शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
5
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
6
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
7
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
8
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
9
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
10
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
11
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
12
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
13
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
14
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
15
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
16
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
17
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
18
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
19
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
20
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी

सर्वांनी जाणले महत्त्व अन् सांघिक कामगिरीला यश : डॉ. सुरेश जगदाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 17:30 IST

केंद्र सरकारच्या समितीने आठ ते दहा मुख्य निकषांच्या आधारे मुल्यांकन करत तब्बल ६०० गुणांपैकी गुणदान केले. यामध्ये जिल्हा रूग्णालयाने ९८ टक्के गुण मिळवून पुन्हा नाशिकची आरोग्यसेवा राज्यासाठी आदर्श.

ठळक मुद्दे२५ ग्रामीण रूग्णालये उत्कृष्ट म्हणून निवडण्यात आलीप्रत्येक निकषानुसार त्रुटी दूर केल्या

नाशिक जिल्हा शासकिय रूग्णालयाचे नाव दुसऱ्यांदा दिल्लीत पोहचले. २०१६-१७ साली पहिल्यांदा जिल्हा रूग्णालय केंद्र सरकारच्या ‘कायाकल्प’चे विजेते ठरले. त्यानंतर २०१८-१९ या वर्षातही जिल्हा रूग्णालयाने प्रथम क्रमांकाचे राज्यस्तरीय पारितोषिक पटकाविले. केंद्र सरकारच्या समितीने आठ ते दहा मुख्य निकषांच्या आधारे मुल्यांकन करत तब्बल ६०० गुणांपैकी गुणदान केले. यामध्ये जिल्हा रूग्णालयाने ९८ टक्के गुण मिळवून पुन्हा नाशिकचीआरोग्यसेवा राज्यासाठी आदर्श असल्याचे दाखवून दिल्याचे मत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे व्यक्त केले आहेत.

 

‘कायाकल्प’मध्ये प्रथम क्रमांक मिळविण्यासाठी नेमका आराखडा कसा आखला?सातारा जिल्हा रूग्णालयाच्या जिल्हा शल्य चिकित्सकपदी असताना कायाकल्प योजनेचे २०१५हे पहिले वर्ष होते. यावेळी सातारा जिल्हा रूग्णालयाला मी प्रथम क्रमांक मिळवून दिले होते. हा अनुभव पाठीशी होता, नाशिकमध्ये बदलून आल्यानंतर नाशिकच्या जिल्हा रूग्णालयालाही ‘कायाकल्प’साठी पात्र करण्याचा निश्चय केला; मात्र हे मोठे आव्हान होते, कारण त्यावेळी नाशिकच्या जिल्हा रूग्णालयाची अवस्था सर्वच पातळीवर बिकट होती. त्यामुळे ‘कायाकल्प’च्या निकषांवर हे रूग्णालय खरे उतरविण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागणार हे निश्चित. त्यादृष्टीने आराखडा तयार करून चतुर्थश्रेणी कर्मचारी वर्ग-४पासून तर डॉक्टरांपर्यंत सर्वांना विश्वासात घेवून त्यांना ‘कायाकल्प’चे महत्त्व पटवून दिले. सहाशे गुणांचे मुल्यांकन असल्यामुळे प्रत्येक गुणाची बेरीज करण्याचा प्रयत्न जिल्हा रूग्णालयाच्या प्रत्येक घटकाने केला. त्यामुळे २०१६-१७ व १८-१९ या दोन वर्षांमध्ये या रूग्णालयाने प्रथम क्रमांक पटकाविला, ही माझ्यासाठी गौरवाची बाब आहे.

जिल्हा रूग्णालयामध्ये प्रामुख्याने सुरूवातीला कोणत्या त्रुटी आढळल्या?हो., त्रुटी नक्कीच होत्या. कारण जिल्हा रूग्णालयाच्या इमारतीची अवस्था सर्वप्रथम बिकट होती. इमारतीचे बांधकाम व आजुबाजूचा परिसर बकाल असल्याने ‘कायाकल्प’मध्ये रूग्णालयाचा प्रथम क्रमांक मिळवून देणे अवघड होते. कारण १०० गुण या निकषासाठी देण्यात आले होते. त्यामुळे इमारत व आजुबाजूचा परिसर विकसीत करणे प्रथम गरजेचे होते. तसेच स्वच्छतेचाही प्रश्न गंभीर होता. सफाई कामगारांना मुबलक साहित्याचा पुरवठा होत नसल्याने स्वच्छतेचा दर्जा राखला जात नव्हता, त्यामुळे ही बाब तत्काळ लक्षात घेत त्यावर उपाययोजना केली. संपुर्ण रूग्णालयाच्या विकासासाठी स्वतंत्र्यरित्या अंतर्गत सहा समित्या व साठ उपसमित्या स्थापन करून प्रत्येक निकषानुसार त्रुटी दूर केल्या.

यंदाच्या निकालाचे काय वैशिष्ट्य राहिले?२०१६-१७च्या तुलनेत यंदाचा निकाल जास्त प्रभावशाली ठरला. कारण यावर्षी ‘कायाकल्प’मध्ये जिल्हा रूग्णालय अव्वलस्थानी येण्याबरोबरच जिल्ह्यातील ११ ग्रामिण रूग्णालयदेखील उत्कृष्ट ठरले हे विशेष! त्यामुळे रूग्ण कल्याण समितीच्या खात्यात केवळ ५० लाखाच्या ७५ टक्के नव्हे तर ६१ लाखांच्या ७५ टक्के इतकी रक्कम जमा होणार आहे. ११ ग्रामिण रूग्णालयांना प्रत्येकी एक लाख रूपयांचे बक्षीस कायाकल्पमधून जाहीर झाले आहे. राज्यातील उत्कृष्ट ठरलेल्या २५ ग्रामिण रूग्णालयांमध्ये ११ रूग्णालये नाशिक जिल्ह्याची आहेत, हे मुख्य वैशिष्ट्य. पहिले बक्षीस मिळाले तेव्हा, जिल्ह्यातील केवळ ३ ग्रामीण रूग्णालये उत्कृष्ट ठरले होते.जिल्ह्यातील अकरा उत्कृष्ट ग्रामीण रूग्णालय होण्याचा मान कोणाला मिळाला?यावर्षी कायाकल्पच्या मुल्यांकन स्पर्धेत नाशिक जिल्हा रूग्णालयासह अकरा ग्रामीण रूग्णालये उत्कृष्ट ठरले. यामध्ये त्र्यंबकेश्वर, कळवण, घोटी, निफाड, लासलगाव, नांदगाव, डांगसौंदाणे, दाभाडी, वणी, इगतपुरी, देवळा येथील ग्रामीण रूग्णालये उत्कृष्ट ठरली. कायाकल्प योजनेत समितीद्वारे २५ ग्रामीण रूग्णालये उत्कृष्ट म्हणून निवडण्यात आली. त्यामद्ये ११ ग्रामीण रूग्णालये नाशिक जिल्ह्यातील आहे.

- शब्दांकन : अझहर शेख,

टॅग्स :Nashikनाशिकhospitalहॉस्पिटलHealthआरोग्यMaharashtraमहाराष्ट्र