शहरं
Join us  
Trending Stories
1
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
5
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
7
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
8
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
9
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
10
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
11
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
12
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
13
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
14
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
15
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
16
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
17
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
18
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
19
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
20
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण

मागणीअभावी दरात घसरण; कांदा उत्पादकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 00:39 IST

लासलगाव : कोरोनामुळे झालेली निर्यातबंदी आणि मागणीअभावी दरात झालेल्या घसरणीमुळे कांदा उत्पादकांची आर्थिक कोंडी झाली आहे.कांदा साठवणुकीचे प्रमाण जिल्ह्यातील देवळा, सटाणा, येवला, निफाड, मालेगाव, सिन्नर व कळवण तालुक्यात अधिक असल्याने येथील शेतकऱ्यांना फटका बसत आहे.

लासलगाव : कोरोनामुळे झालेली निर्यातबंदी आणि मागणीअभावी दरात झालेल्या घसरणीमुळे कांदा उत्पादकांची आर्थिक कोंडी झाली आहे.कांदा साठवणुकीचे प्रमाण जिल्ह्यातील देवळा, सटाणा, येवला, निफाड, मालेगाव, सिन्नर व कळवण तालुक्यात अधिक असल्याने येथील शेतकऱ्यांना फटका बसत आहे.या कमी भावाची परिस्थिती अशीच राहील तर जिल्ह्यात चौदा कांदा बाजारपेठेत प्रतीदिनविक्र ी होणाºयाकांद्याच्या प्रतिक्विंटलमागे तीनशे त पाचशे रूपयांचे नुकसानीचा हिशोब केला तर महिन्यात कित्येक कोटीचा फटका बसणार आहे. आगामी काळात कांदा उपलब्धतेचे गणित कांदा टिकवण क्षमतेवर अवलंबून असणार असल्याचे जात आहे. उन्हाळ कांदा दीर्घ काळ टिकत असल्याने उत्पादकांना दोन पैसे अधिक मिळण्याची अपेक्षा असते. किमान उत्पादन खर्चापेक्षा त्यास जादा भाव मिळतो. गेल्या वर्षी मे ते जुलै या कालावधीत क्विंटलला सरासरी एक हजार ते १३०० रु पयांपर्यंत दर मिळाले होते. या वर्षी कोरोनाच्या संकटाने उत्पादकांचे गणित विस्कटले आहे.कांदा भाववाढीच्या अपेक्षेने चाळीत साठवला कांदामागील वर्षी उन्हाळ कांदा दरात शेतकऱ्यांनी मोठी दरवाढ अनुभवली. याच अपेक्षेने कांदा यावर्षीही साठवून ठेवला.कांदा उत्पादनही वाढले आहे.मात्र चाळीमध्ये साठवलेला कांदा विक्र ीस बाहेर न गेल्याने व पावसाळी वातावरणाने खराब होण्याची भिती आहे. त्यामुळे होणारे नुकसान वेळीच थांबविण्यासाठी कांदाचाळी फोडल्या जात आहेत. मात्र बाजारामध्येही अपेक्षित परतावा मिळत नसल्याने नाराजी आहे.मागील वर्षीच्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे कांदा उत्पादकांचे नुकसान झाले होते. दरात वाढ होऊनही उत्पादन खर्च वसूल झाला नव्हता. त्यामुळे पुढे दरात तेजी असल्याने व पाणीसाठा वाढल्याने शेतकºयांनी उन्हाळ कांदा लागवडीला पसंतीदिली.काढणीनंतर दराच्या अपेक्षेने कांदा साठवून ठेवला. मात्र आता साठवलेला कांदा टिकवण क्षमतेअभावी खराब होत असल्याने शेतकºयांच्या चिंतेत वाढ झाली आहे.अनेक देशात निर्बंधामुळे निर्यात देखील थंडावली आहे. मे ते जुलै या कालावधीत सरासरी भाव गत वर्षीच्या तुलनेत ३०० ते ५०० रु पयांनी घसरले आहेत. त्यामुळे दराची पातळी सरासरी सातशे तर सर्वाधिक नऊशे रूपयांची आहे. प्रति क्विंटल पाचशे रूपयांचा फटका सहन करावा लागला .----------------------मार्चपर्यंत भारतातून निर्यात बंदी होती. निर्यातबंदीच्या काळात पाकिस्तानसह अन्य काही देशांनी भारतीय कांद्याची परदेशी बाजारपेठ काबीज केली. कोरोनाच्या टाळेबंदीत अनेक देशात निर्बंध आहेत. याचा निर्यातीस फटका बसला. केंद्र सरकारने निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी अनुदान दिले होते. तेही बंद करण्यात आले असून निर्यातीला सरकारने प्रोत्साहन योजना जाहीर करून परकीय चलनाची भर घालणे आवश्यक आहे.- सुवर्णा जगताप,सभापती, लासलगाव

टॅग्स :Nashikनाशिक