शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
9
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
10
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
11
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
12
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
13
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
14
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
15
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
16
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
17
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
18
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
19
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
20
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार

येवला तालुक्यात यंदा उन्हाळी कांद्याचे उत्पादन घटण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2021 10:28 PM

जळगाव नेऊर : गेल्या एक महिन्यापासून शेतकऱ्यांच्या लाल कांद्यातून खर्च देखील वसूल होत नसल्याने थोड्याच दिवसात मोठ्या प्रमाणात येणारा उन्हाळी कांदाही करपा, बोगस बियाणे, उन्हाची तीव्रता यांच्या संकटात सापडला असून मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी उन्हाळी कांद्याचे उत्पादन घटणार आहे.

ठळक मुद्देउशिरा आवर्तन, बोगस बियाणे, उन्हाच्या तीव्रतेने फटका

जळगाव नेऊर : गेल्या एक महिन्यापासून शेतकऱ्यांच्या लाल कांद्यातून खर्च देखील वसूल होत नसल्याने थोड्याच दिवसात मोठ्या प्रमाणात येणारा उन्हाळी कांदाही करपा, बोगस बियाणे, उन्हाची तीव्रता यांच्या संकटात सापडला असून मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी उन्हाळी कांद्याचे उत्पादन घटणार आहे. कारण करपा, बोगस बियाणे, एक महिन्यापासून अतितीव्र उष्णता व येवला तालुक्यात अनेक भागात पालखेड डावा कालव्याचे आवर्तन उशिरा झाल्याने मोठ्या प्रमाणात कांद्याची होरपळ झाल्याने शेकडो हेक्टरवरील कांदा संकटात सापडला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादनात घट येणार आहे.पंधरा दिवसातून येणारे ढगाळ वातावरण, वादळी वाऱ्यासह पाऊस, करपा रोग याचा परिणाम उन्हाळी कांद्यावर झाला असून मोठ्या प्रमाणात औषधांच्या फवारण्या कराव्या लागत आहेत. उन्हाळी कांद्याने परिपक्व होण्याअगोदर माना टाकल्याने त्याचा परिणाम कांदा उत्पादनावर होत असून मोठ्या प्रमाणात केलेल्या खर्चातून म्हणावे असे उत्पादन निघणार नसल्याने खर्च वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. तसेच अपरिपक्व कांदा, गारपीटीत सापडलेला कांदा जास्त दिवस टिकत नसल्याने त्याचा परिणाम कांदा साठवणुकीवर होणार असल्याने शेतकऱ्यांना आहे त्या भावात कांदा विकावा लागणार आहे.यावर्षी घरगुती बियाण्याचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा शेतकऱ्यांनाआला, चालू हंगाम वाया जातो की काय या भीतीने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनीमिळेल त्या भावाने बियाण्याची खरेदी केली. यामुळे अनेक शेतकऱ्यांची कांदा बियाण्यातफसवणूक झाली आहे.लावले उन्हाळ निघाले लाल,डोंगळे, जोडकांदा, सफेद कांदाया पद्धतीने नित्कृष्ट दर्जाचा कांदा निघत असल्याने शेतकऱ्यांना तो कांदा आहे त्या भावात विक्री करावा लागत असल्याने शेतकरी आणखीनच संकटात सापडला आहेतर काही शेतकऱ्यांनी उन्हाळ कांदा लागवडीसाठी घेतलेले बियाणे लाल कांद्याचेनिघाल्याने देखील अनेकांचे नुकसान झाले.या संकटाबरोबरच एक महिन्यापासून थंडीचे प्रमाण कमी होऊन मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण झाल्याने त्याचा परिणाम कांदा परिपक्व होण्यावर झाला आहे. पाण्याची कमतरता भासत असून चार दिवसांआड पाणी द्यावे लागत असल्याने अनेक शेतकऱ्यांच्या विहिरींनी तळ गाठल्याने अनेक शेतकऱ्यांची पाण्याअभावी कांदा होरपळ झाली असून त्याचा परिणाम उन्हाळी कांद्यावर होत आहे.फेब्रुवारी महिन्यातील कांदा लागवडी संकटातयावर्षी पावसाने शेतकऱ्यांच्या रोपवाटिका खराब झाल्याने शेतकरी मिळेल त्या ठिकाणी बियाणे घेऊन रोपे तयार करत होता. पर्यायाने शेतकऱ्यांच्या कांदा लागवडी उशिरा झाल्या. अनेक शेतकऱ्यांनी फेब्रुवारी महिन्यात कांदा लागवडी केल्या. परंतु त्या कांदा लागवडी अतिउष्ण तापमान, थंडीची कमतरता भासत असल्याने कांद्याचा आकार बारीक झाला असून परिपक्वतेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.मी पाच एकरावर उन्हाळी कांद्याची लागवड केली आहे. घरचे बियाणे संपुष्टात आल्याने बाजारातून बियाणे खरेदी केले. त्यामध्ये ५० टक्के कांदे लाल निघाल्याने व पाहिजे तशी वाढ न झाल्याने कांदा आहे त्या भावात विकावा लागणार आहे तसेच गेल्या एक महिन्यापासून उन्हाची तीव्रता वाढल्याने कांदा वाढीवर परिणाम झाला असून उत्पादन कमी येणार आहे.- भाऊसाहेब शिरसाठ, कांदा उत्पादक शेतकरी 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती