शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
3
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
4
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
5
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
6
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
7
"नवोदित कलाकारांनीही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
8
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
9
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!
10
'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदार निशिकांत दुबेंचा ठाकरेंवर हल्ला
11
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
12
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
13
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात
14
वडील, भावाचा अकाली मृत्यू, तर बहिणीला कॅन्सर, पण जिद्द सोडली नाही, आकाशदीपच्या संघर्षाची भावूक कहाणी
15
तीन वकील अन् 'ती' एकच मागणी! सोनमविरोधात राजा रघुवंशीचं कुटुंब केस लढणार
16
चिंताजनक! तासाला १०० मृत्यू, कोरोनानंतर 'ही' समस्या घेतेय सायलेंट महामारीचं रुप, WHO चा अलर्ट
17
महागड्या गाड्यांचं कलेक्शन, कमाईतही एक नंबर; पाहा किती श्रीमंत आहे शुबमन गिल
18
Guru Purnima 2025: आयुष्याच्या तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच पस्तिशी ओलांडल्यावर गुरुकृपा होते, कारण...
19
"आता संपूर्ण देशाला माहितेय...", युजवेंद्र चहलने कन्फर्म केलं RJ महावशसोबतचं रिलेशनशिप?
20
वर्क-लाइफ बॅलन्ससाठी इन्फोसिसने घेतला मोठा निर्णय! जास्त काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना थेट...

साडेतीन महिन्यात ४० हजार मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2022 01:15 IST

द्राक्ष हंगाम सुरू होऊन दोन महिन्यांचा काळ पूर्ण होत असला तरी अद्याप निर्यातीला फारशी चालना मिळालेली दिसत नाही. साडेतीन महिन्यात युरोप आणि इतर देशांमध्ये ४०१०३ मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात झाली आहे. दरम्यान, अद्याप ग्राहकांच्या पसंतीस उतरतील अशी द्राक्ष तयार होत नसल्याने बागायतदारांमध्येही चिंता व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्देप्रतवारीवर ठरतोय दर : थंडीमुळे साखर उतरण्यास होतोय विलंब

नाशिक : द्राक्ष हंगाम सुरू होऊन दोन महिन्यांचा काळ पूर्ण होत असला तरी अद्याप निर्यातीला फारशी चालना मिळालेली दिसत नाही. साडेतीन महिन्यात युरोप आणि इतर देशांमध्ये ४०१०३ मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात झाली आहे. दरम्यान, अद्याप ग्राहकांच्या पसंतीस उतरतील अशी द्राक्ष तयार होत नसल्याने बागायतदारांमध्येही चिंता व्यक्त केली जात आहे. देशांतर्गत बाजारपेठेत पांढऱ्या द्राक्षांना ३५ ते ५५ रुपये, तर काळ्या द्राक्षांना ५० ते ७५ रुपये प्रति किलो इतका दर मिळत आहे. निर्यातक्षम द्राक्षांना ६५ ते ८० रुपयांचा दर मिळत आहे. या वर्षी थंडीचे प्रमाण अधिक राहिल्याने अद्याप द्राक्षांमध्ये म्हणावा तसा गोडवा उतरलेला नसल्याचे द्राक्ष उत्पादकांकडून सांगितले जात आहे. जिल्ह्यात ऑक्टोंबरपासून अर्ली द्राक्षांचा हंगाम सुरू होतो. त्यानंतर जानेवारीपासून नियमित हंगामास सुरुवात होत असते. नियमित हंगाम सुरू होऊन जवळपास दोन महिन्यांचा कालावधी होत आला असला तरी शेतकऱ्यांचा अपेक्षेप्रमाणे अद्याप मालाला उठाव नाही. देशात यावर्षी सर्वत्र थंडीचे प्रमाण अधिक असल्याने अद्याप द्राक्षांना फारशी मागणी नसल्याने अनेक द्राक्षबागांमध्ये अद्याप तोडा सुरू झालेला नाही. थंडी जास्त काळ राहिल्याने अजूनही परिपक्व द्राक्षांना मनाप्रमाणे कलर येत नाही, त्याचप्रमाणे साखर उतरण्याचे प्रमाणही कमी जास्त होत असल्यामुळे फारसा गोडवा जाणवत नाही. यामुळे द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

चौकट-

हंगाम सुरू झाल्यानंतर १ नोव्हेंबर ते २१ फेब्रुवारी दरम्यान जिल्ह्यातून युरोपमध्ये २४९०० मेट्रिक टन तर नॉन युरोपियन देशांमध्ये १५२०३ मेट्रिक टन इतकीच द्राक्ष निर्यात झाली आहेत. २७८९ कंटेनरमधून हा माल परदेशांमध्ये पाठविण्यात आला आहे. देशांतर्गत बाजारपेठेतही द्राक्षाला अद्याप मागणी वाढलेली नाही. यामुळे पुढील काळात काय स्थिती राहील याचा अंदाज बांधणे कठीण असल्याने बागायतदारांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

चौकट-

द्राक्षांची प्रत, त्यातील साखरेचे प्रमाण यावरून त्याचे दर ठरत असतात. यावर्षी काही बागांमध्ये द्राक्ष परिपक्व झाले. मात्र गोडवा कमी असल्याचे दिसून येत आहे. याचा परिणाम दरांवर होत आहे. गोडवा उतरत नाही असे नाही, पण त्यास थोडा अधिक काळ जाऊ द्यावा लागत आहे. त्याचाही उत्पादकांना फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती