शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

आधी बसतो चटका मग मिळते सावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 18:27 IST

सिन्नर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या तीव्रतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून पाऱ्याने गगणचुंबी झेप घेण्यास सुरुवात केली आहे. तपमानातील वाढीचा सर्वच आघाड्यांवर परिणाम जाणवू लागला असून त्याची सर्वाधिक झळ पशुपालकांना बसू लागली आहे.

ठळक मुद्देपारा चढला आकाशी : जनावरांच्या पाण्यासाठी पशुपालकांची पायपीट

सिन्नर : तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या तीव्रतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून पाऱ्याने गगणचुंबी झेप घेण्यास सुरुवात केली आहे. तपमानातील वाढीचा सर्वच आघाड्यांवर परिणाम जाणवू लागला असून त्याची सर्वाधिक झळ पशुपालकांना बसू लागली आहे. दुपारी उन्हाच्या चटक्यांनी सगळ््यांनाच सावलीची आसरा घेत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसू लागले आहे. ‘आधी बसतो चटका, तवा मिळते सावली’ असा अनुभव ग्रामीण भागातील मजूर, शेतकरी व पशूपालकांना येऊ लागला आहे.दुपारी उन्हाच्या झळा वाढू लागल्याने शेत-शिवारात काम करणारे शेतकरी, शेतमजूर, पशुपालक यांना सावलीची गरज वाढू लागली आहे. आंबा, लिंब, चिंच अशा डेरेदार वृक्षांच्या पसरलेल्या छायेत गाई-गुरे, वासरे आसरा घेऊ लागली आहेत. तर काही ठिकाणी जवळपास डेरेदार वृक्ष नसल्याने पर्णहिन वृक्षांखाली जनावरे विसावताना चित्र आहे. पाण्यासाठी पशूपालकांची पायपीट वाढली आहे. होळीपासून उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागते व गुढीपाडव्याला उचांकं गाठला जातो असा अनुभव आहे.तथापि, गेल्या काही वर्षांपासून निसर्गाचे रूप पालटू लागले असल्याने बेमोसमी पाऊस, उन्हाळ्यात - हिवाळा आणि पावसाळ्यात दोन्ही ऋतंूचे हवामान असा विचित्र अनुभव सर्वत्र येत आहे. दिवसभर उन्ह भाजून निघत असले तरी पहाटे गारवा निर्माण होतो. होळी पर्यंत उन्हाची तीव्रता फारशी नसते तथापि, पौर्णिमेनंतर दिवसही अधिक मोठा भासू लागतो. होळी पेटली की, थंडी कमी होते असा जुन्या लोकांचा अनुभव असल्याने आजही तसे म्हटले जाते. गेल्या पाच-सहा दिवसांपासून उन्हं तापू लागले आहेत.एप्रिलच्या मध्यावर तालुक्यात गारपीट व वादळी वाºयाचा तडाखा बसला होता. भाजीपाला वर्गीय पिकांचीही तीच परिस्थिती शेतकऱ्यांना अनुभवावी लागली. ज्या भागात मजूरांच्या सहाय्याने सोंगणी करावी लागत आहे. त्या भागात उन्हाच्या काहीलीने शेती काम करणाºया मजुरांची लाहीलाही होत आहे. तसेच शिवारात शेळ्या - मेंढ्या, गायी - गुरे चारणाºया गुराख्यांनी दुपारच्या उन्हात जनावरांसह सावलीला बसणे पसंत केले आहे. उन्हामुळे पावसाळ्यातील हिरवे गवत करपून केले असून जनावरांना शिवारात हिरवा चारा मिळणे दुरापास्त झाले आहे. शिवारातील हिरवा चाराही संपुष्टात आला असून, शेळ्या - मेढ्यांना चाºयासाठी अधिक दूरवर फिरवावे लागत आहे. शहरातील नागरिकही उकाड्याने हैराण झाले असून उन्हामुळे पंखे, कुलर यांच्या विक्रीतही वाढ झाली आहे. उन्हापासून बचाव व्हावा म्हणून डोक्यावर टोप्या अथवा उपरणे यांचा वापर वाढला आहे.

टॅग्स :NashikनाशिकHeat Strokeउष्माघात