शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
3
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अॅक्शन मोडवर, अॅडव्हायजरी जारी
4
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
5
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
6
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
7
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
8
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
9
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
10
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
11
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
12
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
13
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
14
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
15
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
16
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
17
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
18
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
19
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
20
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू

जिल्ह्यातील चारच तालुक्यांत दुष्काळ जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2018 2:11 AM

राज्य सरकारने राज्यातील १५१ तालुके दुष्काळी जाहीर केले असून, त्यात नाशिक जिल्ह्णातील फक्त चार तालुक्यांमध्येच गंभीर दुष्काळ असल्याचे तर चार तालुके मध्यम दुष्काळी असल्याचे जाहीर केले आहेत. कायम टंचाईसदृश तालुके म्हणून गणल्या जाणाऱ्या येवला, चांदवडसह अन्य पाच तालुक्यांना त्यातून डावलण्यात आल्याने शेतकºयांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

नाशिक : राज्य सरकारने राज्यातील १५१ तालुके दुष्काळी जाहीर केले असून, त्यात नाशिक जिल्ह्णातील फक्त चार तालुक्यांमध्येच गंभीर दुष्काळ असल्याचे तर चार तालुके मध्यम दुष्काळी असल्याचे जाहीर केले आहेत. कायम टंचाईसदृश तालुके म्हणून गणल्या जाणाऱ्या येवला, चांदवडसह अन्य पाच तालुक्यांना त्यातून डावलण्यात आल्याने शेतकºयांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.  यंदा जिल्ह्णात ८३ टक्केच पाऊस झाला असून, अनेक तालुक्यांकडे पावसाने पाठ फिरविल्यामुळे शेतकºयांचे खरीप पीक हातचे गेले. ग्रामीण भागात पिण्याचे पाणी व जनावरांच्या चाºयाचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे यंदा दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याचे खुद्द राज्य सरकारनेच मान्य केले आहे. दुष्काळ जाहीर करण्याबाबत केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या नियमावलीच्या आधारे राज्याच्या कृषी विभागाने तयार केलेल्या ‘एमआरसॅक’ या प्रणालीच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यात पडलेला पाऊस, जमिनीतील आर्द्रता, पीक परिस्थितीचा विचार करून दुष्काळी परिस्थिती दिसणाºया तालुक्यांची यादी जाहीर केली होती. त्यात जिल्ह्णातील बागलाण, देवळा, इगतपुरी, मालेगाव, नांदगाव, नाशिक व सिन्नर या सात तालुक्यांमध्ये गंभीर स्वरूपाचा दुष्काळ असल्याचे तर चांदवड तालुक्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ असल्याचे जाहीर केले होते. या सर्व तालुक्यांमध्ये दुष्काळ ठरविण्याचा अंतिम व तिसरा निष्कर्ष काढण्यासाठी पीक पाहणी सर्वेक्षण म्हणजेच अप्रत्यक्ष पीक कापणी प्रयोगाने उत्पादन ठरविण्याच्या सूचना कृषी, महसूल विभागाला दिल्या गेल्या होत्या. त्यानुसार कृषी, महसूल व ग्रामविकास विभागामार्फत जिल्ह्णातील आठही तालुक्यांच्या दहा टक्के गावांमध्ये पीक सर्वेक्षण मोहीम राबविण्यात आली. त्यात प्रत्यक्ष शेतात भेट देऊन पीक कापणी प्रयोगासारख्या पिकांच्या संभावित उत्पादनाचा अंदाज बांधण्यात आला. त्यानुसार मालेगाव, नांदगाव, बागलाण व सिन्नर या चार तालुक्यांतील पीक परिस्थिती अतिशय गंभीर असल्याचे निदर्शनास आले तर नाशिक, इगतपुरी, देवळा व चांदवड या तालुक्यातील पीक परिस्थिती समाधानकारक असल्याचा निष्कर्ष काढण्यात येऊन तसा अहवाल पाठविण्यात आला होता. त्याच आधारे सरकारने बागलाण, मालेगाव, नांदगाव व सिन्नर या चार तालुक्याला गंभीर स्वरूपाचा दुष्काळ तर देवळा, इगतपुरी, नाशिक व चांदवड या चार तालुक्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करून जिल्हाधिकाºयांना उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत.येवला, चांदवड तालुक्यावर अन्यायराज्य सरकारने दुष्काळसदृश तालुक्यांची घोषणा करताना येवला, निफाड, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, कळवण या तालुक्यांना वगळल्याने जिल्ह्णात मोठी नाराजी व्यक्त करण्यात आली होती. सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात ठिकठिकाणी मोर्चे, रास्ता रोको आंदोलनही करण्यात आले. येवला व निफाड तालुक्याला वगळल्याने माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून लक्ष वेधले असता, सरकार पथक पाठवून पुन्हा तालुक्यांची पाहणी करणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते; परंतु प्रत्यक्षात तसे काहीच न होता, येवला या कायम टंचाईग्रस्त तालुक्याला दुष्काळ घोषित करण्यापासून वगळण्यात आले आहे.

टॅग्स :droughtदुष्काळNashikनाशिक