शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया खंडात नव्या युद्धाचे संकेत ! तैवानच्या एअरस्पेसमध्ये २१ चिनी लढाऊ विमानांची घुसखोरी
2
कर्तव्यदक्ष महिला अधिकारी सोनाली मिश्रा सांभाळणार रेल्वे सुरक्षा दलाचे महासंचालकपद
3
गुडन्यूज! कियारा अडवाणीने दिला गोंडस मुलीला जन्म; सिद्धार्थ मल्होत्रा झाला 'नन्हीं परी'चा बाबा
4
Pune Porsche Car Accident: मुलाला 'प्रौढ' ठरवून खटला चालविण्याचा पोलिसांचा अर्ज फेटाळला; बाल न्याय मंडळाचा अल्पवयीन मुलास दिलासा
5
'चॉकलेट हवं असेल तर...' म्हणत ८ वर्षांच्या चिमुरडीवर जंगलात नेऊन अत्याचार, आरोपी मुलगाही अल्पवयीनच !
6
कर्नाटकात २०० रुपयांपेक्षा जास्त नसणार पिक्चरचे तिकीट; सर्व मल्टिप्लेक्ससाठी निर्णय, सरकारची घोषणा
7
तुम्हाला काय अडचण, तुम्ही छपरी आहात का? कोर्टाने हिदुस्तानी भाऊला फटकारलं; म्हणाले, "नॅशनल जिओग्राफी बघा"
8
उत्तराखंडच्या पिथोरागडमध्ये जीप नदीत कोसळली; ८ प्रवाशांचा जागीच मृत्यू, गाडीच्या शेजारी पडले मृतदेह
9
"अनेक दिग्गज नेते प्रदेशाध्यक्ष पदासाठी..."; पहिल्याच भाषणात शशिकांत शिंदेंची रोखठोक भूमिका, काय म्हणाले?
10
जीएनएम प्रवेशासाठी घेतली २० हजार लाच; परभणीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
11
प्रचंड उष्णता, उडत होत्या आगीच्या ठिणग्या, तरीही या तंत्रज्ञानामुळे शुभांशू यांचं यान राहिलं सुरक्षित, पृथ्वीवर परतताना यानासोबत नेमकं काय घडलं?
12
95% ने आपटून ₹19 वर आला होता शेअर, दिग्गज गुंतवणूकदारानं खरेदी केले 32.78 लाख शेअर; झटक्यात 10% नं वाढला भाव!
13
विम्याच्या पैशांसाठी केले डबल मर्डर; बाबा बनून कुंभमेळ्यात फिरला, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
सिराजची विकेट अन् बरंच काही! गिलनं शेअर केली किंग चार्ल्स यांच्यासोबतच्या भेटीतील खास गोष्ट (VIDEO)
15
निमिषा प्रियाची फाशी टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ९४ वर्षीय मुस्लीम धर्मगुरू कोण? कुठे आणि कशी झाली चर्चा?
16
सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात तरुणी गेल्या तुरुंगात, अख्खा गाव विरोधात, नेमका प्रकार काय?   
17
‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
18
'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos
19
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
20
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?

बाजारपेठेच्या उपलब्धतेमुळे शेतकऱ्यांचा भात पिकाकडे कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:15 IST

वसंत तिवडे लोकमत न्युज नेटवर्क त्र्यंबकेश्वर : पावसाचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या या तालुक्यातील शेतपिकांची मदार पावसाच्या ...

वसंत तिवडे

लोकमत न्युज नेटवर्क

त्र्यंबकेश्वर : पावसाचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या या तालुक्यातील शेतपिकांची मदार पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. २६,४०० हेक्टर खरिपाचे क्षेत्र असून, फक्त भात लागवडीचे सर्वसाधारण क्षेत्र बारा हजार हेक्टर आहे. शहरात भाताच्या अनेक जातींचे उत्पादन होत असल्याने याठिकाणी चार अद्ययावत राईस मिल असून, येथील तांदूळ खरेदी करण्यासाठी मुंबई, नाशिक, औरंगाबाद, जळगाव आदी भागातून व्यापारी, ग्राहक येत असतात.

