शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

ंप्लॅस्टिकमुळे पर्यावरण धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 00:33 IST

मालेगाव : बंदी उरली नावापुरतीचअस्ताणे : मालेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक पिशव्या आणि प्लॅस्टिक पत्रावळी, प्लॅस्टिक ग्लास यामुळे पर्यावरण धोक्यात आले असून चाराटंचाई असल्याने मोकळी जनावरे प्लॅस्टिक पिशव्या आणि पत्रावळी खात असल्याने त्यांचा जीव धोक्यात आला आहे.

ठळक मुद्देपत्रावळीची जागा प्लॅस्टिक पत्रावळीने घेतली आहे.

मालेगाव : बंदी उरली नावापुरतीचअस्ताणे : मालेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक पिशव्या आणि प्लॅस्टिक पत्रावळी, प्लॅस्टिक ग्लास यामुळे पर्यावरण धोक्यात आले असून चाराटंचाई असल्याने मोकळी जनावरे प्लॅस्टिक पिशव्या आणि पत्रावळी खात असल्याने त्यांचा जीव धोक्यात आला आहे.मालेगाव तालुक्यातील गावांमध्ये गरीब व बेरोजगार तरुण, महिला पर्यावरण संवर्धनासाठी प्लॅस्टिक कागदी पिशव्या, बॉटल, ग्लास घेऊन ते प्रदूषण रोखण्याचे काम करीत आहेत. प्लॅस्टिक पिशवी वापरास बंदी घालण्यात आली आहे; परंतु ही बंदी नावापुरतीच आहे. प्लॅस्टिकबंदी असूनही मालेगाव तालुक्यातील प्रत्येक गावात, शहरात प्लॅस्टिक पिशव्यांचा व्यापार सुरू आहे. त्यामुळे दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत प्लॅस्टिक पिशवीचा वापर होत आहे. बाजार दुकानात कोणतीही वस्तू घेतली की प्लॅस्टिक पिशवीतच दिली जाते. प्रत्येक वस्तूबरोबर प्लॅस्टिक पिशवी मिळत असते. अशी वस्तू घरी आणल्यानंतर तसेच प्लॅस्टिक पिशवी फेकून दिली जाते. मग या पिशव्या गटारीत उघड्यावर शेतात, मैदानात अशा विविध ठिकाणी पडल्याने पर्यावरण बिघडत असते; परंतु मालेगाव शहरात गरीब व बेरोजगार मुले, महिला तसेच चिमुकले हातही प्लॅस्टिक पिशव्या ते भर उन्हात म्हणजे ४१ ते ४२ तापमानामध्ये गोळा करताना दिसत आहे. त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे.तालुक्यात तसेच ग्रामीण भागात यावर्षी भीषण चाराटंचाई असल्याने जनावरे प्लॅस्टिक पिशव्याही खाताना दिसत आहेत. गावांमध्ये लस समारंभ किंवा अन्य कार्यक्रमानिमित्त जेवण दिले जाते. अशा जेवणाच्या कार्यक्रमात आधी झाडाच्या पाणाची पत्रावळी असायच्या; परंतु आता त्या पत्रावळीची जागा प्लॅस्टिक पत्रावळीने घेतली आहे.झाडपानाच्या पत्रावळीमुळे काही लोकांना रोजगार उपलब्ध होत असे; परंतु आता प्लॅस्टिक पत्रावळ्या बाजारात मिळत असल्याने या झाडांच्या पानांपासून बनलेल्या पत्रावळी नामशेष झाल्या आहे. गेल्या वर्षापासून प्लॅस्टिकबंदी केल्यामुळे पत्रावळीमध्ये थोडा बदल करण्यात आला आहे. आता पत्रावळी ही बारीक पुठ्ठ्याची बनवून तिच्यावर प्लॅस्टिक कागद लावलेला असतो. त्यामुळे ती अशी दिसते की कागदाची पत्रावळी आहे; परंतु त्या पत्रावळीला प्लॅस्टिक कागद लावलेला आहे. पिशव्यांचा सर्रास वापरमालेगाव शहरात गरीब व बेरोजगार मुले, महिला तसेच चिमुकले हातही प्लॅस्टिक पिशव्या गोळा करताना दिसतात. ते खेड्या-खेड्यांमध्ये जाऊन तेथील नागरिकांना एक प्रकारे ते प्लॅस्टिक पिशव्या, चपला, प्लॅस्टिक गोण्या, प्लॅस्टिक बाटल्या अशा वस्तू दिवसभर जमा करतात. यामुळे जनावरांचे प्राण वाचण्यास मदत होत आहे. प्लॅस्टिकबंदी केल्यामुळे थोड्या फार प्रमाणात प्लॅस्टिक पिशवी बंद झाली होती; परंतु आता पुन्हा सुरू झाली आहे.