शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
3
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
4
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
5
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
6
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
7
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
8
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
9
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
10
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
11
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
12
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
13
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
14
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
15
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
17
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
18
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
19
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
20
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?

नाशिक जिल्ह्यात अकरा महिन्यांत हायवेवर सहा बिबट्यांचा वाहनांच्या धडकेत मृत्यू

By azhar.sheikh | Updated: November 25, 2017 16:37 IST

जमिनीला समांतर असलेल्या विहिरींमध्ये बिबट्या पडतो आणि सुरू होतो त्याच्या जीवन-मरणाचा संघर्ष! बिबट्याच्या जीवावर बेतणारी ही समस्या सुटत नाही तोच पुन्हा माणसाने स्वत:च्या सोईसाठी विकसीत केलेल्या अत्यंत गुळगुळीत अशा डांबरीकरणाच्या रुंद महामार्गांवरही बिबट्या ठार होऊ लागला आहे. यामुळे बिबट्याचे अस्तित्वच जणू धोक्यात सापडले आहे.

ठळक मुद्दे वाहनचालकांनी वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवणे गरजेचे बिबट्यासारख्या वन्यजीव प्रवण क्षेत्रातून मार्गस्थ होताना वाहनाचा वेग मर्यादेपेक्षा अधिक नसावा 'वन्यजीवांचा वावर रात्रीच्या वेळी वाहने सावकाश चालवा’ असे सुचना फलकही लावले आहेत

अझहर शेख / नाशिक : नाशिक जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये बिबट्यांचा वावर अधिक आहे. राष्ट्रीय महामार्गांलगत असलेल्या वनक्षेत्रातून भरकटून महामार्ग ओलांडताना विविध महामार्गांवर नाशिक जिल्ह्याच्या हद्दीत एकूण सहा बिबट्यांचा या अकरा महिन्यांत अपघाती मृत्यू झाला आहे. अवघ्या तासाभरात कित्येक किलोमीटर अंतर कापणारा बिबट्यासारख्या चपळ व वेगवान वन्यजीवालाही महामार्गावरील अमर्यादपणे धावणा-या वाहनांपुढे आपला जीव गमवावा लागत आहे हे दुर्देवच!नाशिक जिल्ह्यातील निफाड, इगतपुरी, दिंडोरी, बागलाण, सटाणा, सिन्नर, त्र्यंबकेश्वर या तालुक्यांमधील परिसरात बिबट्याचा अधिवास आढळतो. या भागात त्यामुळे मानव-बिबट्याचा संघर्षही पहावयास मिळतो. पुरेसे भक्ष्य ऊसशेतीमध्ये किंवा परिसरातील विरळ झालेल्या वनक्षेत्रात न मिळाल्यामुळे मानवी वस्तीकडे भरकटणारा बिबट्या कधी शेतक-यांच्या पशुधनावर तर कधी लहान मुलांवर हल्ले करत असल्याच्या अनेक घटना या भागामध्ये घडल्या आहेत. दरम्यान, या तालुक्यांमधून जाणारे राज्य व राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना बिबट्यांना जीव गमवावा लागला आहे. एकूणच महामार्गावरुन जाणा-या वाहनांची असलेली गती आणि बिबट्याची महामार्ग ओलांडताना उडणारी भंबेरी यामुळे बिबट्याला प्राणाला मुकावे लागत आहे. बिबट्यासारखे अन्य वन्यजीवांचाही महामार्गाच्या परिसरात असलेल्या वनक्षेत्रात वावर असू शकतो हे लक्षात घेऊन त्या वनपरिक्षेत्रांच्या हद्दीत संबंधित वनविभागाने 'वन्यजीवांचा वावर रात्रीच्या वेळी वाहने सावकाश चालवा’ असे आवाहन वजा सुचना करणारे फलकही लावले आहेत; मात्र वाहनचालक सदर परिसरातून मार्गस्थ होताना महामार्गावर वाहनांचा वेग मर्यादेचे पालन करत नाही. त्यामुळे अचानकपणे संध्याकाळनंतर भक्ष्याच्या शोधात भटकं ती करणा-या बिबट्यासारख्या वन्यजीवांना आपले प्राण वाहनांच्या धडकेत गमवावे लागत आहे.---इन्फो--बिबट्याच्या अस्तित्वालाच धोका !जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये बिबट्याचा असलेला अधिवास धोक्यात आला आहे. ऊसाच्या क्षेत्रात किंवा अन्य शेतीच्या क्षेत्रात व मोकळ्या भुखंडावर भक्ष्याचा पाठलाग करताना अनेकदा बिबट्याची वाट चुकते आणि संरक्षक कठडे नसलेल्या जमिनीला समांतर असलेल्या विहिरींमध्ये बिबट्या पडतो आणि सुरू होतो त्याच्या जीवन-मरणाचा संघर्ष! बिबट्याच्या जीवावर बेतणारी ही समस्या सुटत नाही तोच पुन्हा माणसाने स्वत:च्या सोईसाठी विकसीत केलेल्या अत्यंत गुळगुळीत अशा डांबरीकरणाच्या रुंद महामार्गांवरही बिबट्या ठार होऊ लागला आहे. यामुळे बिबट्याचे अस्तित्वच जणू धोक्यात सापडले आहे.जिल्ह्यात अकरा महिन्यांत ठार झालेले बिबटेनाशिक-मुंबई महामार्ग - पाडळी शिवारात १, विल्होळी शिवारात १नाशिक पुणे महामार्ग - सिन्नर वनपरिक्षेत्रात २सिन्नर-घोटी राज्य महामार्गावर १मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर चांदवड शिवारात १वेग नियंत्रणात असेल तर अपघात टाळणे शक्यमहामार्गावरून जरी प्रवास करत असलो तरी अपघात टाळण्यासाठी वाहनचालकांनी वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. जेणेकरून सुरक्षित प्रवास होण्यास मदत होईल. वेग नियंत्रणात व मर्यादेत असल्यास अचानकपणे बिबट्यासारखे वन्यजीव अथवा कुत्रे किंवा एखाद्यावेळी मनुष्यही रस्ता ओलांडताना समोर आल्यास वाहन नियंत्रीत करणे शक्य होऊन अपघात टाळता येऊ शकतो; मात्र जर अमर्याद वेगाने वाहन धावत असेल तर मात्र अपघात टाळणे वाहनचालकांना शक्य होत नाही. अशावेळी स्वत:ची सुरक्षा धोक्यात आल्याचे लक्षात येताच वाहनापुढे आलेला वन्यजीव अथवा कुत्र्यालाही वाहनचालक धडक देऊन पुढे मार्गस्थ होतो. त्यामुळे बिबट्यासारख्या वन्यजीव प्रवण क्षेत्रातून मार्गस्थ होताना वाहनाचा वेग नियंंत्रणात व मर्यादेपेक्षा अधिक नसावा, असे आवाहन वनअधिका-यांनी केले आहे. 

टॅग्स :highwayमहामार्गAccidentअपघातwildlifeवन्यजीवNashikनाशिक