बोंडअळी नियंत्रणासाठी हंगामपूर्व लागवड टाळण्याचे कृषी विभागाचे प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 16:14 IST2019-05-14T16:08:25+5:302019-05-14T16:14:44+5:30
आगामी पावसाळयाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने खरीप हंगामाच्या लागवडीसाठी तयारी व नियोजन सरू केले आहे. यात नाशिक जिल्ह्यातील येवला, मालेगाव तालुक्यांसह जळगाव, धुळे जिल्ह्यातील खरीपातील प्रमुख नगदी पीक असलेल्या कपासीवरील शेंदरी बोंड अळीचे नियंत्रण करण्यासाठी शेतकºयांनी एक जूननंतरच कापूस लागवड करावी यासाठी कृषी विभागाने नियोजन केले आहे.

बोंडअळी नियंत्रणासाठी हंगामपूर्व लागवड टाळण्याचे कृषी विभागाचे प्रयत्न
नाशिक : आगामी पावसाळयाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने खरीप हंगामाच्या लागवडीसाठी तयारी व नियोजन सरू केले आहे. यात नाशिक जिल्ह्यातील येवला, मालेगाव तालुक्यांसह जळगाव, धुळे जिल्ह्यातील खरीपातील प्रमुख नगदी पीक असलेल्या कपासीवरील शेंदरी बोंड अळीचे नियंत्रण करण्यासाठी शेतकऱ्यांनी एक जूननंतरच कापूस लागवड करावी यासाठी कृषी विभागाने नियोजन केले आहे.
घाऊक व किरकोळ विक्रेत्यांडून एक जूनपूर्वी कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना कापसाच्या बियाण्यांची विक्री होणार याची खबरदारी घेण्याच्या सूचना कृषी विभागाने बियाणे उत्पादक कंपन्यांना केल्या आहेत. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना बियाणेच १ जूननंतर उपलब्ध होणार असल्याने लागवडही एक जून नंतर होऊन शेंदरी बोंड अळीच्या प्रादुर्भावास आळा घालणे शक्य होईल ,असा विश्वास कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. कापसाच्या हंगामपूर्व लागवडीमुळे शेंदरी बोंडअळीचा जीवनक्रम खंडीत न झाल्याने अळीचा प्रादुर्भाव वाढतो. जीवनक्रम खंडीत न झाल्यामुळे पुर्नउत्पत्तीसाठी पोषक वातावरण निर्माण होऊन शेंदरी बोंडअळीच्या प्रादूर्भाव वाढण्यास मदत होते. त्यामुळे यापूर्वीचा अनूभव लक्षात घेऊन महाराष्ट्रात हंगामपूर्व लागवडीचे प्रमाण अत्यल्प असले तरी कुठेही कापसाची हंगामपूर्व लागवड होऊन शेंदरी बोंड अळीला पोषक वातावरण निर्माण होऊ नये यासाठी २०१९ च्या खरीप हंगामात बियाने उत्पादक कंपन्यांनी १५ मे २०१९ पर्यंत के वळ घाऊक व्यापाºयांना किंवा जिल्हास्तरावरील कंपनीच्या गोदामापर्यंत बियाणे पोहोचविण्याच्या सूचना कृषी आयुक्तालयातर्फे करण्यात आल्या होत्या. त्यामुळे आतापर्यंत केवळ घाऊक व्यापारी अणि कंपन्यांच्या गोदामापर्यंतच बियाण्यांची वाहतूक झाली असून बुधवारपासून(दि.१५)घाऊक व्यापाऱ्यांकडून किरकोळ विक्रेत्यांपर्यंत बियाण्यांचा पुरवठा सुरू होणार आहे. मात्र एक जूनपूर्वी कोणताही घाऊक अथवा किरकोळ विक्रेता शेतकऱ्यांना बियाण्यांची विक्री करणार नाही याची दक्षता सर्व कापूस बियाणे उत्पादन कंपन्यांनी घ्यावी अशा सूचना कृ षी आयुक्तालयामार्फत करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या खरीप हंगामात शेतकºयांना हंगामपूर्व लागवडीसाठी बियाणेच उपलब्ध होणार नसल्याने शेतकºयांना कापसाची लागवड एक जूननंतरच करावी लागणार आहे.