शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

अकरा आदिवासी गावे श्रमदानातून झाली पाणीटंचाई मुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 00:30 IST

जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम पाड्यांमध्ये सहा महिने प्रचंड पाणीटंचाई जाणवते. यातील अकरा आदिवासी पाड्यांना कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्यासाठी सोशल नेटवर्किंग फोरमने ग्रामस्थ व युवकांच्या श्रमदानातून पाणीपुरवठा योजना राबविली.

नाशिक : जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम पाड्यांमध्ये सहा महिने प्रचंड पाणीटंचाई जाणवते. यातील अकरा आदिवासी पाड्यांना कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्यासाठी सोशल नेटवर्किंग फोरमने ग्रामस्थ व युवकांच्या श्रमदानातून पाणीपुरवठा योजना राबविली. तसेच लोकसहभागातून जलकुंभांची उभारणी केली.  व्हॉट्सअ‍ॅपसारख्या समाज- माध्यमांचा वापर करून प्रमोद गायकवाड यांनी सोशल नेटवर्किंग फॉर सोशल कॉज हे अभियान सुरू केले आणि त्या अंतर्गत सोशल नेटवर्किंग फोरम ही संस्था स्थापन करून सोशल मीडियावरील महाराष्ट्रातील तरु णांना सामाजिक कार्यात सहभागी होण्यास प्रेरित करायला सुरु वात केली. याबाबत आवाहन फेसबुकवर करताच राज्यभरातून सोशल नेटवर्कर्सचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि यानंतर अनेक नावीन्यपूर्ण संकल्पना फेसबुकवर मांडून त्यात सहभागी होण्याचे आवाहन केले गेले आणि तरु णांच्या सहभागातून उपक्र म साकारले गेले.ग्रामविकासाची कास धरून शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रात या अभियानाद्वारे हजारो वंचितांच्या जीवनात प्रकाश पडला असला तरी या सर्व उपक्र मांत खेड्यांना पाण्यासाठी समृद्ध करणे हे सोशल नेटवर्किंग फोरमचे सर्वांत लक्षवेधी काम आहे. २०१५ साली महाराष्ट्रात पावसाने दांडी मारली. संकट कितीही मोठे असले तरी शक्य ती मदत करायचीच या फोरमच्या ध्येयानुसार बीड जिल्ह्यातील राज पिंपरी हे गाव आणि एरंडवन येथील हरिण अभयारण्यातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मदत करण्यात आली. गावोगाव डोक्यावर हंडे घेऊन महिलांचे जत्थे रानोमाळ फिरताना दिसू लागले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपवर गावोगावच्या पाणी समस्येचे गांभीर्य सोशल नेटवर्कर्सला अवगत करून देण्यात आले.कामाचा अनुभव असणाऱ्या प्रमोद गायकवाड, डॉ. पंकज भदाणे, प्रशांत बच्छाव, डॉ. जयदीप निकम, रामदास शिंदे, गुलाब आहेर, संदीप बत्तासे अशा तज्ज्ञांची टीम तयार झाली. डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, जीवन सोनवणे, डॉ. आप्पासाहेब पवार हे मार्गदर्शक; राजेश बक्षी, लक्ष्मीकांत पोवनीकर, योगेश कासट असे अनेक अनिवासी भारतीय दाते म्हणून लाभले. या टीमने काही गावांची पाहणी केली. यासाठी आराखडा तयार केला.जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, पेठ, हरसूल, सुरगाणा या आदिवासी पट्ट्यात प्रचंड प्रमाणात पाऊस पडत असूनही डोंगराळ भागातून पाणी वाहून जाते. त्यामुळे या संस्थेने गेल्या तीन वर्षांत त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, पेठ या तालुक्यांमधील गढीपाडा, माळेगाव, वडपाडा आदींसह अकरा गावे, वाड्या, पाडे येथे सर्वांच्या सहकार्यातून कायमस्वरूपी पाणीपुरवठ्याची सोय केली आहे.श्रमदानातून खोदल्या विहिरीपाणी आणण्यासाठी महिलांना तसेच पुरुषांना डोक्यावर हंडा घेऊन पायपीट करावी लागते. त्यासाठी सोशल नेटवर्किंग फोरमने तज्ज्ञांच्या माध्यमातून सर्वेक्षण केले. तसेच समाज माध्यम यांच्या सहकार्याने आर्थिक मदत मिळवून लोकसहभागातून आणि गावकºयांच्या श्रमदानातून नाशिक जिल्ह्यातील अकरा गावे टँकरमुक्त केली आहेत. यासाठी जलशास्त्रज्ञांच्या मदतीने या गावांच्या परिसरात पाण्याची शक्यता तपासली. नदीकाठच्या गावांना पाणी टिकू शकेल, त्या जागेचा शोध घेऊन गावकºयांच्या श्रमदानातून विहिरी खोदण्यात आल्या. त्यानंतर पाणी लागल्याने पंपाच्या साह्याने लिफ्ट करून या गावातील टाकीपर्यंत पाणीपुरवठा करण्यात आला.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदWaterपाणी