शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

जलयुक्त शिवार योजनेमुळे युवकांना रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 10:10 PM

नायगाव : शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेमुळे नायगाव खोºयातील युवकांना गावातच मासेमारीचा रोजगार उपलब्ध झाला आहे. मार्चपर्यंत बंधारे पाण्याने भरलेले असल्यामुळे शेतीबरोबरच मच्छीमारीचा व्यवसाय तेजीत असल्यामुळे नायगावकरांसाठी आर्थिक शुभवर्तमान मानले जात आहे.

ठळक मुद्देनायगाव खोऱ्यात समाधान : बंधारे तुडुंब भरल्याने गावातच होतेय मासेमारी

दत्ता दिघोळे ।लोकमत न्यूज नेटवर्कनायगाव : शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेमुळे नायगाव खोºयातील युवकांना गावातच मासेमारीचा रोजगार उपलब्ध झाला आहे. मार्चपर्यंत बंधारे पाण्याने भरलेले असल्यामुळे शेतीबरोबरच मच्छीमारीचा व्यवसाय तेजीत असल्यामुळे नायगावकरांसाठी आर्थिक शुभवर्तमान मानले जात आहे.गेल्या वर्षभरात नायगाव खोºयातील सर्वच गावांमध्ये मोठ्या प्रमाणात जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून बांधारे, पाझरतलाव, नदी-नाले खोलीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यानंतर कोरडेठाक पडणारे बंधारे आज मार्च महिन्यातही पाण्याने भरलेले आहेत. त्यामुळे परिसरातील पाणी पातळी उंचावली असल्याने शेतीसाठी लागणारे जवळपास सर्वच गावातील बंधाऱ्यांमध्ये शेजारील काही शेतकºयांनी मत्स्यबीज टाकले होते.चार ते पाच महिन्यांपूर्वी टाकलेल्या या माशांचे उत्पादन सध्या विक्रीसाठी तयार झाले आहे. त्यामुळे परिसरातील प्रत्येक गावांतील काही युवकांना मासेमारीचा व काही युवकांना मासे विक्रीचा रोजगार गावातच मिळत आहे.प्रत्येक गावात सध्या माशांचे उत्पादन होत आहे. त्यामुळे खवय्यांना ताजे मासे मिळत असल्याने माशांना चांगली मागणी आहे. त्यामुळे शेतकºयांच्या माशांना व्यापाºयांकडून जागेवर शंभर ते दीडशे रुपयांपर्यंत भाव मिळत आहे तर काही शेतकरी स्वत:च नायगाव येथील शनिवारच्या बाजारात हात विक्रीचा व्यवसाय करत आहेत. त्यामुळे शेतकºयांना या जोडधंद्यामुळे आर्थिक दिलासा मिळत आहे.माजी आमदार राजाभाऊ वाजे, उदय सांगळे व युवामित्रच्या माध्यमातून झाले या कामांमुळे परिसरातील शेती बारमाही झाल्यामुळे शेतकºयांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.शेतीला जोडधंदा म्हणून शेतकºयांनी निवडलेला मच्छी पालनाचा व्यवसाय चांगलाच आर्थिक हातभार लावत आहे. यंदा पावसाचे प्रमाणही चांगले राहिल्यामुळे सर्वच बंधारे पूर्णक्षमतेने भरून वाहिल्याने व पाणी पातळी टिकून राहिल्याने या कालावधीत माशांचे उत्पादनातही चांगले आले आहे. आठवडाभरात एका बंधाºयातून साधारण ६० ते ७० किलो माशांचे उत्पादन निघत आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीNadi Vahate Movieनदी वाहते