शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

कांदा लागवड अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 00:14 IST

रब्बी हंगामातील उन्हाळ कांदा लागवड अंतिम टप्प्यात असून, बळीराजाची लगबग सुरू आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने बळीराजाला खरिपाचे उत्पन्न हाती आले नाही. पर्यायाने पैसा हाती नाही त्यातच मजुरांची टंचाई, वाढलेला मजुरीचा दर, रासायनिक खतांच्या वाढत्या किमती, भारनियमन, मशागतीसाठी ट्रॅक्टरची महागडी मजुरी अशा अनेक समस्यांना तोंड देत रब्बीतील उन्हाळ कांद्याची लागवड करण्यात मग्न असून, लागवड अंतिम टप्प्यात आहे.

ठळक मुद्देपाटणे : परिसरातील शेतकऱ्यांची लगबग

पाटणे : परिसरात रब्बी हंगामातील उन्हाळ कांदा लागवड अंतिम टप्प्यात असून, बळीराजाची लगबग सुरू आहे.अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने बळीराजाला खरिपाचे उत्पन्न हाती आले नाही. पर्यायाने पैसा हाती नाही त्यातच मजुरांची टंचाई, वाढलेला मजुरीचा दर, रासायनिक खतांच्या वाढत्या किमती, भारनियमन, मशागतीसाठी ट्रॅक्टरची महागडी मजुरी अशा अनेक समस्यांना तोंड देत रब्बीतील उन्हाळ कांद्याची लागवड करण्यात मग्न असून, लागवड अंतिम टप्प्यात आहे.मागील वर्षी अल्पपावसामुळे रब्बीतील उन्हाळ कांद्याची लागवड १५ जानेवारीच्या आत झाली होती. परंतु यावर्षी अतिवृष्टीमुळे जवळ जवळ दीड महिना उशिरा लागवडीला सुरुवात झाली. अतिवृष्टीमुळे कांद्याची रोपे नष्ट झाली होती. परिणामी शेतकºयांना पुन्हा बियाणे टाकून रोपे तयार करावी लागली. त्याची लागवड जानेवारी महिन्यात सध्या चालू आहे. उन्हाळ कांदासाठी एकरी खर्च सात ते आठ हजार रुपये येत असून, मजुरी, पलटी नांगर अठराशे ते दोन हजार रुपये एकर, रोटावेटर मारणे सोळाशे ते अठराशे रुपये एकरी, सºया पाडून वाफे तयार करणे दोन हजार रुपये, शेणखत दोन ट्रॉली दहा हजार रुपये, रासायनिक खते तीन ते चार हजार रुपये असा खर्च असून, एकूण २० ते २५ हजार रुपये खर्च फक्त लागवडीसाठी होतो. लागवड, आंतरमशागत, रासायनिक खते, कीटकनाशके फवारणी, पाण्याचे व्यवस्थापन, कांदे काढणे असा एकूण ५० हजारांहून जास्त खर्च करावा लागतो. उत्पन्न दीडशे ते दोनशे क्विंटल प्रतिएकरी येऊ शकते. अशाही परिस्थितीत एवढा खर्च करून दररोज बदलणाºया लहरी हवामानाचा फटका रब्बीतील पिकांवर होईल याची धास्ती शेतकºयांना लागली आहे. पुढील दीड दोन महिने थंडी राहिली तर कांद्याचे उत्पादनात भरपूर प्रमाणात वाढ होईल.कांदा उत्पादनात वाढ होण्याची शक्यतांयावर्षी अतिवृष्टीमुळे सर्वत्र मुबलक प्रमाणात पाणी आहे याचाही फायदा उत्पन्नवाढीसाठी होईल; परंतु भाव मिळेल याची शाश्वती नाही. एकूणच उन्हाळ कांद्यावरील लागवडीसाठी हजारो रुपये खर्च करून भविष्यात भाव मिळेल की नाही याची शाश्वती नाही. गेल्या काही दिवसांपासून कांदा भावात वाढ झाल्यामुळे मोठ्या संख्येने शेतकरी कांदा लागवडीस पसंती देत असल्याने यावर्षी कांद्याचे उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रonionकांदा