शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

नाशिकमध्ये संततधार सुरूच, धरणं भरल्याने दूधसागर धबधब्यावर पर्यटकांची गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2018 16:45 IST

शहरात गेल्या तीन ते चार दिवसांपासून संततधार सुरू असून नाशिक जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला आहे. मालेगाव, नांदगाव, निफाड, चांदवड, येवला या आठ उपेक्षित तालुक्यातही पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे.

नाशिक - शहरात गेल्या तीन ते चार दिवसांपासून संततधार सुरू असून नाशिक जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला आहे. मालेगाव, नांदगाव, निफाड, चांदवड, येवला या आठ उपेक्षित तालुक्यातही पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे. खरीप हंगामासाठी हा पाऊस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या पावसामुळे पिकांची चांगली वाढ होते. त्यामुळे नेहमीच दुष्काळाने चिंताग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे.

राज्यभरातील बहुतांश जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. श्रावण महिन्याची सुरुवात होताच, श्रावणी सरी कोसळल्या आहेत. नाशिक जिल्ह्यातही पावसाने चांगलाच मुक्काम केला आहे. त्यामुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात 90 टक्के तर गंगापूर धरण समूहात 92 टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे सोमेश्वर जवळील दूध सागर धबधबा दुथडी भरून वाहू लागला आहे. शुक्रवारी पतेतीच्या सार्वजनिक सुट्टीचे औचित्य साधून पर्यटकांची गर्दी झाली होती. दारणा धरणातूनदेखील विसर्ग करण्यात आला आहे. दरम्यान, केरळमध्येही पावसाने हाहाकार माजला असून नद्यांना महापूर आला आहे. केरळमध्ये आत्तापर्यंत 167 जणांचा मुसळधार पावसाच्या तडाख्यात सापडून मृत्यू झाला आहे. 

टॅग्स :RainपाऊसDamधरण