शहरं
Join us  
Trending Stories
1
Local Body Elections: नगरांच्या निवडणुकांमध्ये 'दुसरा' टप्पा, काही ठिकाणी २० डिसेंबरला मतदान
2
हाताला सलाइन, नाकाला ऑक्सिजन पाइप; छगन भुजबळांचा रुग्णालयातून प्रचार, भावनिक होत म्हणाले...
3
IND vs SA 1st ODI : टॉस गमावला, पण मॅच जिंकली! कसोटीतील बिघाडीनंतर टीम इंडियाची वनडे मालिकेत आघाडी
4
“कितीही करा कल्ला, मालवण शिवसेनेचाच बालेकिल्ला”: एकनाथ शिंदे; निलेश राणेंचेही केले कौतुक
5
“मुंबईत ठाकरेंचे काही चालणार नाही, उद्धव यांनी राज यांना सोबत घेऊन चूक केली”; कुणाचा दावा?
6
“नवरा १००₹ देत नव्हता, पण देवाभाऊ लाडक्या बहिणींना १५०० देतात”; भाजपा नेत्यांचे विधान चर्चेत
7
SIR तपासात गडबड उघड! गोव्यात ९० हजार मतदारांवरील मोठी विसंगती आली समोर; अधिकारी म्हणाले...
8
०१ डिसेंबरला रेल्वे नियम बदलणार! तत्काळ तिकिटासाठी लागणार OTP; मुंबईतील ‘या’ ट्रेनपासून सुरू
9
“जिकडे बॉम्बे असेल तिकडे मुंबई करू, शाळेची नावेही बदलू”; उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला निर्धार
10
IND vs SA 1st ODI : कुलदीपनं ३ चेंडूत फिरवली मॅच! एकाच ओव्हरमध्ये २ विकेट्स अन्...
11
VIDEO : "समझने वालों को इशारा काफी!" विराटला गंभीरची मिठी; पण रोहितची रिअ‍ॅक्शनच ठरली 'शोस्टॉपर'
12
दिल्लीतील पराभवानंतर अवध ओझा सरांचा राजकारणाला रामराम; AAP मधून बाहेर पडले...
13
VIDEO : "उपकार विसरू नका! नाहीतर…" बेताल वक्तव्य करणाऱ्या SA कोचला गावसकरांनी दिली ताकीद
14
IND vs SA : अनुभवी फलंदाजांनी पेश केला खास नजराणा; किंग कोहली अन् रोहितसह KL राहुलनं दाखवला क्लास!
15
छेड काढल्याचा आरोप, वैद्यकीय अधिकाऱ्याला नातेवाईकांची मारहाण
16
२४ तासांत ७ स्फोटांनी हादरले बलुचिस्तान! रेल्वे ट्रॅक बॉम्बने उडवला; पोलिस ठाण्यावर ग्रेनेड हल्ला
17
गीता जयंती २०२५: सगळी भगवद्गीता नको, सुखी जीवनासाठी ५ उपदेश कायम लक्षात ठेवा; वाचा, गीतासार
18
आईच्या कुशीत झोपलेल्या चिमुकल्याला बिबट्या घेऊन गेला, गावात भीतीचे वातावरण...
19
जगाला धक्का! नामिबियात 'एडोल्फ हिटलर' सलग पाचव्यांदा विजयी; वाद वाढताच नेत्याने घेतला मोठा निर्णय...
20
'रनमशिन' कोहलीचा मोठा पराक्रम! क्रिकेटच्या देवाला मागे टाकत बनला वनडेतील शतकांचा 'बादशहा'
Daily Top 2Weekly Top 5

साडेतीन महिन्यात ४० हजार मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2022 01:15 IST

द्राक्ष हंगाम सुरू होऊन दोन महिन्यांचा काळ पूर्ण होत असला तरी अद्याप निर्यातीला फारशी चालना मिळालेली दिसत नाही. साडेतीन महिन्यात युरोप आणि इतर देशांमध्ये ४०१०३ मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात झाली आहे. दरम्यान, अद्याप ग्राहकांच्या पसंतीस उतरतील अशी द्राक्ष तयार होत नसल्याने बागायतदारांमध्येही चिंता व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्देप्रतवारीवर ठरतोय दर : थंडीमुळे साखर उतरण्यास होतोय विलंब

नाशिक : द्राक्ष हंगाम सुरू होऊन दोन महिन्यांचा काळ पूर्ण होत असला तरी अद्याप निर्यातीला फारशी चालना मिळालेली दिसत नाही. साडेतीन महिन्यात युरोप आणि इतर देशांमध्ये ४०१०३ मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात झाली आहे. दरम्यान, अद्याप ग्राहकांच्या पसंतीस उतरतील अशी द्राक्ष तयार होत नसल्याने बागायतदारांमध्येही चिंता व्यक्त केली जात आहे. देशांतर्गत बाजारपेठेत पांढऱ्या द्राक्षांना ३५ ते ५५ रुपये, तर काळ्या द्राक्षांना ५० ते ७५ रुपये प्रति किलो इतका दर मिळत आहे. निर्यातक्षम द्राक्षांना ६५ ते ८० रुपयांचा दर मिळत आहे. या वर्षी थंडीचे प्रमाण अधिक राहिल्याने अद्याप द्राक्षांमध्ये म्हणावा तसा गोडवा उतरलेला नसल्याचे द्राक्ष उत्पादकांकडून सांगितले जात आहे. जिल्ह्यात ऑक्टोंबरपासून अर्ली द्राक्षांचा हंगाम सुरू होतो. त्यानंतर जानेवारीपासून नियमित हंगामास सुरुवात होत असते. नियमित हंगाम सुरू होऊन जवळपास दोन महिन्यांचा कालावधी होत आला असला तरी शेतकऱ्यांचा अपेक्षेप्रमाणे अद्याप मालाला उठाव नाही. देशात यावर्षी सर्वत्र थंडीचे प्रमाण अधिक असल्याने अद्याप द्राक्षांना फारशी मागणी नसल्याने अनेक द्राक्षबागांमध्ये अद्याप तोडा सुरू झालेला नाही. थंडी जास्त काळ राहिल्याने अजूनही परिपक्व द्राक्षांना मनाप्रमाणे कलर येत नाही, त्याचप्रमाणे साखर उतरण्याचे प्रमाणही कमी जास्त होत असल्यामुळे फारसा गोडवा जाणवत नाही. यामुळे द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

चौकट-

हंगाम सुरू झाल्यानंतर १ नोव्हेंबर ते २१ फेब्रुवारी दरम्यान जिल्ह्यातून युरोपमध्ये २४९०० मेट्रिक टन तर नॉन युरोपियन देशांमध्ये १५२०३ मेट्रिक टन इतकीच द्राक्ष निर्यात झाली आहेत. २७८९ कंटेनरमधून हा माल परदेशांमध्ये पाठविण्यात आला आहे. देशांतर्गत बाजारपेठेतही द्राक्षाला अद्याप मागणी वाढलेली नाही. यामुळे पुढील काळात काय स्थिती राहील याचा अंदाज बांधणे कठीण असल्याने बागायतदारांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

चौकट-

द्राक्षांची प्रत, त्यातील साखरेचे प्रमाण यावरून त्याचे दर ठरत असतात. यावर्षी काही बागांमध्ये द्राक्ष परिपक्व झाले. मात्र गोडवा कमी असल्याचे दिसून येत आहे. याचा परिणाम दरांवर होत आहे. गोडवा उतरत नाही असे नाही, पण त्यास थोडा अधिक काळ जाऊ द्यावा लागत आहे. त्याचाही उत्पादकांना फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती