शहरं
Join us  
Trending Stories
1
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; उपराज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
2
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
3
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
4
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
5
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
6
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
7
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
8
मुंबई इंडियन्सच्या संघात अंशुल कंबोजची एन्ट्री! टॉस जिंकून २३ वर्षीय ऑल राऊंडरला दिली संधी, जाणून घ्या कोण आहे तो
9
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
10
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
11
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
12
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
13
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
14
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
15
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
16
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
17
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
18
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
19
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
20
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"

वातावरणातील आर्द्रतेचा द्राक्षबागेवर दुष्परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 1:08 AM

नाशिक तालुक्यातील द्राक्षपिकांवर हवेतील आर्द्रता वाढल्याने भुरी, फळकुज, मिलीबग्ज होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पिकाची काळजी घेण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागत असून, रात्रीच्या फवारण्या करण्यावर भर देण्यात येत आहे.

मातोरी : नाशिक तालुक्यातील द्राक्षपिकांवर हवेतील आर्द्रता वाढल्याने भुरी, फळकुज, मिलीबग्ज होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पिकाची काळजी घेण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागत असून, रात्रीच्या फवारण्या करण्यावर भर देण्यात येत आहे.नाशिकची ओळख द्राक्ष पंढरी म्हणून असली तरी या गोड द्राक्षामागील कडवट कहाणी व मेहनत अत्यंत त्रासदायक आहे. द्राक्षबागेची छाटणीपासून अंत्यत जिव्हाळ्याने शेतकरी मेहनत घेत असतो, तोच माल तयार होऊन बाजारपेठेत कवडीमोल विकावा लागतो. परंतु असे असले तरी भविष्यातील बाजार भावाचा विचार न करता शेतकरी मेहनतीने रात्रीचा दिवस करत संकटांना तोंड देत असतो. यंदा ही द्राक्ष पिकास पोषक हवामान असल्याने पिकाचे प्रमाण बºयापैकी आलेले आहे. परंतु हिवाळा लागताच द्राक्षबागेतील तपमान झपाट्याने खाली येत असल्याने बागेतील तपमान नियंत्रणात ठेवणे शेतकºयापुढे मोठे आव्हान ठरत आहे. रात्रीच्या वेळेस बुरशीचे प्रमाण वाढत असल्याने रात्रीच्याच फवारण्या देण्यावर भर देण्यात येत आहे. हवेतील आर्द्रता वाढल्याने बागेत बुरशीजन्य रोगाचे प्रमाण वाढत आहे. भुरीच्या वाढत्या प्रमाणामुळे बुरशीनाशकाच्या फवारण्यावर मोठा खर्च होत असल्याचे परिसरतील शेतकºयांनी सांगितले, बुरशी पाठोपाठ सनबर्न (फळकुज)चे प्रमाणहा वाढत आहे. त्यासाठी कोणतेही औषध नसल्याने बागेवर थेट सूर्यप्रकाशापासून घड वाचविण्यासाठी बागेवर अच्छादन दिले जात आहे, तर पेपरचे कवर लावून घड वाचविला जात आहे. यासाठी शेतकºयांना मोठी आर्थिक झळ सोसावी लागत आहे, तर अनेक बागांमध्ये शेकोटी करण्याचा प्रयोगही अमलात आणला जात असल्याचे दिसत आहे, थंडीचे प्रमाण वाढत राहिल्यास त्याचा परिणाम द्राक्ष मनी फुगन्यावर होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे.द्राक्षबागेवर बुरशीचे प्रमाण वाढत असल्याने रात्रीच्या वेळेस फवारण्या कराव्या लागतात कारण रात्रीच्या वेळी हवेतील आर्द्रता वाढल्याने बुरशीचे घडातील प्रमाण झपाट्याने वाढत असते, तसेच वातावरणातील सकाळी थंड व दुपारी सूर्यकिरणाची तीव्रता यामुळे घडात साठलेले दव मणी कुजण्यास कारणीभूत ठरत आहे .  - शशिकांत पिंगळे, बागायतदार, मुंगसरेशेतकºयांच्या द्राक्षबागेवर मिलीबर्ग (चिकटा)चे प्रमाण वाढत आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात त्यासाठी लागणाºया औषधीची मागणी होत आहे, तसेच हवेतील गारवा वाढल्याने पिकावर फवारणीही वाढत आहे, शेतकºयांनी बागेसाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला आहे. तसेच फळ कुजण्याचेही प्रमाण असल्याने बागेवर आच्छादन देण्याशिवाय पर्याय नाही.  - बाळासाहेब पिंगळे, दुकानदारहिवाळ्यात मिलीबर्ग द्राक्ष वेळेवर झपाट्याने वर सरकत घडात जाऊन चिकट द्रव्य टाकून स्वत:चे संरक्षण करतो. त्यामुळे घड खराब होतो, त्याच्यापासून संरक्षण करण्यासाठी तीन हजार ते चार हजार किमतीच्या प्रती एकरी असलेल्या महागड्या औषधाची आठवड्यातून दोनदा फवारणी करावी लागत आहे.  - सुरेश पिंगळे, बागायतदार, चांदशी

टॅग्स :FarmerशेतकरीenvironmentवातावरणTemperatureतापमानagricultureशेती