शहरं
Join us  
Trending Stories
1
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
2
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
3
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
4
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
5
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
6
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
7
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
8
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
9
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
10
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
11
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
12
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
13
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
14
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
15
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
16
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
17
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
18
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
19
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
20
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     

ब्रह्मगिरी संवर्धनासाठी सहा राज्यात उभारणार लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 16:02 IST

नाशिक- त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदीचे उगमस्थान असलेल्या ब्रह्मगिरी फोडण्याचे सध्या काम सुरू असून हा विषय राष्ट्रीय पातळीवर गेला आहे. सहा राज्यातून गोदावरी नदी वाहत असल्याने या राज्यातील पर्यावरण प्रेमींनी एकत्र येऊन लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांनी यासंदर्भात पुढकार घेतला असून आधी कायदेशीर मार्गाने खोदकाम थांबवणार आणि ते शक्य न झाल्यास सहाही राज्यात लोकचळवळ सुरू करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली.

ठळक मुद्देराजेंद्रसिंह यांचा पुढकारलोकचळवळ उभारणार

नाशिक- त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदीचे उगमस्थान असलेल्या ब्रह्मगिरी फोडण्याचे सध्या काम सुरू असून हा विषय राष्ट्रीय पातळीवर गेला आहे. सहा राज्यातून गोदावरी नदी वाहत असल्याने या राज्यातील पर्यावरण प्रेमींनी एकत्र येऊन लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांनी यासंदर्भात पुढकार घेतला असून आधी कायदेशीर मार्गाने खोदकाम थांबवणार आणि ते शक्य न झाल्यास सहाही राज्यात लोकचळवळ सुरू करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली.

नाशिक जवळील ब्रह्मगिरीचे खोदकाम हे सहा राज्यावंर परीणाम करणारे ठरणार असून यासंदर्भात मंगळवारी (दि. १) नाशिकमधील पर्यावरण प्रेमी राजेश पंडीत यांनी राजेंद्रसिंह यांच्यासह सहा राज्यातील मान्यवरांशी वार्तालाप आयोजित केला होता.

ब्रह्मगिरीला हानी पोहोचवली जात असताना स्थानिक ग्रामस्थ तसेच येथील मंदिर मठातील संत महात्मे गप्प का असा प्रश्न राजेंद्रसिंह यांनी केला. अशाप्रकारच्या कृत्यात स्थानिक पातळीवर प्रशासन आणि राजकीय लागेबंधे असतात. तसेच येथे तर आत्तापासूनच फॉर्म हाऊस सारखी पर्यटनस्थळे साकारले जात आहेत. त्यास विरोध करण्यासाठी जनचळवळ उभी राहीली पाहिजे असेही राजेंद्रसिंह म्हणाले.

ब्रह्मगिरी केवळ देशाची नव्हे तर आंतरराष्ट्रीय संपत्ती आहे. त्याचे संवर्धन न केल्यास सहा राज्यांवर त्याचा प्रतिकुल परीणाम होईल. त्यामुळे निसर्ग संवर्धनाच्या राज्य घटनेतील तत्वाच्या विरोधातील कृतीला विरोध करण्यासाठी आधी सरकारला निवेदन देण्यात येईल त्यानंतर गरज पडली तर न्यायलयात जनहित याचिका आणि पुढील टप्प्यात लोकचळवळ उभारण्यात येईल असे राजेंद्रसिंह म्हणाले.

टॅग्स :Nashikनाशिकgodavariगोदावरीenvironmentपर्यावरण