शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा करताना दुजाभाव

By admin | Updated: October 23, 2016 22:52 IST

नागरिकांमध्ये संताप : ग्रामीण भागात सुरळीत, शहरात अडचण

नांदगाव : नांदगाव शहरास पाणीपुरवठा करताना जिल्हा परिषदेचा पाणीपुरवठा विभाग जाणूनबुजून शहरास वेठीस धरत असल्याचा प्रकार उघडकीस आल्याने नागरिकांमध्ये चीड निर्माण झाली आहे. गुरुवार, दि. २० आॅक्टो. रोजी सुरू करण्यात येणारे आवर्तन शनिवार उजाडला तरीही सुरू झाले नाही. जलवाहिनी लिक झाल्याने पाणीपुरवठा लांबणीवर पडल्याचे कारण जि. प.च्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आले. म्हणून नगरपरिषदेचे पुरवठा निरीक्षक राजू गरुड गिरणा योजनेच्या न्यू पांझण येथील जलशुद्धीकरण यंत्रणेकडे काही कर्मचाऱ्यांबरोबर गेले. तेव्हा तिथल्या पंपाद्वारे ग्रामीण भागाला पाणीपुरवठा सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. जलवाहिनीची गळती सुरू असेल तर पंप कसे सुरू आहेत याची विचारणा करणाऱ्या गरुड यांना तेथील कर्मचारी कासारे यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली. जि.प. पाणीपुरवठा योजनेचे शाखा अभियंता बोरसे यांनी जलवाहिनी लीक असल्याने नांदगाव शहरास उशिराने पाणीपुरवठा सुरू होईल असे गरुड यांना सांगितले होते. यामुळे जिल्हा परिषदेचा पाणीपुरवठा विभाग मुद्दाम असे करत असल्याची तक्रार गरुड यांनी दिली.  जिपच्या पाणी पुरवठा विभागाकडून नेहमीच सबब पुढे करुन उशीराने पाणी पुरवठा केला जातो. त्याची कारणे खंडित वीज पुरवठा ,पाईप लाईनची गळती अशी देऊन नांदगावकरांना गप्प केले जाते. गरुड यांच्या गिरणा भेटीमुळे जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने यापूर्वी पुढे केलेल्या कारणांवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. (वार्ताहर)