शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
2
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
3
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
5
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
6
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
7
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
8
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
9
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
10
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
11
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
12
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
13
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
14
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
15
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
16
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
17
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
18
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
19
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
20
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा

नाशिकमध्ये पन्नास टक्के उद्योग क्षेत्राला दिलासा : शशिकांत जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 5:12 PM

नाशिक- कोरोनामुळे देशभरात संचारबंदी लागु करण्यात आले. त्याच बरोबर संचारबंदी लागु करण्यात आली आहे. नाशिक मधील उद्योग क्षेत्र त्यामुळे बंद असल्याने सुमारे दोन हजार कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे. तथापि, आता येत्या सोमवारपासून (दि.२०) नाशिकमधील ग्रामीण भागातील उद्योग सुरू होणार असल्याने नाशिकमधील किमान पन्नास टक्के उद्योगांना दिलासा मिळणार आहे, अशी माहिती निमाचे अध्यक्ष शशिकांत जाधव यांनी दिली.

ठळक मुद्देमनपा क्षेत्रातील उद्योग बंदच राहणारलॉक डाऊनमुळे दोन हजार कोटींचे नुकसान

नाशिक- कोरोनामुळे देशभरात संचारबंदी लागु करण्यात आले. त्याच बरोबर संचारबंदी लागु करण्यात आली आहे. नाशिक मधील उद्योग क्षेत्र त्यामुळे बंद असल्याने सुमारे दोन हजार कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे. तथापि, आता येत्या सोमवारपासून (दि.२०) नाशिकमधील ग्रामीण भागातील उद्योग सुरू होणार असल्याने नाशिकमधील किमान पन्नास टक्के उद्योगांना दिलासा मिळणार आहे, अशी माहिती निमाचे अध्यक्ष शशिकांत जाधव यांनी दिली.प्रश्न- लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात नाशिकच्या उद्योग क्षेत्राला दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु त्यात यश मिळाले नाही.जाधव : नाािशक जिल्ह्यात सर्वाधिक कोरोनाबाधीत रूग्ण मालेगावमध्ये आढळले. त्यामुळे कोरोनाबाधीत रूग्ण संख्येच्या आधारे रेड आणि आॅरेंज झोन मध्ये नाशिकचा समावेश करू नये त्या ऐवजी मालेगावला हॉट स्पॉट घोषीत करून अवघे चार ते पाच रूग्ण असलेल्या नाशिकला आॅरेंज झोनमध्ये सामाविष्ट करून त्यातील उद्योग सुरू करावे अशी मागणी निमाच्या वतीने करण्यात आली होती. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. शासनाने महापालिका हद्द वगळून उद्योग सुरू करण्यास मान्यता दिली आहे.प्रश्न: नाशिकमधील औद्योगिक वसाहतीला त्यामुळे किती दिलासा मिळेल?जाधव: २० एप्रिल पासून काही उदयोग व्यवसाय सुरू करता येतील हे पंतप्रधानांनी अगोदरच जाहिर केले होते. त्यामुळे राज्याच्या उद्योग मंत्र्यांकडे निमाने पाठपुरावा करून नाशिक जिल्ह्यातील सर्वच उद्योग सुरू करण्यासाठी मागणी केली होती. मात्र, सद्य स्थितीत केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशानुसारच राज्य शासनाने भूमिका घेतली आहे. त्यानुसार मालेगाव आणि नाशिक महापालिका क्षेत्र वगळून उद्योग सुरू करण्यास मान्यता देण्यात आले आहेत. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, इगतपुरी, वाडीवºहे यांच्यासह ग्रामीण भागातील उद्योग सुरू झाल्याने किमान नाशिकमधील ५० टक्के उद्योग सुरू होतील. तेथील कामगारांच्या रोजीरोटीची सोय होईल.प्रश्न: लॉकडाऊनमुळे उद्योग क्षेत्राचे खूपच नुकसान झाले आहे..जाधव : होय नाशिकमधील उद्योग क्षेत्राचे किमान दोन हजार कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे. आज नाशिकमधील किमान पन्नास टक्के उद्योग सोमवारपासून सुरू होतील. त्यातील सर्वच उद्योजकांना कोरोना संसर्ग टाळण्यासाठी उपाययोजना आणि नियमांचे पालन करण्याचे प्रतिज्ञापत्र सादर करावे लागणार आहे. ते आवश्यकही आहे. मात्र, ३ मे नंतर सर्व उद्योग सुरू होतील अशी अपेक्षा आहे.मुलाखत- संजय पाठक

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्याMIDCएमआयडीसी