक्त शिवार अभियानाचा पहिल्याच टप्प्यात फज्जा

By admin | Updated: August 29, 2015 00:20 IST

मूर्तिजापूर तालुक्यातील ६ गावांतील कामांसाठी निधीच मिळाला नाही!

मूर्तिजापूर (जि. अकोला) : जलयुक्त शिवार अभियानातील कामांसाठी निवडण्यात येणार्‍या गावांकरिता निधी उपलब्ध करून देण्यासाठी अनेक योजना असतानाही मूर्तिजापूर तालुक्यातील सहा गावांतील कामांकरिता निधीच उपलब्ध न झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे ह्यसर्वांसाठी पाणी-टंचाईमुक्त महाराष्ट्र २0१९ह्णच्या उद्देशाला हरताळ फासण्याचेच काम करण्यात आल्याची चर्चा आहे. राज्यात पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. यावर्षी भूजल पातळीत २ मीटरपेक्षा जास्त घट झालेले १८८ तालुके आहेत. तर २२ जिल्हय़ांमधील १९ हजार ५९ गावांत टंचाईची परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. भविष्यात पाणीटंचाई निर्माण होऊ नये म्हणून राज्यात ह्यजलयुक्त शिवार अभियानह्ण राबविण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. जलयुक्त शिवार अभियानात शेततळे, नालाबांध, ढाळीचे बांध, पाणलोट विकासाची कामे, नाला खोलीकरण, सरळीकरण, पिण्याच्या पाण्याचे स्रोत बळकटीकरण अशी अनेक कामे करता येतात. या कामांसाठी महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, राज्यस्तर निधी, आदिवासी उपाययोजना, विशेष घटक योजना, मुख्यमंत्री सहायता निधी, खासदार, आमदार यांचा निधी यासह अनेक योजनांचा निधी वापरण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. असे असतानाही मूर्तिजापूर तालुक्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत निवडण्यात येणार्‍या २३ गावांपैकी ६ गावांतील कामांसाठी निधीच प्राप्त झाला नाही. त्यामुळे या गावात कामांचा श्रीगणेशा होऊ शकला नाही.