शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
3
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
4
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
5
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
6
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
7
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
8
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
9
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
10
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
11
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
12
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
13
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
14
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
15
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
16
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
17
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
18
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
19
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
20
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल

सोयाबीन वायदे बाजारावर बंदी नकाे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 1:33 AM

जागतिक बाजारात तेलबियांचा तुटवडा असल्यामुळे सोयाबीनचे दर वाढले असले, तरी भाव नियंत्रित करण्यासाठी केंद्र शासनाने सोयाबीनच्या वायदे बाजारावर बंदी घालू नये, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे. 

ठळक मुद्देशेतकरी संघटनेची मागणी : सेबीच्या अध्यक्षांना पाठवले निवेदन

नाशिक :   जागतिक बाजारात तेलबियांचा तुटवडा असल्यामुळे सोयाबीनचे दर वाढले असले, तरी भाव नियंत्रित करण्यासाठी केंद्र शासनाने सोयाबीनच्या वायदे बाजारावर बंदी घालू नये, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे.  शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी या संदर्भात सेबीचे अध्यक्ष अजय त्यागी यांना ई-मेलद्वारे पाठवलेल्या  निवेदनात म्हटले आहे,    मागील हंगामात निकृष्ठ बियाणे व अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी १०० टक्के  नुकसान झाले असले, तरी सरासरी ३० ते  ३५ टक्के  नुकसान झालेले आहे. वाढीव दरामुळे शेतकर्‍यांचा मोठा फायदा होणार नाही, फक्त झालेले नुकसान भरून निघेल.सोयाबीन प्रक्रिया उद्योग लॉबीकडून सोयाबीनचा वायदे बाजार बंद करण्याचे दडपण सरकारवर येत असले, तरी शेतकरीहित लक्षात घेऊन वायदे बाजारावर बंदी घालणे फायदेशीर ठरणार नाही. वायदे बाजारावर बंदी घातल्यास कच्चा माल स्वस्तात मिळेल व काही प्रक्रिया उद्योगांना अवाजवी नफा कमवण्याची संधी मिळेल. वायदे बाजार बंद केल्यास सोयाबीनच्या किमती कोसळतील व शेतकर्‍यांना तोटा सहन करावा लागेल. बंदी घालून भाव पडल्यास शेतकरी तेलबियांच्या पिकांकडे आकर्षित होणार नाहीत व देशापुढे पामतेल आयात करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशारा मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.सोया पेंडीला मागणीचीनकडून अमेरिकेतील सोयाबीनला मोठी मागणी आहे. तसेच कोविडच्या  पार्श्वभूमीवर अनेक देशांनी आपल्या देशातून निर्यात होणार्‍या तेलावर बंदी घातली आहे किंवा निर्यात शुल्क वाढवले आहे. भारतातील सोयाबीन नॉन जी एम असल्यामुळे भारतातील सोया पेंडीला बर्‍याच देशात चांगली म‍ागणी आहे. 

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती