शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर मदत दिली पाहिजे - आदित्य ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2019 21:06 IST

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत. या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्यांना बांधावर मदत दिली पाहिजे, असे मत शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी आज नाशिक येथे व्यक्त केले.

नाशिक - अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत. या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्यांना बांधावर मदत दिली पाहिजे, असे मत शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी आज नाशिक येथे व्यक्त केले.आदित्य ठाकरे यांनी आज मोहाडी, ओझर, निफाड यासह विविध ठिकाणी भेटी दिल्या. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, जिल्ह्यात मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. सरकारी यंत्रणा आपल्या परीने पंचनामे करीत आहे परंतु त्यापलिकडे जाऊन आता शेतकऱ्यांना बांधवरच मदत मिळाली पाहिजे असे ते म्हणाले. अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान पीक विम्याच्या अनेक निकषात बसत नाही त्यामुळे पीक विम्याच्या निकषात बदल केला पाहिजे असेही ते म्हणाले.2014 मध्ये झालेल्या गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही त्याबाबत अनेक शेतकऱ्यांनी आज तक्रारी केल्याचे सांगून आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भात नाशिकच्या विभागीय आयुक्तांशी चर्चा करणार असल्याचे ठाकरे म्हणाले. यावेळी ग्राम विकास राज्यमंत्री दादा भुसे तसेच शिवसेनेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेNashikनाशिकMaharashtraमहाराष्ट्रFarmerशेतकरी