त्र्यंबकेश्वर तालुक्यात सर्वांत जास्त भात हेच नगदी पीक घेतले जाते. त्यासोबतच नागली, वरई, खुरसणी, उडीद व भुईमूग आदी खरीप पिकेदेखील घेतली जातात. मुळातच त्र्यंबकेश्वर तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र डोंगर उताराचे व दऱ्याखोऱ्यांनी व्यापले आहे. साहजिकच मोठ्या प्रमाणात पाऊस असतो. येथील शेतजमिनी पावसावर अवलंबून आहे. तालुक्यात मोठी धरणे नसून लघुपाटबंधारे आहेत. साठवण तलाव आहेत, परंतु ते उन्हाळ्यात आटून जातात. गोदावरी नदीवर बेझे शिवारात गौतमी हा महत्त्वाचा प्रकल्प आहे. वायघोळपाडा अंबई, अंबोली, कोणे तळेगाव, अंजनेरी आदी ठिकाणी लघुपाटबंधारे आहेत. त्यामुळे भात, नागली, वरई, खुरसणी, उडीद, भुईमूग आदी क्षेत्र वगळता बागायत क्षेत्र अगदीच नगण्य आहे. त्यामुळे या तालुक्यात भात पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते.

भात खणणी व आवणीसाठी लागणारे मजुर हा सर्व खर्च करूनही वेळेवर पाऊसच झाला नाही किंवा भात सोंगणीपूर्वी अतिवृष्टी अथवा नैसर्गिक आपत्तीमुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला जातो.

खरीप शेती एकतर भरपूर उत्पन्न देते किंवा हातचे उत्पन्न नष्टही होत असते. मजुरी व खताचे भाव गगनाला भिडलेले असताना अतिवृष्टीने पिकांचे नुकसान होत असते. त्यामुळे संरक्षण म्हणून शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. मात्र उत्पन्न वाढल्याने विम्याची रक्कम बुडाली. त्यामुळे पीक विम्याला फारसा प्रतिसाद मिळत नाही.

सुपीक जमिनी व मोठ्या जलाशयाच्या कार्यक्षेत्रात ज्यांच्या जमिनी आहेत असे शेतकरी बागायती व खरीप अशी दोन्हीही पिके घेतात. तालुक्याचे भागातील क्षेत्र थोडे असले तरी त्यात मुख्यत्वे टमाटे, द्राक्ष काही प्रमाणात ऊस, कोबी, भोपळा, वांगी, कांदा, बटाटे, कारले, दोडकी व काकडी अशा फळभाज्यांचे उत्पन्न मिळते. हा सर्व नगद माल असला तरी मार्केटमध्ये आवक वाढली की मालाला भाव कमी मिळतो. आज सहकारी संस्थांमध्ये कर्जासाठी भाताऐवजी टमाटे दाखविले जातात. कारण सहकारी सोसायट्यांकडून भाताला एकरी १७००, टमाटे २५०० व द्राक्षे एक लाख असे एकरी कर्ज दिले जाते. त्यामुळे अधिक कर्जासाठी शेतकऱ्यांकडून भाताऐवजी टमाट्यांना प्राधान्य दिले जाते.

हल्ली शेती व्यवसाय बेभरवशाचा झाल्याने शेतकऱ्यांची मुले शिकून नोकरी, धंद्याच्या मागे लागली आहेत. घरची शेती विकून हाॅटेल व्यवसाय थाटले आहेत. काही जण नोकरी करतात तर तालुक्यात असेही काही उच्च शिक्षित तरुण आहेत की उच्च विद्याविभूषित होऊनही आपला वडिलोपार्जित शेती व्यवसायाला आधुनिक वळण देउन त्यांचे द्राक्ष एक्स्पोर्ट करीत आहेत.

त्र्यंबकेश्वर शहरात आतापर्यंत अवघा १२८६ मिमी पाऊस झालेला आहे. साठवण क्षमतेअभावी पावसाचे पाणी डोंगर उतारावरून गुजरात राज्याकडे वाहून जाते. आज तालुक्यात उद्योग, धंदा नसल्याने दरवर्षी निम्मा तालुका उदरनिर्वाहासाठी स्थलांतर करीत असतो. हे स्थलांतर थांबविण्यासाठी औद्योगिक वसाहत होणे गरजेचे आहे. तसेच गडदुणे, कळमुस्ते व किकवी हे प्रकल्प झाल्यास तालुका सुजलाम् सुफलाम् होण्यास वेळ लागणार नाही.