शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
2
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
3
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
4
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
5
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
6
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
7
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
8
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
9
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
10
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
11
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
12
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
13
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
14
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
15
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
16
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
17
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
18
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
19
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
20
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना

राजकारणामुळे बाजार समिती ‘बाजारात’ उभी

By श्याम बागुल | Updated: February 21, 2020 17:30 IST

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीवर आजवर देवीदास पिंगळे यांचेच वर्चस्व कायम राहिले. सभापतीपदावर कोणीही असो परंतु त्याचा कंट्रोल आपल्याकडे कायम ठेवण्यात पिंगळे यशस्वी झाले असले तरी, पिंगळे यांचे वर्चस्वाला शह देण्याची तयारी

ठळक मुद्दे पिंगळे यांच्याविरूद्ध गुन्हा व नंतर मध्यवर्ती तुरूंगात रवानगीचा प्रकार घडला बाजार समितीची सार्वत्रिक निवडणूक अवघ्या सहा महिन्यांवर

श्याम बागुल /नाशिकपाच वर्षापुर्वी घडलेल्या वेगवान परंतु नाट्यमय घटनांची अगदी तशीच पुनरावृत्ती व्हावी व सत्तेत बसलेल्यांवर नियतीने सूड उगविल्यागत पदच्युत होण्याची तर नियतीच्या वक्रदृष्टीतून बोध घेवून विरोधी बाकावरून सत्तेच्या सोपानावर चढण्याची संधी मिळण्याची घटना तशी दुर्मिळ मानली गेली आहे. एखाद्या चित्रपटाची कथा शोभावी असा प्रकार सध्या नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजकीय बाजारात घडत आहे. शेतकरी हित या एकमेव ध्येयावर काम करण्याचा दावा करणाऱ्या या बाजार समितीत शेतकरी नियुक्त संचालकांचा ‘भाव’ शेतमालाच्या बाजार भावाप्रमाणे वेळोवेळी चढ उतरत गेल्याने गेल्या पाच वर्षात दुसऱ्यांदा विद्यमान सत्ताधा-यांना अविश्वासाला सामोरे जावे लागत आहे.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीवर आजवर देवीदास पिंगळे यांचेच वर्चस्व कायम राहिले. सभापतीपदावर कोणीही असो परंतु त्याचा कंट्रोल आपल्याकडे कायम ठेवण्यात पिंगळे यशस्वी झाले असले तरी, पिंगळे यांचे वर्चस्वाला शह देण्याची तयारी पाच वर्षापुर्वीच सुरू झाली होती. त्याचाच परिणाम म्हणून २०१५ मध्ये झालेल्या बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत पिंगळे यांच्या विरूद्ध विद्यमान सभापती शिवाजी चुंभळे यांनी पॅनल उतरविले होते. अतिशय अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत सभासद शेतक-यांनी आपला कौल पिंगळे यांच्या बाजुने दिला. पिंगळे यांचे पंधरा तर चुंभळे गटाचे तीन संचालक निवडून आले. त्यामुळे साहजिकच सभापती म्हणून पिंगळे यांचीच