शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
2
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
3
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
4
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
5
Technology: SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
6
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
7
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
8
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
9
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
10
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
11
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
12
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
13
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
14
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट
15
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
16
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
17
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
18
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
19
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
20
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन

गेल्या खरीपाच्या नुकसान भरपाईपासून शेतकरी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 15:15 IST

२०१८ मध्ये सुरूवातीला आगमन झालेल्या मान्सूनने नंतरच्या काळात पाठ फिरविली. परिणामी शेतकºयांच्या पेरण्या लांबणीवर पडल्या, ज्या वेळी शेतीपिकांना पाण्याची गरज होती, त्यावेळी पाऊस न पडल्यामुळे शेतीपिक वाया गेले. संपुर्ण हंगामात नाशिक जिल्ह्यात सरासरीच्या अवघे ८२ टक्केच पाऊस पडला.

ठळक मुद्देदुसरे वर्ष उजाडले : जिल्ह्यातील ३०८ गावे प्रतिक्षेतराज्यातील २६८ मंडळांमध्ये ८ नोव्हेंबर २०१८ रोजी दुष्काळ सदृष्य परिस्थिती जाहीर

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : गेल्या वर्षी अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय तत्कालीन सरकारने घेतला असला तरी, वर्ष उलटूनही दुष्काळग्रस्त शेतक-यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. नाशिकसह राज्यातील सुमारे २६८ मंडळांमध्ये शासनाची गेल्या वर्षाची घोषित मदत पोहोचलेली नसून, त्यातच यंदा अवकाळी पावसामुळे नुकसानीची भर पडल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

२०१८ मध्ये सुरूवातीला आगमन झालेल्या मान्सूनने नंतरच्या काळात पाठ फिरविली. परिणामी शेतकºयांच्या पेरण्या लांबणीवर पडल्या, ज्या वेळी शेतीपिकांना पाण्याची गरज होती, त्यावेळी पाऊस न पडल्यामुळे शेतीपिक वाया गेले. संपुर्ण हंगामात नाशिक जिल्ह्यात सरासरीच्या अवघे ८२ टक्केच पाऊस पडला. त्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने राज्य सरकारने दुष्काळ सदृष्य परिस्थिती जाहीर करून पिक पंचनामे केले. त्यासाठी मात्र तालुक्याचा एकूण पाऊस हा निकष ग्राह्य धरल्याने अनेक गावातील शेतक-यांच्या पिक पंचनामे होवू शकले नाहीत. शेतक-यांच्या होणा-या तकारींची दखल घेत शासनाने उशिराने का होईना दुष्काळी परिस्थितीला सामोरे गेलेल्या शेतक-यांचेही पीक पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार राज्यातील २६८ मंडळांमध्ये राज्य सरकारने ८ नोव्हेंबर २०१८ रोजी दुष्काळ सदृष्य परिस्थिती जाहीर केली. त्यात नाशिक जिल्ह्यातील येवला, निफाड, कळवण, दिंडोरी तालुक्यांमधील १७ महसुली मंडळांचा समावेश करण्यात आलेला होता. त्यामध्ये येवला तालुक्यातील नगरसूल,अंदरसूल,पाटोदा,सावरगाव व जळगाव नेवूर तर निफाड तालुक्यातील देवगाव,नांदूरमध्यमेश्वर, रानवड, चांदोरी,सायखेडा या सहा मंडळात दुष्काळ जाहीर केलेला होता. कळवण तालुक्यातील कळवण,नवी बेज,मोकभणगी तर दिंडोरी तालुक्यातील दिंडोरी,मोहाडी आणि वरखेडा या मंडळांचा समावेश होता. जिह्यातील एकूण १७ महसुली मंडळांमधील दुष्काळाने पिडीत ३०८ गावांचा यामध्ये समावेश आहे. एकट्या येवला तालुक्यातील ५ महसुल मंडळामधील ६०,९९९ बाधीत शेतकरी रुपये ५५ कोटी ९७ लक्ष ३५ हजार ८६४ रक्कम मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. या संदर्भात राष्टÑवादीचे नेते आमदार छगन भुजबळ यांनी राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांना पत्र पाठवून शेतकºयांना मदत करण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिक