शहरं
Join us  
Trending Stories
1
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
2
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
3
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
4
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
5
'लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला', हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं कौतुक 
6
सिंह राशीसाठी नवीन वर्ष 2026 स्वप्नपूर्तीचे वर्ष; आश्चर्याचे धक्के आणि परदेश प्रवासाचे योग!
7
नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय?
8
अदानी ग्रुपकडून मिळाली ₹3400 कोटींची ऑर्डर, झटक्यात ५% नं वधारला शेअर; आता खरेदीसाठी उडाली लोकांची झुंबड
9
गणपती बाप्पा सांताक्लॉजच्या वेशात? जाहिरातीवर मनसेचा संताप; केंद्र सरकारवर केली टीका!
10
गृहकर्जाचा हप्ता वाढलाय? 'लोन ट्रान्सफर'ने वाचवा लाखो रुपये; कमी व्याजासाठी बँक कशी बदलावी?
11
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
12
बापरे! हिवाळ्यात 'या' छोट्या चुकांमुळे वेगाने गळू लागतात केस, टक्कल पडण्याची वाटते भीती
13
भाजपानं 'या' राज्यात इतिहास रचला, पहिल्यांदाच पक्षाचा महापौर बनला; विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा संकेत
14
"आम्हाला मुलांमध्ये अजिबात रस नाही"; २ मैत्रिणी एकमेकींच्या प्रेमात झाल्या वेड्या, बांधली लग्नगाठ
15
Swami Samartha: आपल्यावर सद्गुरू कृपा आहे की नाही हे ओळखण्याचा सोपा मार्ग जाणून घ्या
16
अबरारची दहशत अन् रहमान डकैतचा स्वॅग! पडद्यावरच्या 'बॅड बॉईज'ने कशी लुटली लाइमलाइट?
17
५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर 'हा' शेअर; आज जोरदार तेजी, चांदीतील तेजी ठरतेय कारण
18
"हॉस्पिटलनेच माझ्या पतीला मारलं, मला म्हणाले..."; पत्नीने सांगितली काळजात चर्र करणारी गोष्ट
19
२ देशांसोबत मिळून चीननं शेजारील देशात चढवला जोरदार हल्ला, ४५४ इमारती उद्ध्वस्त; शेकडो अटकेत
20
नोकरी गेली तरी आर्थिक चक्र थांबू नका! संकटकाळात EMI आणि SIP चे व्यवस्थापन कसे कराल? तज्ज्ञांचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

मागणीअभावी दरात घसरण; कांदा उत्पादकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 00:39 IST

लासलगाव : कोरोनामुळे झालेली निर्यातबंदी आणि मागणीअभावी दरात झालेल्या घसरणीमुळे कांदा उत्पादकांची आर्थिक कोंडी झाली आहे.कांदा साठवणुकीचे प्रमाण जिल्ह्यातील देवळा, सटाणा, येवला, निफाड, मालेगाव, सिन्नर व कळवण तालुक्यात अधिक असल्याने येथील शेतकऱ्यांना फटका बसत आहे.

लासलगाव : कोरोनामुळे झालेली निर्यातबंदी आणि मागणीअभावी दरात झालेल्या घसरणीमुळे कांदा उत्पादकांची आर्थिक कोंडी झाली आहे.कांदा साठवणुकीचे प्रमाण जिल्ह्यातील देवळा, सटाणा, येवला, निफाड, मालेगाव, सिन्नर व कळवण तालुक्यात अधिक असल्याने येथील शेतकऱ्यांना फटका बसत आहे.या कमी भावाची परिस्थिती अशीच राहील तर जिल्ह्यात चौदा कांदा बाजारपेठेत प्रतीदिनविक्र ी होणाºयाकांद्याच्या प्रतिक्विंटलमागे तीनशे त पाचशे रूपयांचे नुकसानीचा हिशोब केला तर महिन्यात कित्येक कोटीचा फटका बसणार आहे. आगामी काळात कांदा उपलब्धतेचे गणित कांदा टिकवण क्षमतेवर अवलंबून असणार असल्याचे जात आहे. उन्हाळ कांदा दीर्घ काळ टिकत असल्याने उत्पादकांना दोन पैसे अधिक मिळण्याची अपेक्षा असते. किमान उत्पादन खर्चापेक्षा त्यास जादा भाव मिळतो. गेल्या वर्षी मे ते जुलै या कालावधीत क्विंटलला सरासरी एक हजार ते १३०० रु पयांपर्यंत दर मिळाले होते. या वर्षी कोरोनाच्या संकटाने उत्पादकांचे गणित विस्कटले आहे.कांदा भाववाढीच्या अपेक्षेने चाळीत साठवला कांदामागील वर्षी उन्हाळ कांदा दरात शेतकऱ्यांनी मोठी दरवाढ अनुभवली. याच अपेक्षेने कांदा यावर्षीही साठवून ठेवला.कांदा उत्पादनही वाढले आहे.मात्र चाळीमध्ये साठवलेला कांदा विक्र ीस बाहेर न गेल्याने व पावसाळी वातावरणाने खराब होण्याची भिती आहे. त्यामुळे होणारे नुकसान वेळीच थांबविण्यासाठी कांदाचाळी फोडल्या जात आहेत. मात्र बाजारामध्येही अपेक्षित परतावा मिळत नसल्याने नाराजी आहे.मागील वर्षीच्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे कांदा उत्पादकांचे नुकसान झाले होते. दरात वाढ होऊनही उत्पादन खर्च वसूल झाला नव्हता. त्यामुळे पुढे दरात तेजी असल्याने व पाणीसाठा वाढल्याने शेतकºयांनी उन्हाळ कांदा लागवडीला पसंतीदिली.काढणीनंतर दराच्या अपेक्षेने कांदा साठवून ठेवला. मात्र आता साठवलेला कांदा टिकवण क्षमतेअभावी खराब होत असल्याने शेतकºयांच्या चिंतेत वाढ झाली आहे.अनेक देशात निर्बंधामुळे निर्यात देखील थंडावली आहे. मे ते जुलै या कालावधीत सरासरी भाव गत वर्षीच्या तुलनेत ३०० ते ५०० रु पयांनी घसरले आहेत. त्यामुळे दराची पातळी सरासरी सातशे तर सर्वाधिक नऊशे रूपयांची आहे. प्रति क्विंटल पाचशे रूपयांचा फटका सहन करावा लागला .----------------------मार्चपर्यंत भारतातून निर्यात बंदी होती. निर्यातबंदीच्या काळात पाकिस्तानसह अन्य काही देशांनी भारतीय कांद्याची परदेशी बाजारपेठ काबीज केली. कोरोनाच्या टाळेबंदीत अनेक देशात निर्बंध आहेत. याचा निर्यातीस फटका बसला. केंद्र सरकारने निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी अनुदान दिले होते. तेही बंद करण्यात आले असून निर्यातीला सरकारने प्रोत्साहन योजना जाहीर करून परकीय चलनाची भर घालणे आवश्यक आहे.- सुवर्णा जगताप,सभापती, लासलगाव

टॅग्स :Nashikनाशिक