शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

मागणीअभावी दरात घसरण; कांदा उत्पादकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 00:39 IST

लासलगाव : कोरोनामुळे झालेली निर्यातबंदी आणि मागणीअभावी दरात झालेल्या घसरणीमुळे कांदा उत्पादकांची आर्थिक कोंडी झाली आहे.कांदा साठवणुकीचे प्रमाण जिल्ह्यातील देवळा, सटाणा, येवला, निफाड, मालेगाव, सिन्नर व कळवण तालुक्यात अधिक असल्याने येथील शेतकऱ्यांना फटका बसत आहे.

लासलगाव : कोरोनामुळे झालेली निर्यातबंदी आणि मागणीअभावी दरात झालेल्या घसरणीमुळे कांदा उत्पादकांची आर्थिक कोंडी झाली आहे.कांदा साठवणुकीचे प्रमाण जिल्ह्यातील देवळा, सटाणा, येवला, निफाड, मालेगाव, सिन्नर व कळवण तालुक्यात अधिक असल्याने येथील शेतकऱ्यांना फटका बसत आहे.या कमी भावाची परिस्थिती अशीच राहील तर जिल्ह्यात चौदा कांदा बाजारपेठेत प्रतीदिनविक्र ी होणाºयाकांद्याच्या प्रतिक्विंटलमागे तीनशे त पाचशे रूपयांचे नुकसानीचा हिशोब केला तर महिन्यात कित्येक कोटीचा फटका बसणार आहे. आगामी काळात कांदा उपलब्धतेचे गणित कांदा टिकवण क्षमतेवर अवलंबून असणार असल्याचे जात आहे. उन्हाळ कांदा दीर्घ काळ टिकत असल्याने उत्पादकांना दोन पैसे अधिक मिळण्याची अपेक्षा असते. किमान उत्पादन खर्चापेक्षा त्यास जादा भाव मिळतो. गेल्या वर्षी मे ते जुलै या कालावधीत क्विंटलला सरासरी एक हजार ते १३०० रु पयांपर्यंत दर मिळाले होते. या वर्षी कोरोनाच्या संकटाने उत्पादकांचे गणित विस्कटले आहे.कांदा भाववाढीच्या अपेक्षेने चाळीत साठवला कांदामागील वर्षी उन्हाळ कांदा दरात शेतकऱ्यांनी मोठी दरवाढ अनुभवली. याच अपेक्षेने कांदा यावर्षीही साठवून ठेवला.कांदा उत्पादनही वाढले आहे.मात्र चाळीमध्ये साठवलेला कांदा विक्र ीस बाहेर न गेल्याने व पावसाळी वातावरणाने खराब होण्याची भिती आहे. त्यामुळे होणारे नुकसान वेळीच थांबविण्यासाठी कांदाचाळी फोडल्या जात आहेत. मात्र बाजारामध्येही अपेक्षित परतावा मिळत नसल्याने नाराजी आहे.मागील वर्षीच्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे कांदा उत्पादकांचे नुकसान झाले होते. दरात वाढ होऊनही उत्पादन खर्च वसूल झाला नव्हता. त्यामुळे पुढे दरात तेजी असल्याने व पाणीसाठा वाढल्याने शेतकºयांनी उन्हाळ कांदा लागवडीला पसंतीदिली.काढणीनंतर दराच्या अपेक्षेने कांदा साठवून ठेवला. मात्र आता साठवलेला कांदा टिकवण क्षमतेअभावी खराब होत असल्याने शेतकºयांच्या चिंतेत वाढ झाली आहे.अनेक देशात निर्बंधामुळे निर्यात देखील थंडावली आहे. मे ते जुलै या कालावधीत सरासरी भाव गत वर्षीच्या तुलनेत ३०० ते ५०० रु पयांनी घसरले आहेत. त्यामुळे दराची पातळी सरासरी सातशे तर सर्वाधिक नऊशे रूपयांची आहे. प्रति क्विंटल पाचशे रूपयांचा फटका सहन करावा लागला .----------------------मार्चपर्यंत भारतातून निर्यात बंदी होती. निर्यातबंदीच्या काळात पाकिस्तानसह अन्य काही देशांनी भारतीय कांद्याची परदेशी बाजारपेठ काबीज केली. कोरोनाच्या टाळेबंदीत अनेक देशात निर्बंध आहेत. याचा निर्यातीस फटका बसला. केंद्र सरकारने निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी अनुदान दिले होते. तेही बंद करण्यात आले असून निर्यातीला सरकारने प्रोत्साहन योजना जाहीर करून परकीय चलनाची भर घालणे आवश्यक आहे.- सुवर्णा जगताप,सभापती, लासलगाव

टॅग्स :Nashikनाशिक