शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

कांदा लागवड अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 00:14 IST

रब्बी हंगामातील उन्हाळ कांदा लागवड अंतिम टप्प्यात असून, बळीराजाची लगबग सुरू आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने बळीराजाला खरिपाचे उत्पन्न हाती आले नाही. पर्यायाने पैसा हाती नाही त्यातच मजुरांची टंचाई, वाढलेला मजुरीचा दर, रासायनिक खतांच्या वाढत्या किमती, भारनियमन, मशागतीसाठी ट्रॅक्टरची महागडी मजुरी अशा अनेक समस्यांना तोंड देत रब्बीतील उन्हाळ कांद्याची लागवड करण्यात मग्न असून, लागवड अंतिम टप्प्यात आहे.

ठळक मुद्देपाटणे : परिसरातील शेतकऱ्यांची लगबग

पाटणे : परिसरात रब्बी हंगामातील उन्हाळ कांदा लागवड अंतिम टप्प्यात असून, बळीराजाची लगबग सुरू आहे.अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने बळीराजाला खरिपाचे उत्पन्न हाती आले नाही. पर्यायाने पैसा हाती नाही त्यातच मजुरांची टंचाई, वाढलेला मजुरीचा दर, रासायनिक खतांच्या वाढत्या किमती, भारनियमन, मशागतीसाठी ट्रॅक्टरची महागडी मजुरी अशा अनेक समस्यांना तोंड देत रब्बीतील उन्हाळ कांद्याची लागवड करण्यात मग्न असून, लागवड अंतिम टप्प्यात आहे.मागील वर्षी अल्पपावसामुळे रब्बीतील उन्हाळ कांद्याची लागवड १५ जानेवारीच्या आत झाली होती. परंतु यावर्षी अतिवृष्टीमुळे जवळ जवळ दीड महिना उशिरा लागवडीला सुरुवात झाली. अतिवृष्टीमुळे कांद्याची रोपे नष्ट झाली होती. परिणामी शेतकºयांना पुन्हा बियाणे टाकून रोपे तयार करावी लागली. त्याची लागवड जानेवारी महिन्यात सध्या चालू आहे. उन्हाळ कांदासाठी एकरी खर्च सात ते आठ हजार रुपये येत असून, मजुरी, पलटी नांगर अठराशे ते दोन हजार रुपये एकर, रोटावेटर मारणे सोळाशे ते अठराशे रुपये एकरी, सºया पाडून वाफे तयार करणे दोन हजार रुपये, शेणखत दोन ट्रॉली दहा हजार रुपये, रासायनिक खते तीन ते चार हजार रुपये असा खर्च असून, एकूण २० ते २५ हजार रुपये खर्च फक्त लागवडीसाठी होतो. लागवड, आंतरमशागत, रासायनिक खते, कीटकनाशके फवारणी, पाण्याचे व्यवस्थापन, कांदे काढणे असा एकूण ५० हजारांहून जास्त खर्च करावा लागतो. उत्पन्न दीडशे ते दोनशे क्विंटल प्रतिएकरी येऊ शकते. अशाही परिस्थितीत एवढा खर्च करून दररोज बदलणाºया लहरी हवामानाचा फटका रब्बीतील पिकांवर होईल याची धास्ती शेतकºयांना लागली आहे. पुढील दीड दोन महिने थंडी राहिली तर कांद्याचे उत्पादनात भरपूर प्रमाणात वाढ होईल.कांदा उत्पादनात वाढ होण्याची शक्यतांयावर्षी अतिवृष्टीमुळे सर्वत्र मुबलक प्रमाणात पाणी आहे याचाही फायदा उत्पन्नवाढीसाठी होईल; परंतु भाव मिळेल याची शाश्वती नाही. एकूणच उन्हाळ कांद्यावरील लागवडीसाठी हजारो रुपये खर्च करून भविष्यात भाव मिळेल की नाही याची शाश्वती नाही. गेल्या काही दिवसांपासून कांदा भावात वाढ झाल्यामुळे मोठ्या संख्येने शेतकरी कांदा लागवडीस पसंती देत असल्याने यावर्षी कांद्याचे उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रonionकांदा