शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

पर्यावरणपुरक अंत्यसंस्कार : गायधनी कुटुंबियांनी वाचविला एक वृक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 19:30 IST

रविवार कारंजा भागात राहणाऱ्या श्रीनिवास व राजेंद्र गायधनी यांच्या मातोश्री मीरा नारायण गायधनी (८०) यांचे निधन झाले. त्यांनी मातोश्रींच्या पार्थिवाचे अंत्यसंस्कार पर्यावरणपूरक अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेत तो अमरधाममध्ये अंमलात आणला.

ठळक मुद्देअंत्यसंस्कारसाठी लाकडांच्या वापराला फाटा वृक्षसंवर्धनासाठी कृतिशील पाऊल

नाशिक : झाडे लावा, झाडे जगवा..., पर्यावरणाचे संरक्षण काळाची गरज..., जंगले जगली तर पृथ्वी जगेल, अशा विविध घोषणांच्या माध्यमातून पर्यावरण आणि वृक्षप्रेम वारंवार अधोरेखित केले जाते; मात्र वृक्षसंवर्धनासाठी कृतिशील पाऊल टाकताना अनेकांचे पाय मागे पडतात. शहरातील रविवार कारंजा येथील एक गायधनी कुटुंब मात्र याला अपवाद आहे. आईच्या निधनानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी लाकडांच्या वापराला या कुटुंबाने फाटा देत समाजापुढे वेगळा आदर्श ठेवला.रविवार कारंजा भागात राहणाऱ्या श्रीनिवास व राजेंद्र गायधनी यांच्या मातोश्री मीरा नारायण गायधनी (८०) यांचे निधन झाले. त्यांनी मातोश्रींच्या पार्थिवाचे अंत्यसंस्कार पर्यावरणपूरक अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेत तो अमरधाममध्ये अंमलात आणला. दोन वर्षांनंतर प्रथमच एखाद्या कुटुंबाने शहरात अशाप्रकारचा पायंडा पाडला. दोन वर्षांपूर्वी अशा पद्धतीने दोन पार्थिवांचे अंत्यसंस्कार करण्यात आले होते; मात्र यानंतर कोणीही यापद्धतीने अंत्यसंस्कार करण्याकरिता पुढे आले नाही. मंगळवारी (दि.२५) ‘शतार्जी’ फाउंडेशनच्या आकांक्षा नाईक, नरहर गर्गे यांनी मनपाच्या माध्यमातून एका बेवारस मृतदेहावर अशारीतीने पर्यावरणपूरक अंत्यसंस्कार केले होते. यानंतर गायधनी कुटुंबाने मातोश्रींच्या पार्थिवाचे पर्यावरणपूरक दहन करण्याचा निर्णय बोलून दाखविला. त्यासाठी शतार्जी या संस्थेने त्यांना शेतकच-यापासून तयार केलेले १ किलो ठोकळे (ब्रिकेट्स) पुरविले. ठोकळे, गोव-या, खोब-याच्या वाट्या, कापूरवड्यांचा वापर करत संपूर्णत: पर्यावरणपूरक पद्धतीने गायधनी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, चार मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

टॅग्स :Nashikनाशिकenvironmentपर्यावरणDeathमृत्यू