शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
4
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
5
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
6
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
7
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
8
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

दिवस ‘निवडणुकी’चे सुरू जाहले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2020 7:41 PM

नाशिक : राजकीय नेत्यांना लोकहिताचा कळवळा आला की निवडणुका जवळ आल्या आहेत, हे सहज कळू लागते. सध्या नाशिकमध्ये सुरू झालेली कोरोना चाचणी शिबिरे आणि राजकीय आंदोलने बघता आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे, असे म्हंटल्यास वावगे ठरू नये.

ठळक मुद्देराजकीय उरूसआंदोलनेही सुरू

संजय पाठक, नाशिक : राजकीय नेत्यांना लोकहिताचा कळवळा आला की निवडणुका जवळ आल्या आहेत, हे सहज कळू लागते. सध्या नाशिकमध्ये सुरू झालेली कोरोना चाचणी शिबिरे आणि राजकीय आंदोलने बघता आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे, असे म्हंटल्यास वावगे ठरू नये.

मार्च महिन्यात अचानक उद््भवलेल्या कोरोना संकटामुळे संपूर्ण देशच ठप्प झाला. प्रत्येकाला आपल्या जीव महत्त्वाचा. तेथे राजकारण आणि अन्य सारेच विषय दुय्यम होते. लॉकडाऊनच्या दोन टप्प्यांनंतर मात्र हळूहळू पूर्वपदावर सारे येऊ लागताच राजकारणदेखील मूळ पदावर आले. केंद्र आणि राज्यातील राजकारणच, परंतु स्थानिक पातळीवरदेखील मग आरोप-प्रत्यारोपांचे खेळ सुरू झाले. नाशिक महापालिकेत भाजपची सत्ता आहे. त्यामुळे कोरोनाची स्थिती स्थानिक सत्ताधिकाऱ्यांच्या अंकुशाअभावी नियंत्रणात नाही, असा आरोप शिवसेनेने केला, तर मनसेने च्यवनप्राश वाटप सुरू केले. भाजपने पलटवार करताना राज्य सरकार कोरोनाविरोधात लढण्यासाठी निधी देताना कसा भेदभाव करतय येथपासून मनपातील विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते चार महिने कसे फार्म हाउसवर निवांत पडून होते, असा आरोप करण्यापर्यंत विषय पोहोचला. या सर्वांत एक बाब महत्त्वाची होती की चार महिने प्रशासकीय राजवट असल्यासारखे वातावरण होते. दोन महासभा आॅनलाइन झाल्यानंतर त्यात राजकारणाने काहीशी जान आणली, परंतु नंतर पुन्हा सारे ठप्प झाले.

त्यानंतर कोरोना साहित्य खरेदी दडविल्याचा आरोप झाला आणि त्याचवेळी राजकीय पक्षांनी एकमेकांवर कोरोना काळात थंड असल्याचा आरोप केला, मग काय आता तर आरोग्य तपासणीचा भडीमारच सुरू झाला. नियमित आरोग्य शिबिरे भरवावीत इतक्या सहजपणे रॅपीड टेस्ट किंवा अ‍ॅँटिजेन टेस्ट होत आहेत की कोरोना विषयक गांभीर्य हरपले. काही बिगर राजकिय सामाजिक संघटनांनी उदात्त हेतूने कोरोना चाचण्यांची शिबीर भरवली, मात्र त्यात भाजपाने घुसखोरी केली व शिबिराच्या माध्यमातून लोकांमध्ये जाणे सुरू केले, तर शिवसेनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आरोग्य तपासणी सुरू केली. राष्टÑवादीनेदेखील मग अशी शिबिरे भरविण्यास प्रारंभ केला आहे. मनसेने च्यवनप्राश आंदोलानंतर ठक्कर बाजार येथील कोविड सेंटर सुरू करण्यासाठी नवस करण्याचे अनोखे आंदोलन केले. सध्या विषयांची कमी नसल्याने रोज एक निवेदन आणि प्रसिद्धीसाठी फोटो अशी त्यांची मोहीमच सुरू झाली आहे.

या सर्वात कॉँग्रेस पक्ष शांत असला तरी मध्यंतरी राजस्थानमध्ये सत्तापालटासाठी भाजप करत असलेल्या प्रयत्नांचा विषय त्यांना हात देऊन गेला. दूध आंदोलनाचा विषयदेखील भाजप आणि अन्य छोट्या पक्षांना मिळाला. या सर्वांतून एक मात्र स्पष्ट झालय की कोरोनाया एका गंभीर आजारातून राजकारण आणि समाजकारणाला भरपूर वाव मिळाला आहे. आगामी दीड वर्षांनी होणाऱ्या महापालिकांच्या निवडणूकीसाठी राजकिय पक्षांना सध्या तरी तोच एक आधार आहे.

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाPoliticsराजकारण