शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे पोलिसांची मोठी कारवाई! ससूनच्या डॉक्टरांनी बिल्डर बाळाचे रक्ताचे नमुने बदलले; दोघांना अटक
2
"तुला मिळणार नाही, मोठ्याला घेऊन ये"; पुण्यात अचानक दारु विक्रीचे 'नियम' लागू झाले
3
भीषण! इस्रायलने राफामध्ये केला एअर स्ट्राईक; 35 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
4
४ जूनला मतमोजणी, १ जूनला इंडिया आघाडीची मोठी बैठक; केजरीवाल, स्टॅलिन यांना निमंत्रण
5
मालेगावच्या माजी महापौरांवर मध्यरात्री गोळीबार; हॉटेलमध्ये तीन गोळ्या झाडल्या, अब्दुल मलिक जखमी
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, Adani Portsच्या शेअरमध्ये तेजी, Wipro घसरला
7
"भारतात आजही सावरकरांचे विचार लागू..."; रणदीप हूडाने मनातली भावना स्पष्टच सांगितली
8
डावखरेंचा पत्ता कापला? भाजपला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी विधान परिषदेसाठी उमेदवार उतरवला
9
गुरु रंधावा-शहनाज गीलच्या डेटिंगचं सत्य आलं समोर; गायकाने केला खुलासा, म्हणाला, 'मी डेट करायला सुरुवात...'
10
आजचे राशीभविष्य: भागीदारीत लाभ, प्रतिस्पर्ध्यांवर मात; हातून सत्कार्य घडेल, भाग्याचा दिवस
11
जान्हवी कपूरने शेअर केला हिंदी मालिकेचा प्रोमो, ऋतुजा बागवेची आहे मुख्य भूमिका
12
मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ: घटलेल्या मतदानाचा नेमका फटका कोणाला बसणार?
13
JioCinema चा आणखी एक धमाका! अवाक् करणाऱ्या किंमतीत मिळणार प्रीमिअम ॲन्युअल प्लॅन, पाहा डिटेल्स
14
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ: अंधेरी पश्चिममधील मतदान महत्त्वाचे ठरणार!
15
६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना जून ठरेल शानदार, नवीन ओळख फायदेशीर; सुवर्ण संधी, सुखाचा काळ!
16
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ: कमी मतदानामुळे संभ्रमाची स्थिती, नक्की काय होणार?
17
ठाण्यात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, बाहेर पडण्यासाठी मार्ग अपुरा; गेमिंग झोनमध्ये तुटपुंजी अग्निरोधक यंत्रणा
18
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: आरोपी भावेश भिंडेच्या कोठडीत चार दिवसांची वाढ
19
सायन हॉस्पिटल अपघात प्रकरण: चौकशीनंतर दोषींवर होणार कठोर कारवाई- अतिरिक्त आयुक्त
20
विशेष लेख: असह्य उन्हाळ्याचा आता मेंदूवरही परिणाम! दाहाचे संकट केवळ ‘गार वाटण्या’ने सुटणारे नाही

रेल्वे प्रकल्पाच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 10:13 PM

रेल्वे प्रकल्प भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध कायम असून, याप्रकरणी इगतपुरी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे.

ठळक मुद्दे इगतपुरी तहसीलदारांना निवेदन : जमिनमालकांचा आक्रमक पवित्रा

नांदूरवैद्य : रेल्वे प्रकल्प भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध कायम असून, याप्रकरणी इगतपुरी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे.इगतपुरी ते मनमाड असणाºया रेल्वेमार्गाचे विस्तारीकरण करण्यात येणार असल्याने या रेल्वेमार्गाच्या दुतर्फा असलेल्या शेतकºयांच्या जमिनी संपादनाबाबत इगतपुरी तालुक्यातील कुºहेगाव, पाडळी देशमुख, मुकणे तसेच नाशिक तालुक्यातील वंजारवाडी व लोहशिंगवे येथे नुकत्याच रेल्वे प्रकल्प अधिकारी व शेतकरी यांच्यामध्ये बैठका पार पडल्या आहे.येथील शेतकºयांनी आक्रमक पवित्रा घेत या प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवला असून, आज इगतपुरी तालुक्यातील कुºहेगाव येथील शेतकºयांनी प्रकल्पाला आपला विरोध कायम दर्शवत आज शुक्रवारी (दि. १४) रोजी इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना निवेदन देण्यात आले. इगतपुरी तालुक्यातील कुºहेगाव येथील शेतकºयांनी रेल्वे प्रकल्पाला आपला विरोध कायम ठेवत प्रकल्प रद्द करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. याआधीच शासनाने लष्कराच्या गोळीबार प्रशिक्षणासाठी हजारो हेक्टर जमिनी संपादित केल्या असून, आता उर्वरित जमिनीदेखील शासन रेल्वे प्रकल्पासाठी संपादित करत असल्यामुळे या परिसरातील शेतकºयांवर उपासमारीची वेळ येईल यामुळे येथील शेतकºयांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.सध्या ज्या उर्वरित जमिनी शिल्लक आहेत त्यावरच अनेकांचा उदरनिर्वाह चालत असून, जर शासनाने हाती असलेली जमीनही रेल्वे प्रकल्पासाठी संपादित करत असल्याने आम्हाला आत्महत्येशिवाय पर्याय नसल्याचे कुºहेगाव येथील सर्व शेतकºयांनी निवेदनात म्हटले आहे.यावेळी अंबादास धोंगडे, जगन धोंगडे, भाऊसाहेब सुरेश धोंगडे, संपत धोंगडे, विशाल गव्हाणे, गणेश धोंगडे, ज्ञानेश्वर धोंगडे आदींसह शेतकरी उपस्थित होते.रेल्वे प्रकल्प अधिकारी व शेतकरी यांच्यामध्ये झालेल्या बैठकीत येथील शेतकºयांनीदेखील आक्रमकता दाखवत विरोध केला. यावेळी आक्रमक भूमिका घेत सांगितले की, शासन प्रकल्पासाठी जमीन घेणारच आहे तर आधी शेतकºयांशी चर्चा करून योग्य तो मोबदला देण्यात यावा तसेच रेल्वे प्रकल्पास जमिनी देऊन भूमिहीन झालेल्यांना कुटुंबातील एका व्यक्तीला रेल्वेत नोकरी देण्यात यावी. अन्यथा हा प्रकल्प बंद पाडण्यात येईल, अशी आक्रमक भूमिका कुºहेगाव येथील शेतकºयांनी घेतली आहे.

बेलगाव कुºहे व नांदूरवैद्य येथील हजारो हेक्टर जमिनी याआधीच लष्कराच्या ताब्यात गेल्यामुळे येथील अनेक शेतकरी भूमिहीन झाले आहेत. त्यातच त्यांच्या मुलांना आजपर्यंत नोकरीत सामावून घेतले नसून आता या प्रकल्पाला आमचा पूर्ण व प्रखर विरोध असून, कुटुंबातील एका सदस्यास रेल्वेत नोकरी देण्यात यावी अन्यथा हा लोहमार्ग बंद करण्यात येईल.- संगीता घोंगडे, सरपंच, कुºहेगाव

टॅग्स :StrikeसंपTahasildarतहसीलदार