शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

गुरेवाडी शाळेत टाकाऊपासून शैक्षणिक साहित्यनिर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2019 6:29 PM

शालेय जीवनात बौद्धिक विषयांच्या अध्यापनाकडे शिक्षकांचा कल अधिक असतो. तुलनेने कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण हे विषय दुर्लक्षित राहतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासास खीळ बसते. सर्वगुण संपन्न विद्यार्थी घडविण्यासाठी त्यांच्यातील कलागुणांना व्यासपीठ निर्माण करून देणे शिक्षकांचे आद्यकर्तव्य आहे. हीच बाब हेरून तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या गुरेवाडी प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी वार्षिक परीक्षा संपताच छंदवर्गाचे आयोजन करून विद्यार्थ्यांना हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले.

सिन्नर : शालेय जीवनात बौद्धिक विषयांच्या अध्यापनाकडे शिक्षकांचा कल अधिक असतो. तुलनेने कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण हे विषय दुर्लक्षित राहतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासास खीळ बसते. सर्वगुण संपन्न विद्यार्थी घडविण्यासाठी त्यांच्यातील कलागुणांना व्यासपीठ निर्माण करून देणे शिक्षकांचे आद्यकर्तव्य आहे. हीच बाब हेरून तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या गुरेवाडी प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी वार्षिक परीक्षा संपताच छंदवर्गाचे आयोजन करून विद्यार्थ्यांना हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले.गुरेवाडी शाळेत आदिवासी विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. नैसर्गिक खेळांचा आनंद ही मुले घेत असली तरी त्यांना प्रतिकूल आर्थिक परिस्थितीमुळे खेळांच्या साहित्याची वानवा असते. मुख्याध्यापक पद्मा एन्गुंदल यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक आशा चिने यांनी पदरमोड करीत बॅट, बॉल, स्टंप आदी क्रि केटच्या साहित्यासोबत इतर खेळांचे साहित्य विकत घेत विद्यार्थ्यांच्या छंदाला प्रोत्साहन दिले. क्रिकेटच्या एका संघात असलेले खेळाडू, पंच, गोलंदाज, फलंदाज, यष्टिरक्षक, क्षेत्ररक्षक यांच्या जबाबदाऱ्या समजावून सांगत विद्यार्थ्यांसोबत खेळाचा आनंद लुटला. त्याचप्रमाणे छंदवर्गात टाकाऊपासून शैक्षणिक साहित्यनिर्मिती, परिसरातून उपलब्ध होणारे रंगीबेरंगी खडे, काड्या, चिंचोके, विविध झाडांच्या बियांंपासून सुंदर कलाकृती विद्यार्थ्यांकडून बनवून घेण्यात आल्या. मातीपासून विविध वस्तू, फळे, मूर्ती तयार करण्यात आल्या. शाळेत पक्ष्यांसाठी दाणा-पाण्याची सोय करत भूतदयेची शिकवण कृतीतून देण्यात येत आहे. दुष्काळी परिस्थितीत झाडे जिवंत ठेवण्यासाठी खोडाला दगडगोटे, पालापाचोळ्याचे आच्छादन तयार करण्याचे साधे मात्र परिणामकारक तंत्रही विकसित करण्यात आले आहे. बौद्धिक विकासासोबत शारीरिक विकास तितकाच महत्त्वाचा आहे. शारीरिक क्षमतेबरोबर व्यक्तीतील इतर महत्त्वाच्या गुणांचा विकास खेळामुळे घडतो. बहुतेक लोक खेळाकडे मनोरंजन व शारीरिक व्यायाम या दृष्टिकोनातून पाहतात. खेळामुळे मानवातील इतर सुप्तगुणही विकसित होत असल्याने व्यक्तिमत्त्व विकासात शारीरिक क्षमता वाढविताना खेळाला महत्त्व दिले पाहिजे. खेळामुळे खिलाडूपणा, सांघिकवृत्ती, सहकार्याची भावना, नेतृत्वगुण, एकाग्रता, सहनशीलता, आत्मविश्वास वाढीस लागतो. स्पर्धा करण्याची ईर्षाही निर्माण होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना विविध खेळांचे प्रशिक्षण दिले जात असल्याचे आशा चिने यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकEducationशिक्षण