शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
4
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
5
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
6
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
7
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
8
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
9
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
10
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
11
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
12
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
13
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
14
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
15
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
16
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
17
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
18
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
19
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
20
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....

मागणीअभावी दरात घसरण; कांदा उत्पादकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 00:39 IST

लासलगाव : कोरोनामुळे झालेली निर्यातबंदी आणि मागणीअभावी दरात झालेल्या घसरणीमुळे कांदा उत्पादकांची आर्थिक कोंडी झाली आहे.कांदा साठवणुकीचे प्रमाण जिल्ह्यातील देवळा, सटाणा, येवला, निफाड, मालेगाव, सिन्नर व कळवण तालुक्यात अधिक असल्याने येथील शेतकऱ्यांना फटका बसत आहे.

लासलगाव : कोरोनामुळे झालेली निर्यातबंदी आणि मागणीअभावी दरात झालेल्या घसरणीमुळे कांदा उत्पादकांची आर्थिक कोंडी झाली आहे.कांदा साठवणुकीचे प्रमाण जिल्ह्यातील देवळा, सटाणा, येवला, निफाड, मालेगाव, सिन्नर व कळवण तालुक्यात अधिक असल्याने येथील शेतकऱ्यांना फटका बसत आहे.या कमी भावाची परिस्थिती अशीच राहील तर जिल्ह्यात चौदा कांदा बाजारपेठेत प्रतीदिनविक्र ी होणाºयाकांद्याच्या प्रतिक्विंटलमागे तीनशे त पाचशे रूपयांचे नुकसानीचा हिशोब केला तर महिन्यात कित्येक कोटीचा फटका बसणार आहे. आगामी काळात कांदा उपलब्धतेचे गणित कांदा टिकवण क्षमतेवर अवलंबून असणार असल्याचे जात आहे. उन्हाळ कांदा दीर्घ काळ टिकत असल्याने उत्पादकांना दोन पैसे अधिक मिळण्याची अपेक्षा असते. किमान उत्पादन खर्चापेक्षा त्यास जादा भाव मिळतो. गेल्या वर्षी मे ते जुलै या कालावधीत क्विंटलला सरासरी एक हजार ते १३०० रु पयांपर्यंत दर मिळाले होते. या वर्षी कोरोनाच्या संकटाने उत्पादकांचे गणित विस्कटले आहे.कांदा भाववाढीच्या अपेक्षेने चाळीत साठवला कांदामागील वर्षी उन्हाळ कांदा दरात शेतकऱ्यांनी मोठी दरवाढ अनुभवली. याच अपेक्षेने कांदा यावर्षीही साठवून ठेवला.कांदा उत्पादनही वाढले आहे.मात्र चाळीमध्ये साठवलेला कांदा विक्र ीस बाहेर न गेल्याने व पावसाळी वातावरणाने खराब होण्याची भिती आहे. त्यामुळे होणारे नुकसान वेळीच थांबविण्यासाठी कांदाचाळी फोडल्या जात आहेत. मात्र बाजारामध्येही अपेक्षित परतावा मिळत नसल्याने नाराजी आहे.मागील वर्षीच्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे कांदा उत्पादकांचे नुकसान झाले होते. दरात वाढ होऊनही उत्पादन खर्च वसूल झाला नव्हता. त्यामुळे पुढे दरात तेजी असल्याने व पाणीसाठा वाढल्याने शेतकºयांनी उन्हाळ कांदा लागवडीला पसंतीदिली.काढणीनंतर दराच्या अपेक्षेने कांदा साठवून ठेवला. मात्र आता साठवलेला कांदा टिकवण क्षमतेअभावी खराब होत असल्याने शेतकºयांच्या चिंतेत वाढ झाली आहे.अनेक देशात निर्बंधामुळे निर्यात देखील थंडावली आहे. मे ते जुलै या कालावधीत सरासरी भाव गत वर्षीच्या तुलनेत ३०० ते ५०० रु पयांनी घसरले आहेत. त्यामुळे दराची पातळी सरासरी सातशे तर सर्वाधिक नऊशे रूपयांची आहे. प्रति क्विंटल पाचशे रूपयांचा फटका सहन करावा लागला .----------------------मार्चपर्यंत भारतातून निर्यात बंदी होती. निर्यातबंदीच्या काळात पाकिस्तानसह अन्य काही देशांनी भारतीय कांद्याची परदेशी बाजारपेठ काबीज केली. कोरोनाच्या टाळेबंदीत अनेक देशात निर्बंध आहेत. याचा निर्यातीस फटका बसला. केंद्र सरकारने निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी अनुदान दिले होते. तेही बंद करण्यात आले असून निर्यातीला सरकारने प्रोत्साहन योजना जाहीर करून परकीय चलनाची भर घालणे आवश्यक आहे.- सुवर्णा जगताप,सभापती, लासलगाव

टॅग्स :Nashikनाशिक