दावेदारी कायम राहिली. पाठिशी बहुमत असल्यामुळे पिंगळे यांचा वारू चौखूर उधळला व बाजार समितीच्या हिताच्या नावाखाली घेण्यात आलेले काही निर्णयावरून संचालकांमध्ये मतभेदाची दरी निर्माण होण्यास सुरूवात झाली. बाजार समितीच्या कर्मचा-यांच्या बोनसची रक्कम घेवून जाणा-या दोन कर्मचा-यांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने रंगेहाथ पकडले व तेथून अनेक नाट्यमय घटना वेगाने घडल्या. सदरची रक्कम पिंगळे यांच्या घरी नेली जात असल्याची तक्रार शिवाजी चुंभळे यांनी केल्याची भावना व्यक्त केली गेली. त्यातून पिंगळे यांच्याविरूद्ध गुन्हा व नंतर मध्यवर्ती तुरूंगात रवानगीचा प्रकार घडला. या सा-या प्रकारातून बाजार समितीच्या हिताकडे सत्ताधारी तसेच विरोधकांचे दुर्लक्ष होवून सुडाचे राजकारण सुरू झाले. पिंगळे यांचा जामीन मंजूर करताना त्यांना बाजार समितीच्या कामकाजात हस्तक्षेप करण्यावर निर्बंध लादण्यात आले. त्यामुळे साहजिकच पिंगळे यांच्या कमकुवतपणाचा लाभ उठवित शिवाजी चुंभळे यांनी पिंगळे समर्थक संचालकांना आपल्या ‘गळा’ला लावले व अविश्वास दाखल करून स्वत: सभापतीपदी विराजमान झाले. सत्ताखालसा होण्याचे दु:ख काय असते याची जाणिव देवीदास पिंगळे यांना होत असली तरी, गुन्हा दाखल होण्याची नामुष्की, तुरूंगातील काळकोठडी व राजकीय अस्तित्वाच निर्माण झालेला प्रश्न पाहता पिंगळे यांना सुखाची झोप येणे अशक्यच. अशा सर्व घटनांमुळे पिंगळे यांचे अस्तित्व जणू संपुष्टात आल्याचे समजून चुंभळे यांच्याकडून बाजार समितीचा मनमानी कारभार सुरू झाला. शेतक-याच्या मालाला कधी नव्हे एखाद दिवशी चांगला दर मिळाला असेल पण सत्ताधा-यांना प्रत्येक दिवसच ‘मालामाल’ करीत असल्याचे पाहून नियतीने चुंभळे यांच्यावर सूड उगविला. त्यांनी ज्या पद्धतीचा अवलंब करून पिंगळेंची सत्ता खालसा केली, त्याच पद्धतीचा वापर करून चुंभळे हे देखील लाचलुचपत खात्याच्या तावडीत सापडले. तीन लाख रूपयांची लाच घेतांना रंगेहाथ पकडलेल्या चुंभळे यांना दुस-याच दिवशी जामीन होवून त्यांची तुरूंगवारी टळली असली तरी, त्यांच्या मनमानी व बेकायदेशीर कामकाजाला कंटाळलेल्या संचालकांनी पुन्हा उचल खाल्ली. त्याचा पिंगळे यांनी लाभ उठविला. सहकार विभाग, उच्च न्यायालयात दरदिवशी तक्रारींचा खच पडला. त्यातून चुंभळे यांच्या कारभाराला लगाम लावण्याचे हरत-हेचे प्रयत्न झाले, बाजार समितीतील चुंभळे यांचे आर्थिक व धोरणात्मक निर्णयाचे अधिकार गोठविण्यात आले. पाच वर्षापुर्वी चुंभळे यांच्या पॅनलमधून निवडून आलेले पिंगळे विरोधक संपतराव सकाळे यांनाच आर्थिक अधिकार देण्याची खेळी खेळली गेली व एकेक करीत चुंभळे यांना एकटे पाडण्यास पिंगळे यशस्वी झाले. बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंभळे यांच्यावर आमचा विश्वास नसल्याचे पत्र बाजार समितीच्या बारा संचालकांनी सहकार विभागाला दिले आहे. येत्या सोमवारी त्यासाठी बाजार समितीच्या संचालकांची विशेष बैठक बोलविण्यात आली आहे. पिंगळे यांच्या गटाकडे असलेले संख्याबळ पाहता, चुंभळे यांना पायउतार व्हावे लागेल असे चिन्हे दिसत आहेत. बाजार समितीची सार्वत्रिक निवडणूक अवघ्या सहा महिन्यांवर येवून ठेपली आहे. आणखी चार महिन्यांनी बाजार समितीच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होईल तो पर्यंत पिंगळे गटाकडे बाजार समितीची सत्ता असेल. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा निवडणुकीच्या फडात पिंगळे विरूद्ध चुंभळे लढत अटळ आहे.

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीNashikनाशिक