शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
2
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
3
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
4
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांचा महायुतीला मोठा धक्का; एका क्लिकवर वाचा निकाल
5
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
6
Jawhar Nagar Parishad Election Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
7
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
8
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
9
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
10
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
11
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
12
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
13
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
14
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
15
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
16
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
17
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
18
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
19
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
20
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
Daily Top 2Weekly Top 5

ब्रह्मगिरी संवर्धनासाठी सहा राज्यात उभारणार लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 16:02 IST

नाशिक- त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदीचे उगमस्थान असलेल्या ब्रह्मगिरी फोडण्याचे सध्या काम सुरू असून हा विषय राष्ट्रीय पातळीवर गेला आहे. सहा राज्यातून गोदावरी नदी वाहत असल्याने या राज्यातील पर्यावरण प्रेमींनी एकत्र येऊन लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांनी यासंदर्भात पुढकार घेतला असून आधी कायदेशीर मार्गाने खोदकाम थांबवणार आणि ते शक्य न झाल्यास सहाही राज्यात लोकचळवळ सुरू करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली.

ठळक मुद्देराजेंद्रसिंह यांचा पुढकारलोकचळवळ उभारणार

नाशिक- त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदीचे उगमस्थान असलेल्या ब्रह्मगिरी फोडण्याचे सध्या काम सुरू असून हा विषय राष्ट्रीय पातळीवर गेला आहे. सहा राज्यातून गोदावरी नदी वाहत असल्याने या राज्यातील पर्यावरण प्रेमींनी एकत्र येऊन लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांनी यासंदर्भात पुढकार घेतला असून आधी कायदेशीर मार्गाने खोदकाम थांबवणार आणि ते शक्य न झाल्यास सहाही राज्यात लोकचळवळ सुरू करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली.

नाशिक जवळील ब्रह्मगिरीचे खोदकाम हे सहा राज्यावंर परीणाम करणारे ठरणार असून यासंदर्भात मंगळवारी (दि. १) नाशिकमधील पर्यावरण प्रेमी राजेश पंडीत यांनी राजेंद्रसिंह यांच्यासह सहा राज्यातील मान्यवरांशी वार्तालाप आयोजित केला होता.

ब्रह्मगिरीला हानी पोहोचवली जात असताना स्थानिक ग्रामस्थ तसेच येथील मंदिर मठातील संत महात्मे गप्प का असा प्रश्न राजेंद्रसिंह यांनी केला. अशाप्रकारच्या कृत्यात स्थानिक पातळीवर प्रशासन आणि राजकीय लागेबंधे असतात. तसेच येथे तर आत्तापासूनच फॉर्म हाऊस सारखी पर्यटनस्थळे साकारले जात आहेत. त्यास विरोध करण्यासाठी जनचळवळ उभी राहीली पाहिजे असेही राजेंद्रसिंह म्हणाले.

ब्रह्मगिरी केवळ देशाची नव्हे तर आंतरराष्ट्रीय संपत्ती आहे. त्याचे संवर्धन न केल्यास सहा राज्यांवर त्याचा प्रतिकुल परीणाम होईल. त्यामुळे निसर्ग संवर्धनाच्या राज्य घटनेतील तत्वाच्या विरोधातील कृतीला विरोध करण्यासाठी आधी सरकारला निवेदन देण्यात येईल त्यानंतर गरज पडली तर न्यायलयात जनहित याचिका आणि पुढील टप्प्यात लोकचळवळ उभारण्यात येईल असे राजेंद्रसिंह म्हणाले.

टॅग्स :Nashikनाशिकgodavariगोदावरीenvironmentपर्यावरण