शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश
2
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
3
भारताच्या ड्रग्ज तस्करांवरील कारवाईमुळे दाऊद इब्राहिमला धक्का; आता दक्षिण आफ्रिका आणि मेक्सिकोमधील नवीन ठिकाणांचा घेतोय शोध
4
भरला संसार मोडून प्रियकरासोबत पळाली ३ मुलांची आई, जाताना पैसे अन् दागिनेही लुटून गेली; पतीची पोलिसांत धाव
5
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
6
VIRAL : पत्नीच्या चारित्र्यावर संशय आला, पती अचानक बेडरूममध्ये शिरला अन् बेड उघडताच समोर आलं भयाण वास्तव!
7
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
8
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
9
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
10
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
11
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
12
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
13
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
14
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
15
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
16
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
17
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
18
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
19
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
20
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

काजवा महोत्सवातून साडेसात लाखांची कमाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 01:43 IST

अहमदनगर जिल्ह्यातील कळसूबाई - हरिश्चंद्रगड अभयारण्यातील वृक्षराजीवर पावसाळापूर्व जून महिन्यात काजव्यांची चमचम अनुभवण्यासाठी ३० दिवसांत सुमारे ३० ते ३५ हजार पर्यटकांनी भेट दिली. पर्यटकांकडून मिळालेल्या वाहन व व्यक्तीच्या प्रवेश शुल्कापोटी नाशिक वन्यजीव विभागाला तब्बल ७ लाख ६४ हजार ६४० रुपयांची कमाई झाली.

ठळक मुद्देनाशिक वन्यजीव विभाग : ३५ हजार पर्यटकांची कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्याला भेट

नाशिक : अहमदनगर जिल्ह्यातील कळसूबाई - हरिश्चंद्रगड अभयारण्यातील वृक्षराजीवर पावसाळापूर्व जून महिन्यात काजव्यांची चमचम अनुभवण्यासाठी ३० दिवसांत सुमारे ३० ते ३५ हजार पर्यटकांनी भेट दिली. पर्यटकांकडून मिळालेल्या वाहन व व्यक्तीच्या प्रवेश शुल्कापोटी नाशिकवन्यजीव विभागाला तब्बल ७ लाख ६४ हजार ६४० रुपयांची कमाई झाली. एकूण उत्पन्नाचा निम्मा निधी अभयारण्य क्षेत्रातील दहा गावांच्या विकासासाठी वन्यजीव विभाग खर्च करणार असून, उर्वरित निधीचा लाभ पर्यटकांना सोयीसुविधांच्या माध्यमातून देणार असल्याचा दावा वन्यजीव विभागाने केला आहे.नाशिक वन्यजीव विभागाच्या अखत्यारितीत असलेल्या कळसूबाई-हरिश्चंद्र गड अभयारण्य क्षेत्रात मागील महिन्यात काजव्यांची चमचम अनुभवण्यासाठी तब्बल ३५ हजार पर्यटकांनी भेट दिल्याची माहिती वन्यजीव विभागाने दिली. प्रतिपर्यटक ३० रुपये तर पर्यटकांचे हलके वाहन १०० व प्रवासी वाहतूक करणारे अवजड वाहन १५० रुपये प्रवेश शुल्क वन्यजीव विभागाने भंडारदरा-रतनवाडी नाका, शेंडी-घाटघर नाका या ठिकाणी आकारले. महिनाभरात तब्बल ७ लाख ६४ हजार ६४० रुपयांचा महसूल वन्यजीव विभागाला प्राप्त झाला. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी तब्बल दहा हजाराने पर्यटकांची संख्या वाढली. गेल्या वर्षभरापासून वन्यजीव विभाग पर्यटकांकडून शुल्क आकारणी करत आहे. गेल्या वर्षी सुमारे साडेपाच ते सहा लाख रुपयांचा महसूल प्राप्त झाला होता. यावर्षी वळवाचा पाऊस लांबल्याने काजव्यांची उत्पत्ती जूनमध्ये झाली. त्यामुळे जून महिन्यापासून पर्यटकांचा कल भंडारदरा वनपरिक्षेत्रातील कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्याकडे वाढला होता. या वनपरिक्षेत्रातील दहा गावांना रोजगाराच्या नवीन संधी व मूलभूत सोयीसुविधा पुरविण्याकरिता ग्रामपरिस्थितीकीय विकास समितीमार्फत महसुलाच्या निम्मा निधी खर्च केला जाणार असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी डी. डी. पडवळे यांनी सांगितले.गावकऱ्यांमुळे महोत्सव यशस्वीभंडारदरा वनपरिक्षेत्रातील अभयारण्यातील पेंडशेत, पांजरे, उडदवणे, शिंदणवाडी, घाटघर, मूतखेल, रतनवाडी, साम्रद, कोलटेंभे, पेरूगण या गावांना महसुलाचा लाभ होणार आहे. गावातील सोयीसुविधा तसेच रोजगाराचे पर्यायांवर महसुलाचा निम्मा भाग खर्च केला जाणार आहे. स्थानिक तरुणांना कॅम्पेनिंग निवासी तंबू, खाद्यपदार्थ विक्री स्टॉल्स पुरविले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.गावकऱ्यांच्या परिश्रमामुळे तसेच आलेल्या पर्यटकांनी वनविभागाच्या नियमावलीचे गांभीर्याने पालन करण्याचा प्रयत्न केल्याने काजवा महोत्सव यशस्वी झाल्याचे वनसंरक्षक अनिल अंजनकर यांनी सांगितले. पावसाळी पर्यटनालाही सुरुवात झाली असून, हीदेखील गावकºयांच्या दृष्टीने उत्तम संधी असल्याचे अंजनकर म्हणाले. वर्षा सहलीकरिता येणारे शालेय विद्यार्थी वगळता अन्य पर्यटकांना प्रवेश शुल्क आकारून अभयारण्य क्षेत्रात प्रवेश दिला जाणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिकforestजंगलwildlifeवन्यजीव