शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर निम्मे होतील टोलचे दर, 'अशा' रस्त्यांवर वाहन चालवणाऱ्यांना दिलासा; सरकारनं बनवला नवा प्लॅन
2
Bomb Threat: "बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या इमारतीत दुपारी ३ वाजता बॉम्ब स्फोट होणार" धमकीचा ईमेल!
3
'तिला न्याय देण्याऐवजी भाजपच्या व्यवस्थेने आरोपींना वाचवले'; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र
4
कुतुहलापोटी रेल्वे इंजिन बघायला वर चढला, पण हाय पॉवर केबलचा करंट जीवावर बेतला; १६ वर्षीय मुलाचा मृत्यू
5
दोन महिलांपुढे पायलटनेही हात टेकले; विमानात जोरजोरात भांडत बसल्या अन् पुढे असे घडले...
6
DMR Stock Price: ५ वर ८ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरची किंमत २०० रुपयांपेक्षाही कमी, स्टॉकमध्ये १४ टक्क्यांपेक्षाही अधिक तेजी
7
टेस्लाची पहिली कार मॉडल Y लाँच, किंमत २३ लाख नाही, तुमचा आमचा श्वास रोखणारी... EMI किती?
8
सोने सांभाळण्याची भीती वाटते? ऑनलाईन पर्यायातून मिळेल जास्त नफा, कशी करायची गुंतवणूक?
9
अल्पसंख्याक अन् एससी-एसटींविरुद्ध भेदभाव केल्यास होणार तुरुंगवास; काँग्रेसच्या 'रोहित वेमुला' विधेयकात काय?
10
वाहन उद्योग क्षेत्रासाठी आजचा दिवस महत्त्वाचा; एकाचवेळी दोन दिग्गज कंपन्या भारतात एन्ट्री करणार
11
निमिषा प्रियाचा जीव वाचवण्यासाठी आणखी एक आशेचा किरण! येमेनच्या बंद खोलीत चर्चा सुरू
12
...नाहीतर भारत-पाकिस्तानमध्ये अण्वस्त्र युद्ध झालं असतं; डोनाल्ड ट्रम्प यांचा स्फोटक दावा
13
Video: प्रतीक्षा संपली, इलॉन मस्क यांची भारतात एन्ट्री! असं आहे Tesla चं मुंबईतील पहिलं शोरुम
14
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
15
Stock Market Today: २० अंकांनी घसरुन उघडला सेन्सेक्स; फार्मा आणि मेटल क्षेत्रात खरेदी, थोड्याच वेळात का आली तेजी?
16
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
17
क्रूरतेचा कळस! सैनिकाचे पोट फाडून त्यात ठेवला बॉम्ब; नक्षलवादी योगेंद्र कसा पकडला गेला?
18
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
19
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
20
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी

वातावरणातील आर्द्रतेचा द्राक्षबागेवर दुष्परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 01:09 IST

नाशिक तालुक्यातील द्राक्षपिकांवर हवेतील आर्द्रता वाढल्याने भुरी, फळकुज, मिलीबग्ज होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पिकाची काळजी घेण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागत असून, रात्रीच्या फवारण्या करण्यावर भर देण्यात येत आहे.

मातोरी : नाशिक तालुक्यातील द्राक्षपिकांवर हवेतील आर्द्रता वाढल्याने भुरी, फळकुज, मिलीबग्ज होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पिकाची काळजी घेण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागत असून, रात्रीच्या फवारण्या करण्यावर भर देण्यात येत आहे.नाशिकची ओळख द्राक्ष पंढरी म्हणून असली तरी या गोड द्राक्षामागील कडवट कहाणी व मेहनत अत्यंत त्रासदायक आहे. द्राक्षबागेची छाटणीपासून अंत्यत जिव्हाळ्याने शेतकरी मेहनत घेत असतो, तोच माल तयार होऊन बाजारपेठेत कवडीमोल विकावा लागतो. परंतु असे असले तरी भविष्यातील बाजार भावाचा विचार न करता शेतकरी मेहनतीने रात्रीचा दिवस करत संकटांना तोंड देत असतो. यंदा ही द्राक्ष पिकास पोषक हवामान असल्याने पिकाचे प्रमाण बºयापैकी आलेले आहे. परंतु हिवाळा लागताच द्राक्षबागेतील तपमान झपाट्याने खाली येत असल्याने बागेतील तपमान नियंत्रणात ठेवणे शेतकºयापुढे मोठे आव्हान ठरत आहे. रात्रीच्या वेळेस बुरशीचे प्रमाण वाढत असल्याने रात्रीच्याच फवारण्या देण्यावर भर देण्यात येत आहे. हवेतील आर्द्रता वाढल्याने बागेत बुरशीजन्य रोगाचे प्रमाण वाढत आहे. भुरीच्या वाढत्या प्रमाणामुळे बुरशीनाशकाच्या फवारण्यावर मोठा खर्च होत असल्याचे परिसरतील शेतकºयांनी सांगितले, बुरशी पाठोपाठ सनबर्न (फळकुज)चे प्रमाणहा वाढत आहे. त्यासाठी कोणतेही औषध नसल्याने बागेवर थेट सूर्यप्रकाशापासून घड वाचविण्यासाठी बागेवर अच्छादन दिले जात आहे, तर पेपरचे कवर लावून घड वाचविला जात आहे. यासाठी शेतकºयांना मोठी आर्थिक झळ सोसावी लागत आहे, तर अनेक बागांमध्ये शेकोटी करण्याचा प्रयोगही अमलात आणला जात असल्याचे दिसत आहे, थंडीचे प्रमाण वाढत राहिल्यास त्याचा परिणाम द्राक्ष मनी फुगन्यावर होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे.द्राक्षबागेवर बुरशीचे प्रमाण वाढत असल्याने रात्रीच्या वेळेस फवारण्या कराव्या लागतात कारण रात्रीच्या वेळी हवेतील आर्द्रता वाढल्याने बुरशीचे घडातील प्रमाण झपाट्याने वाढत असते, तसेच वातावरणातील सकाळी थंड व दुपारी सूर्यकिरणाची तीव्रता यामुळे घडात साठलेले दव मणी कुजण्यास कारणीभूत ठरत आहे .  - शशिकांत पिंगळे, बागायतदार, मुंगसरेशेतकºयांच्या द्राक्षबागेवर मिलीबर्ग (चिकटा)चे प्रमाण वाढत आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात त्यासाठी लागणाºया औषधीची मागणी होत आहे, तसेच हवेतील गारवा वाढल्याने पिकावर फवारणीही वाढत आहे, शेतकºयांनी बागेसाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला आहे. तसेच फळ कुजण्याचेही प्रमाण असल्याने बागेवर आच्छादन देण्याशिवाय पर्याय नाही.  - बाळासाहेब पिंगळे, दुकानदारहिवाळ्यात मिलीबर्ग द्राक्ष वेळेवर झपाट्याने वर सरकत घडात जाऊन चिकट द्रव्य टाकून स्वत:चे संरक्षण करतो. त्यामुळे घड खराब होतो, त्याच्यापासून संरक्षण करण्यासाठी तीन हजार ते चार हजार किमतीच्या प्रती एकरी असलेल्या महागड्या औषधाची आठवड्यातून दोनदा फवारणी करावी लागत आहे.  - सुरेश पिंगळे, बागायतदार, चांदशी

टॅग्स :FarmerशेतकरीenvironmentवातावरणTemperatureतापमानagricultureशेती