शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
5
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
6
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
7
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
8
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
9
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
10
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
11
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
12
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
13
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
14
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
15
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
16
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
17
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
18
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
19
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
20
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
Daily Top 2Weekly Top 5

वातावरणातील आर्द्रतेचा द्राक्षबागेवर दुष्परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 01:09 IST

नाशिक तालुक्यातील द्राक्षपिकांवर हवेतील आर्द्रता वाढल्याने भुरी, फळकुज, मिलीबग्ज होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पिकाची काळजी घेण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागत असून, रात्रीच्या फवारण्या करण्यावर भर देण्यात येत आहे.

मातोरी : नाशिक तालुक्यातील द्राक्षपिकांवर हवेतील आर्द्रता वाढल्याने भुरी, फळकुज, मिलीबग्ज होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पिकाची काळजी घेण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागत असून, रात्रीच्या फवारण्या करण्यावर भर देण्यात येत आहे.नाशिकची ओळख द्राक्ष पंढरी म्हणून असली तरी या गोड द्राक्षामागील कडवट कहाणी व मेहनत अत्यंत त्रासदायक आहे. द्राक्षबागेची छाटणीपासून अंत्यत जिव्हाळ्याने शेतकरी मेहनत घेत असतो, तोच माल तयार होऊन बाजारपेठेत कवडीमोल विकावा लागतो. परंतु असे असले तरी भविष्यातील बाजार भावाचा विचार न करता शेतकरी मेहनतीने रात्रीचा दिवस करत संकटांना तोंड देत असतो. यंदा ही द्राक्ष पिकास पोषक हवामान असल्याने पिकाचे प्रमाण बºयापैकी आलेले आहे. परंतु हिवाळा लागताच द्राक्षबागेतील तपमान झपाट्याने खाली येत असल्याने बागेतील तपमान नियंत्रणात ठेवणे शेतकºयापुढे मोठे आव्हान ठरत आहे. रात्रीच्या वेळेस बुरशीचे प्रमाण वाढत असल्याने रात्रीच्याच फवारण्या देण्यावर भर देण्यात येत आहे. हवेतील आर्द्रता वाढल्याने बागेत बुरशीजन्य रोगाचे प्रमाण वाढत आहे. भुरीच्या वाढत्या प्रमाणामुळे बुरशीनाशकाच्या फवारण्यावर मोठा खर्च होत असल्याचे परिसरतील शेतकºयांनी सांगितले, बुरशी पाठोपाठ सनबर्न (फळकुज)चे प्रमाणहा वाढत आहे. त्यासाठी कोणतेही औषध नसल्याने बागेवर थेट सूर्यप्रकाशापासून घड वाचविण्यासाठी बागेवर अच्छादन दिले जात आहे, तर पेपरचे कवर लावून घड वाचविला जात आहे. यासाठी शेतकºयांना मोठी आर्थिक झळ सोसावी लागत आहे, तर अनेक बागांमध्ये शेकोटी करण्याचा प्रयोगही अमलात आणला जात असल्याचे दिसत आहे, थंडीचे प्रमाण वाढत राहिल्यास त्याचा परिणाम द्राक्ष मनी फुगन्यावर होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे.द्राक्षबागेवर बुरशीचे प्रमाण वाढत असल्याने रात्रीच्या वेळेस फवारण्या कराव्या लागतात कारण रात्रीच्या वेळी हवेतील आर्द्रता वाढल्याने बुरशीचे घडातील प्रमाण झपाट्याने वाढत असते, तसेच वातावरणातील सकाळी थंड व दुपारी सूर्यकिरणाची तीव्रता यामुळे घडात साठलेले दव मणी कुजण्यास कारणीभूत ठरत आहे .  - शशिकांत पिंगळे, बागायतदार, मुंगसरेशेतकºयांच्या द्राक्षबागेवर मिलीबर्ग (चिकटा)चे प्रमाण वाढत आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात त्यासाठी लागणाºया औषधीची मागणी होत आहे, तसेच हवेतील गारवा वाढल्याने पिकावर फवारणीही वाढत आहे, शेतकºयांनी बागेसाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला आहे. तसेच फळ कुजण्याचेही प्रमाण असल्याने बागेवर आच्छादन देण्याशिवाय पर्याय नाही.  - बाळासाहेब पिंगळे, दुकानदारहिवाळ्यात मिलीबर्ग द्राक्ष वेळेवर झपाट्याने वर सरकत घडात जाऊन चिकट द्रव्य टाकून स्वत:चे संरक्षण करतो. त्यामुळे घड खराब होतो, त्याच्यापासून संरक्षण करण्यासाठी तीन हजार ते चार हजार किमतीच्या प्रती एकरी असलेल्या महागड्या औषधाची आठवड्यातून दोनदा फवारणी करावी लागत आहे.  - सुरेश पिंगळे, बागायतदार, चांदशी

टॅग्स :FarmerशेतकरीenvironmentवातावरणTemperatureतापमानagricultureशेती