शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाची झळ लोकप्रतिनिधींना कधी जाणवणार?

By किरण अग्रवाल | Updated: May 12, 2019 01:28 IST

यंदा पाणीटंचाईच नव्हे, तर एकूणच दुष्काळी स्थितीने ग्रामीण भागातील जनता हैराण झाली आहे. शेत-शिवार पडून आहे व जनावरेही सोडून देण्याची वेळ आली आहे. परंतु यावर उपायासाठी ज्यांनी झगडावे, शासनाकडे पाठपुरावा करावा ते लोकप्रतिनिधी अजूनही निवडणुकीच्या गुंत्यातच गुंतून आहेत. त्यामुळे त्यांना दुष्काळाची जाणीव कधी होणार, असा प्रश्न आहे.

ठळक मुद्दे पाण्यासाठी ग्रामस्थांचा टाहो निवडणुकीची हवा अजून गेली नसल्याने नेत्यांचे होते आहे दुर्लक्ष राज्यातील धरणांमधील जलसाठा १७ टक्क्यांवर

सारांशउन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून, दुष्काळाचा दाह असह्य होऊ पाहत आहे. या परिस्थितीच्या मुकाबल्यासाठी शासन आपल्या स्तरावर प्रयत्न करीत आहेच, नाही असे नाही; परंतु झळ अनुभवणारी जनता व त्यापासून मुक्तीचे उपाय योजणारी यंत्रणा यांच्यात दुवा साधण्याचे काम करणारे लोकप्रतिनिधी कुठे आहेत? आमदार असोत, की जिल्हा परिषदेचे सदस्य; अपवादवगळता दुष्काळाबाबत काही बोलताना अगर वाड्या-वस्तीवर पोहोचून जनतेच्या हाल-अपेष्टा समजून घेताना दिसत नाहीत. आपल्याकडील मतदान आटोपले तरी त्यांच्या डोक्यातली निवडणुकीची हवा अजून गेलेली नसल्याचेच हे लक्षण म्हणता यावे.यंदा संपूर्ण राज्यालाच तीव्र दुष्काळी परिस्थितीस सामोरे जावे लागत आहे. राज्यातील धरणांमधील जलसाठा १७ टक्क्यांवर आला असून, यात नाशिक विभागातील जलसाठा १६ टक्क्यांवर आहे. टँकर्सच्या बाबतीत बोलायचे तर मागच्या वर्षी एप्रिलअखेर नाशिक जिल्ह्यात ५० टँकर्स सुरू होते. यंदा ती संख्या पाचपटीने वाढून तब्बल २५०वर गेली आहे. नाशिक विभागात १२००पेक्षा अधिक टँकर्सने पाणीपुरवठा सुरू आहे. मे महिन्याच्या सुरुवातीसच ही स्थिती असून, संपूर्ण मे व जून महिन्याचे काही दिवस जायचे आहेत. त्यामुळे पाण्याचा व जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर होताना दिसत आहे. परंतु आता आतापर्यंत निवडणुकीचा गलबला सुरू होता त्यामुळे याकडे फारसे लक्ष वेधले गेलेले दिसून येऊ शकले नाही.राज्यातील मतदानाचे चारही टप्पे पार पडून गेल्यानंतर आता दुष्काळाचा प्रश्न ख-या अर्थाने अजेंड्यावर आला आहे. शेवटच्या चरणाचे मतदान आटोपताच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार दुष्काळी दौ-यावर निघाले, त्यानंतर ‘मनसे’नेही यात लक्ष घातले म्हटल्यावर मुख्यमंत्र्यांनी सर्व पालकमंत्र्यांना आपापल्या जिल्ह्यात दौरे करून आढावा घेण्यास सांगितले. त्यानुसार गिरीश महाजन यांनी जिल्ह्यातील सिन्नर, येवला, नांदगाव आदी तालुक्यांत जाऊन पाहणी केली. पण आचारसंहितेवर बोट ठेवत अधिकारी वर्ग पालकमंत्र्यांच्या या दौºयात सहभागी झाला नाही. त्यावरून अधिकारी आपले ऐकत नाही, असे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न महाजन यांनी केला; परंतु विद्यमान सरकारच्या काळात नोकरशाही किती मस्तवाल किंवा बेगुमान झाली आहे हेच स्पष्ट होऊन गेले. राज्यातील मतदान आटोपून गेल्याने आचारसंहिता शिथिल करण्याचे खुद्द मुख्यमंत्र्यांनी निवडणूक आयोगास कळवूनही ही यंत्रणा कायद्यावर बोट ठेवून वागताना दिसावी ही असंवेदनशीलताच ठरावी.महत्त्वाचे म्हणजे, जिल्ह्यात छगन भुजबळदेखील मतदानानंतर लगेच दुष्काळी दौºयावर निघालेले पहावयास मिळाले; परंतु ज्यांचा मतदारच ग्रामीण आहे ते जिल्हा परिषदेचे सदस्य किंवा पदाधिकारी अथवा जिल्ह्यातील अन्य आमदार आदी लोकप्रतिनिधी यासंदर्भात परिस्थिती न्याहाळताना अगर प्रशासनाकडे काही उपाय सुचवताना दिसून येऊ शकले नाहीत. पालकमंत्र्यांच्या दौºयात काही पक्ष पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिलीत; परंतु एकूणच लोकप्रतिनिधींची याबाबतची अनास्था नजरेत भरणारी आहे. अनेक सदस्य तर जिल्हा परिषदेकडेही फिरकलेले नाहीत, मग उपायांची सूचना किंवा पाठपुरावा कसा होणार? निसर्गानेच उभ्या केलेल्या अडचणींबाबत एका मर्यादेपलीकडे फार काही करता येत नाही हे खरे असले तरी, अशी होरपळ होत असताना ग्रामस्थांसोबत उभे राहिलेले दिसणेही त्यांच्या वेदनेवर फुंकर घालणारे ठरते. पण तेवढे सौजन्यही दाखविले जाताना दिसत नाही हे दुष्काळी स्थितीपेक्षाही दुर्दैवी आहे.विद्यमान राज्य सरकारने सत्तेत आल्या आल्या जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून दुष्काळी स्थितीवर मात करण्यासाठी शाश्वत कामाचा मोठा गाजावाजा केला. कोट्यवधी रुपये या कामांवर खर्च करण्यात आले. जिल्ह्यात गेल्यावर्षी सुमारे चार हजारापेक्षा अधिक कामे याअंतर्गत केली गेली, चालू वर्षी तर गेल्या तीन वर्षात केल्या गेलेल्या कामांपेक्षाही अधिक कामे हाती घेतली गेली आहेत, त्यामुळे पाण्याच्या साठवण क्षमतेत वाढ होणे अपेक्षित आहे. पण पाऊसच नसल्याने अडचण झाली आहे. अर्थात, प्रारंभात केली गेलेली कामे कितपत उपयोगी ठरलीत याचा आढावा घेतला जाणे गरजेचे आहे, अन्यथा जलशिवारचा पांढरा हत्ती ठरण्याची शक्यता नाकारता येऊ नये. कारण, धोरण चुकीचे नाही; परंतु अंमलबजावणीत होणारे गोंधळ उद्दिष्टपूर्तीत अडथळे आणणारेच ठरतात हा आजवरचा अनुभव आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी तोंडावर धरलेले बोट त्याच दृष्टीने आश्चर्याचे आहे.

टॅग्स :droughtदुष्काळWaterपाणीElectionनिवडणूकDamधरणSharad Pawarशरद पवारGirish Mahajanगिरीश महाजन