शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

ंप्लॅस्टिकमुळे पर्यावरण धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 00:33 IST

मालेगाव : बंदी उरली नावापुरतीचअस्ताणे : मालेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक पिशव्या आणि प्लॅस्टिक पत्रावळी, प्लॅस्टिक ग्लास यामुळे पर्यावरण धोक्यात आले असून चाराटंचाई असल्याने मोकळी जनावरे प्लॅस्टिक पिशव्या आणि पत्रावळी खात असल्याने त्यांचा जीव धोक्यात आला आहे.

ठळक मुद्देपत्रावळीची जागा प्लॅस्टिक पत्रावळीने घेतली आहे.

मालेगाव : बंदी उरली नावापुरतीचअस्ताणे : मालेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक पिशव्या आणि प्लॅस्टिक पत्रावळी, प्लॅस्टिक ग्लास यामुळे पर्यावरण धोक्यात आले असून चाराटंचाई असल्याने मोकळी जनावरे प्लॅस्टिक पिशव्या आणि पत्रावळी खात असल्याने त्यांचा जीव धोक्यात आला आहे.मालेगाव तालुक्यातील गावांमध्ये गरीब व बेरोजगार तरुण, महिला पर्यावरण संवर्धनासाठी प्लॅस्टिक कागदी पिशव्या, बॉटल, ग्लास घेऊन ते प्रदूषण रोखण्याचे काम करीत आहेत. प्लॅस्टिक पिशवी वापरास बंदी घालण्यात आली आहे; परंतु ही बंदी नावापुरतीच आहे. प्लॅस्टिकबंदी असूनही मालेगाव तालुक्यातील प्रत्येक गावात, शहरात प्लॅस्टिक पिशव्यांचा व्यापार सुरू आहे. त्यामुळे दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत प्लॅस्टिक पिशवीचा वापर होत आहे. बाजार दुकानात कोणतीही वस्तू घेतली की प्लॅस्टिक पिशवीतच दिली जाते. प्रत्येक वस्तूबरोबर प्लॅस्टिक पिशवी मिळत असते. अशी वस्तू घरी आणल्यानंतर तसेच प्लॅस्टिक पिशवी फेकून दिली जाते. मग या पिशव्या गटारीत उघड्यावर शेतात, मैदानात अशा विविध ठिकाणी पडल्याने पर्यावरण बिघडत असते; परंतु मालेगाव शहरात गरीब व बेरोजगार मुले, महिला तसेच चिमुकले हातही प्लॅस्टिक पिशव्या ते भर उन्हात म्हणजे ४१ ते ४२ तापमानामध्ये गोळा करताना दिसत आहे. त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे.तालुक्यात तसेच ग्रामीण भागात यावर्षी भीषण चाराटंचाई असल्याने जनावरे प्लॅस्टिक पिशव्याही खाताना दिसत आहेत. गावांमध्ये लस समारंभ किंवा अन्य कार्यक्रमानिमित्त जेवण दिले जाते. अशा जेवणाच्या कार्यक्रमात आधी झाडाच्या पाणाची पत्रावळी असायच्या; परंतु आता त्या पत्रावळीची जागा प्लॅस्टिक पत्रावळीने घेतली आहे.झाडपानाच्या पत्रावळीमुळे काही लोकांना रोजगार उपलब्ध होत असे; परंतु आता प्लॅस्टिक पत्रावळ्या बाजारात मिळत असल्याने या झाडांच्या पानांपासून बनलेल्या पत्रावळी नामशेष झाल्या आहे. गेल्या वर्षापासून प्लॅस्टिकबंदी केल्यामुळे पत्रावळीमध्ये थोडा बदल करण्यात आला आहे. आता पत्रावळी ही बारीक पुठ्ठ्याची बनवून तिच्यावर प्लॅस्टिक कागद लावलेला असतो. त्यामुळे ती अशी दिसते की कागदाची पत्रावळी आहे; परंतु त्या पत्रावळीला प्लॅस्टिक कागद लावलेला आहे. पिशव्यांचा सर्रास वापरमालेगाव शहरात गरीब व बेरोजगार मुले, महिला तसेच चिमुकले हातही प्लॅस्टिक पिशव्या गोळा करताना दिसतात. ते खेड्या-खेड्यांमध्ये जाऊन तेथील नागरिकांना एक प्रकारे ते प्लॅस्टिक पिशव्या, चपला, प्लॅस्टिक गोण्या, प्लॅस्टिक बाटल्या अशा वस्तू दिवसभर जमा करतात. यामुळे जनावरांचे प्राण वाचण्यास मदत होत आहे. प्लॅस्टिकबंदी केल्यामुळे थोड्या फार प्रमाणात प्लॅस्टिक पिशवी बंद झाली होती; परंतु आता पुन्हा सुरू झाली आहे.