शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

ओखी वादळामुळे एक हजार हेक्टर शेतीला फटका, द्राक्ष व कांद्याचे सर्वाधिक नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 15:58 IST

ओखी वादळाच्या प्रभावामुळे नाशिक जिल्ह्यातील सुमारे 1 हजार 36 हेक्टर शेती क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून नाशिकसह, दिंडोरी, निफाड, सटाणा चांदवड तालुक्यांमध्ये सर्वाधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. ओखी वादळामुळे काढणीला आलेल्या द्राक्षांचे अधिक नुकसान झाल्याचे अहवालातून समोर आले आहे.

ठळक मुद्देओखी वादळाच्या प्रभावामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतीला फटका1 हजार 36 हेक्टर शेती क्षेत्रावरील पिकांचे नुकसान पाऊस व ढगाळ वातावरणामुळे द्राक्षांचे मणी तडकलेअचानक बदललेल्या वातावणाचा द्राक्षांबरोबरच कांदा, मका टोमॅटोलाही फटका

नाशिक : ओखी वादळाच्या प्रभावामुळे नाशिक जिल्ह्यातील सुमारे 1 हजार 36 हेक्टर शेती क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून नाशिकसह, दिंडोरी, निफाड, सटाणा चांदवड तालुक्यांमध्ये सर्वाधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. ओखी वादळामुळे काढणीला आलेल्या द्राक्षांचे अधिक नुकसान झाल्याचे अहवालातून समोर आले असून संबधित अहवाल कृषी विभागाकडे मुल्यमापनासाठी पाठविण्यात आला आहे.कोकण किनाररट्टीवर गेल्या आठवडयात धडकलेल्या ओखी वादळाच्या प्रभावामुळे नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातही बेमोसमी पाऊस व ढगाव वातावरण तयार झाल्यामुळे जिल्हा परिसरातील पिकांचे मोठे नुकसाने झाले आहे. ओखी वादाळामुळे जिल्ह्यात सुमारे 125.5 मिलिमिटर पाऊस झाल्यामुळे शहरपरिसरासह जिल्हाभरातील काढणीला आलेल्या द्राक्ष मणी तडकल्याने मोठे नुकसाने झाले आहे. गेल्या दोन महिन्यात पिकांना हा तिसरा फटका बसला असून यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात अवकाळीने सुमारे 9 हजार क्षेक्टर क्षेत्रवरील पिकांचे नुकसाने झाले होते. ऑक्टोबरमध्ये झालेल्या पावसामुळे व ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष बागांवर करपा, डावनीसह वेगवगेळ्य़ा बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाला होता. तर आता अनेक द्राक्ष बागा काढणीला आलेल्या असताना ओखी वादळाच्या प्रभावामुळे झालेला पाऊस व ढगाळ वातावरणामुळे द्राक्षांचे मणी तडकल्याने निर्यातक्षम द्राक्षांचेही प्रचंड नुकसान झाले आहे.अचानक बदललेल्या वातावणाचा फटका द्राक्षांबरोबरच कांदा, मका टोमॅटो आदि पिकांनाही बसला आहे. सध्या काढणीला असलेला कांदा पावसाने भिजल्याने खराब झाला आहे. शेतीमालाचे घसरते भाव आणि त्यातच अवकाळी पावसाने हाताशी आलेला घासही हिरावला गेल्याने शेतकरी पुरता संकटात सापडला आहे. ओखी वादळामुळे झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला असून या अहवालानुसार 1 हजार 36 .22 हेक्टर शेती क्षेत्रचे नुकसान झाले आहे. यात प्रामुख्याने कांदा आणि द्राक्ष उत्पादक शेतक:यांना मोठय़ा प्रमाणात फटका बसल्याचे प्राथमिक अहवालावरून समोर आले आहे. दरम्यान, ऑक्टोबरमधील अवकाळीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनाही अद्याप कोणतीही मदत मिळालेली नाही. त्यामुळे ओखी वादळाच्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला असला, तरी शेतक:यांना प्रत्यक्ष मदत कधी मिळणार, याविषयी साशंकताच व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Ockhi Cycloneओखी चक्रीवादळagricultureशेतीFarmerशेतकरी