शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

आधी बसतो चटका मग मिळते सावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 18:27 IST

सिन्नर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या तीव्रतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून पाऱ्याने गगणचुंबी झेप घेण्यास सुरुवात केली आहे. तपमानातील वाढीचा सर्वच आघाड्यांवर परिणाम जाणवू लागला असून त्याची सर्वाधिक झळ पशुपालकांना बसू लागली आहे.

ठळक मुद्देपारा चढला आकाशी : जनावरांच्या पाण्यासाठी पशुपालकांची पायपीट

सिन्नर : तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या तीव्रतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून पाऱ्याने गगणचुंबी झेप घेण्यास सुरुवात केली आहे. तपमानातील वाढीचा सर्वच आघाड्यांवर परिणाम जाणवू लागला असून त्याची सर्वाधिक झळ पशुपालकांना बसू लागली आहे. दुपारी उन्हाच्या चटक्यांनी सगळ््यांनाच सावलीची आसरा घेत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसू लागले आहे. ‘आधी बसतो चटका, तवा मिळते सावली’ असा अनुभव ग्रामीण भागातील मजूर, शेतकरी व पशूपालकांना येऊ लागला आहे.दुपारी उन्हाच्या झळा वाढू लागल्याने शेत-शिवारात काम करणारे शेतकरी, शेतमजूर, पशुपालक यांना सावलीची गरज वाढू लागली आहे. आंबा, लिंब, चिंच अशा डेरेदार वृक्षांच्या पसरलेल्या छायेत गाई-गुरे, वासरे आसरा घेऊ लागली आहेत. तर काही ठिकाणी जवळपास डेरेदार वृक्ष नसल्याने पर्णहिन वृक्षांखाली जनावरे विसावताना चित्र आहे. पाण्यासाठी पशूपालकांची पायपीट वाढली आहे. होळीपासून उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागते व गुढीपाडव्याला उचांकं गाठला जातो असा अनुभव आहे.तथापि, गेल्या काही वर्षांपासून निसर्गाचे रूप पालटू लागले असल्याने बेमोसमी पाऊस, उन्हाळ्यात - हिवाळा आणि पावसाळ्यात दोन्ही ऋतंूचे हवामान असा विचित्र अनुभव सर्वत्र येत आहे. दिवसभर उन्ह भाजून निघत असले तरी पहाटे गारवा निर्माण होतो. होळी पर्यंत उन्हाची तीव्रता फारशी नसते तथापि, पौर्णिमेनंतर दिवसही अधिक मोठा भासू लागतो. होळी पेटली की, थंडी कमी होते असा जुन्या लोकांचा अनुभव असल्याने आजही तसे म्हटले जाते. गेल्या पाच-सहा दिवसांपासून उन्हं तापू लागले आहेत.एप्रिलच्या मध्यावर तालुक्यात गारपीट व वादळी वाºयाचा तडाखा बसला होता. भाजीपाला वर्गीय पिकांचीही तीच परिस्थिती शेतकऱ्यांना अनुभवावी लागली. ज्या भागात मजूरांच्या सहाय्याने सोंगणी करावी लागत आहे. त्या भागात उन्हाच्या काहीलीने शेती काम करणाºया मजुरांची लाहीलाही होत आहे. तसेच शिवारात शेळ्या - मेंढ्या, गायी - गुरे चारणाºया गुराख्यांनी दुपारच्या उन्हात जनावरांसह सावलीला बसणे पसंत केले आहे. उन्हामुळे पावसाळ्यातील हिरवे गवत करपून केले असून जनावरांना शिवारात हिरवा चारा मिळणे दुरापास्त झाले आहे. शिवारातील हिरवा चाराही संपुष्टात आला असून, शेळ्या - मेढ्यांना चाºयासाठी अधिक दूरवर फिरवावे लागत आहे. शहरातील नागरिकही उकाड्याने हैराण झाले असून उन्हामुळे पंखे, कुलर यांच्या विक्रीतही वाढ झाली आहे. उन्हापासून बचाव व्हावा म्हणून डोक्यावर टोप्या अथवा उपरणे यांचा वापर वाढला आहे.

टॅग्स :NashikनाशिकHeat Strokeउष्माघात