शहरं
Join us  
Trending Stories
1
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
2
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
3
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
4
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
5
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
6
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
7
सत्ता मिळविण्यासाठी उद्धवसेनेने प्रतिष्ठा घालविली; मुख्यमंत्री शिंदेंची घणाघाती टीका
8
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
9
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
10
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
11
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
12
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
13
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
14
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
15
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
16
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती
17
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
18
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
19
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
20
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक

ढगाळ वातावरणामुळे शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 10:51 PM

इगतपुरी तालुक्यातील पूर्वभागात ढगाळ वातावरणामुळे पिकांवर आलेल्या विविध रोगांनी परिसरातील शेतकरी धास्तावले आहेत. रब्बी हंगामातील पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली आहे. मात्र आठवड्यापासून थंडी कमी असल्याने पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. गेल्या वर्षी दुष्काळाच्या झळा सोसल्यानंतर हातातोंडाशी आलेली पिके या प्रतिकूल वातावरणामुळे जाण्याच्या धास्तीने परिसरातील शेतकरीवर्ग चिंतित आहेत.

ठळक मुद्देपिकांवर रोगांचा प्रादुर्भाव : गव्हाला अळीचा फटका

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील पूर्वभागात ढगाळ वातावरणामुळे पिकांवर आलेल्या विविध रोगांनी परिसरातील शेतकरी धास्तावले आहेत.रब्बी हंगामातील पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली आहे. मात्र आठवड्यापासून थंडी कमी असल्याने पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. गेल्या वर्षी दुष्काळाच्या झळा सोसल्यानंतर हातातोंडाशी आलेली पिके या प्रतिकूल वातावरणामुळे जाण्याच्या धास्तीने परिसरातील शेतकरीवर्ग चिंतित आहेत. पावसाळ्यात सुरुवातीला पावसाने दडी मारली अन् आॅक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना काही ठिकाणी दिलासा तर काही ठिकाणी पिकांचे नुकसान झाले. मात्र शेवटच्या टप्प्यात झालेल्या पावसाने पाण्याचा प्रश्न मिटला. यामुळे काही परिसरात भाजीपाला पिके तसेच मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड करण्यात आली आहे. यावर्षी कांद्याला विक्र मी बाजारभाव मिळाल्यामुळे बहुतांश शेतकरी कांद्याकडे वळले आहेत. त्याच बरोबर गहू, हरभरा या पिकांनादेखील शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले आहे. मात्र गेल्या आठवड्यापासून पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. एवढेच नव्हे तर फेब्रुवारी महिन्याला सुरुवात झाली असली तरी थंडीची उणीव असल्याने परिणामी उत्पन्नात घट होण्याची धास्ती शेतकºयांच्या मनात निर्माण झाली आहे. या खराब हवामानाचा सामना करण्यासाठी शेतकºयांनी विविध औषधांच्या फवारण्या सुरू केल्या आहेत. शेतकरी महागडी औषधे फवारणी करताना दिसून येत आहे. परंतु हवामानात सुधारणा न झाल्यास शेतकºयांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागेल यामुळे या परिसरातील शेतकरी धास्तावले आहेत.थंडी कमी असल्याने गव्हावर मावा, तुडतुडे, करपा आदी रोगांचा प्रादुर्भाव दिसत आहे. या सोबतच काही भागांमध्ये गव्हाला अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे पहावयास मिळत आहे. या प्रतिकूल हवामानामुळे कांद्यालाही करप्याने वेढले आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रCrop Loanपीक कर्ज