शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

कांदा लागवड अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 00:14 IST

रब्बी हंगामातील उन्हाळ कांदा लागवड अंतिम टप्प्यात असून, बळीराजाची लगबग सुरू आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने बळीराजाला खरिपाचे उत्पन्न हाती आले नाही. पर्यायाने पैसा हाती नाही त्यातच मजुरांची टंचाई, वाढलेला मजुरीचा दर, रासायनिक खतांच्या वाढत्या किमती, भारनियमन, मशागतीसाठी ट्रॅक्टरची महागडी मजुरी अशा अनेक समस्यांना तोंड देत रब्बीतील उन्हाळ कांद्याची लागवड करण्यात मग्न असून, लागवड अंतिम टप्प्यात आहे.

ठळक मुद्देपाटणे : परिसरातील शेतकऱ्यांची लगबग

पाटणे : परिसरात रब्बी हंगामातील उन्हाळ कांदा लागवड अंतिम टप्प्यात असून, बळीराजाची लगबग सुरू आहे.अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने बळीराजाला खरिपाचे उत्पन्न हाती आले नाही. पर्यायाने पैसा हाती नाही त्यातच मजुरांची टंचाई, वाढलेला मजुरीचा दर, रासायनिक खतांच्या वाढत्या किमती, भारनियमन, मशागतीसाठी ट्रॅक्टरची महागडी मजुरी अशा अनेक समस्यांना तोंड देत रब्बीतील उन्हाळ कांद्याची लागवड करण्यात मग्न असून, लागवड अंतिम टप्प्यात आहे.मागील वर्षी अल्पपावसामुळे रब्बीतील उन्हाळ कांद्याची लागवड १५ जानेवारीच्या आत झाली होती. परंतु यावर्षी अतिवृष्टीमुळे जवळ जवळ दीड महिना उशिरा लागवडीला सुरुवात झाली. अतिवृष्टीमुळे कांद्याची रोपे नष्ट झाली होती. परिणामी शेतकºयांना पुन्हा बियाणे टाकून रोपे तयार करावी लागली. त्याची लागवड जानेवारी महिन्यात सध्या चालू आहे. उन्हाळ कांदासाठी एकरी खर्च सात ते आठ हजार रुपये येत असून, मजुरी, पलटी नांगर अठराशे ते दोन हजार रुपये एकर, रोटावेटर मारणे सोळाशे ते अठराशे रुपये एकरी, सºया पाडून वाफे तयार करणे दोन हजार रुपये, शेणखत दोन ट्रॉली दहा हजार रुपये, रासायनिक खते तीन ते चार हजार रुपये असा खर्च असून, एकूण २० ते २५ हजार रुपये खर्च फक्त लागवडीसाठी होतो. लागवड, आंतरमशागत, रासायनिक खते, कीटकनाशके फवारणी, पाण्याचे व्यवस्थापन, कांदे काढणे असा एकूण ५० हजारांहून जास्त खर्च करावा लागतो. उत्पन्न दीडशे ते दोनशे क्विंटल प्रतिएकरी येऊ शकते. अशाही परिस्थितीत एवढा खर्च करून दररोज बदलणाºया लहरी हवामानाचा फटका रब्बीतील पिकांवर होईल याची धास्ती शेतकºयांना लागली आहे. पुढील दीड दोन महिने थंडी राहिली तर कांद्याचे उत्पादनात भरपूर प्रमाणात वाढ होईल.कांदा उत्पादनात वाढ होण्याची शक्यतांयावर्षी अतिवृष्टीमुळे सर्वत्र मुबलक प्रमाणात पाणी आहे याचाही फायदा उत्पन्नवाढीसाठी होईल; परंतु भाव मिळेल याची शाश्वती नाही. एकूणच उन्हाळ कांद्यावरील लागवडीसाठी हजारो रुपये खर्च करून भविष्यात भाव मिळेल की नाही याची शाश्वती नाही. गेल्या काही दिवसांपासून कांदा भावात वाढ झाल्यामुळे मोठ्या संख्येने शेतकरी कांदा लागवडीस पसंती देत असल्याने यावर्षी कांद्याचे उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रonionकांदा