शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

...अखेर जोरदार बरसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2019 1:27 AM

शहर व परिसरात सोमवारी (दि.१) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. नाशिकरोडपासून सर्वदूर सुमारे अडीच ते तीन तास दमदार सरींचा वर्षाव सुरू होता. सायंकाळी साडेपाच वाजेपासून रात्री साडेआठ वाजेपर्यंत ३३ मि.मी इतका तर सकाळपासून सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत १४.२ मि.मी पावसाची नोंद झाली. एकूणच बारा तासांत ४७.६ मि.मी इतका पाऊस पडला.

नाशिक : शहर व परिसरात सोमवारी (दि.१) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. नाशिकरोडपासून सर्वदूर सुमारे अडीच ते तीन तास दमदार सरींचा वर्षाव सुरू होता. सायंकाळी साडेपाच वाजेपासून रात्री साडेआठ वाजेपर्यंत ३३ मि.मी इतका तर सकाळपासून सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत १४.२ मि.मी पावसाची नोंद झाली. एकूणच बारा तासांत ४७.६ मि.मी इतका पाऊस पडला.दोन दिवसांपासून नागरिकांना जोरदार पावसाची प्रतीक्षा होती. शहरासह जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये सोमवारी सायंकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. नाशिकरोड परिसरात मात्र दुपारी साडेतीन वाजेपासून पावसाच्या सरींचा वर्षाव होऊ लागला होता. चार वाजेपासून पावसाने जोर धरला.शहरातदेखील साडेचार वाजेपासून जोरदार जलधारा कोसळू लागल्याने रस्त्यांवरून पाण्याचे पाट वाहू लागले होते. जोरदार पावसाने महापालिका प्रशासनाच्या पावसाळापूर्व तयारीची धूळधाण उडविली. सर्वच गटारी तुडुंब भरून वाहत होत्या. रामायण बंगल्याच्या प्रवेशद्वारासमोर पावसाच्या पाण्याचे तळे साचल्याचे चित्र पुन्हा पहावयास मिळाले. तसेच राजीव गांधी भवनपुढे शरणपूर रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्याचप्रमाणे महात्मा गांधी रोडवरील व्यावसायिक इमारतींच्या तळमजल्यांमध्ये पाणी साचले़ स्टेडियम कॉम्प्लेक्समध्येही पाण्याचे तळे साचले होते़धरण क्षेत्रात पावसाचा दिलासा४सायंकाळी सहा वाजेपर्यंत गंगापूर धरण क्षेत्रात ३८, कश्यपी क्षेत्रात १७, अंबोली पाणलोट क्षेत्रात १७ मि.मी. इतका पाऊस पडला. मात्र गौतमी धरण परिसरात अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. त्र्यंबक परिसरातील पाणलोट क्षेत्रात केवळ ७ मि.मी. पावसाची नोंद होऊ शकली. अद्याप गंगापूर धरण क्षेत्रात यापूर्वी पावसाने अशी दमदार हजेरी लावली नव्हती. त्यामुळे सोमवारी धरण क्षेत्राला काहीसा दिलासा मिळाला आहे.वाहतूक कोंडीमुळे हालसाडेपाच वाजेपासून साडेसहा वाजेपर्यंत पावसाचा जोर वाढलेला होता. विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. ऐन सायंकाळच्या वेळेस पावसाच्या दमदार सरींचा जोरदार वर्षाव सुरू झाला. घरी परतणाऱ्या चाकरमान्यांचे चांगलेच हाल झाले. परिणामी कॅनडा कॉर्नर, टिळकवाडी, त्र्यंबक नाका, द्वारका, मुंबई नाका, काठेगल्ली सिग्नल या भागात वाहतुकीची कोंडी झाली होती. रविवार कारंजा परिसरात वाहतूक विस्कळीत झाल्याने मालेगाव स्टॅन्डपासून अहल्यादेवी पुलापर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या होत्या.

टॅग्स :RainपाऊसWaterपाणी