शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

‘थॅलेसेमिया’च्या लढ्यात एकटे समजू नका :  विजी व्यंकटेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 00:42 IST

थॅलेसेमिया असो की कॅन्सर अशा कुठल्याही दुर्धर आजाराशी लढा देताना कधीही स्वत:ला एकटे समजू नये. आपण एकाकीपणे या आजाराशी झुंज देत आहोत, असा गैरसमज मनातून काढून टाकावा. समाजातील संवेदनशील मनाचे अनेक हात मदतीसाठी उभे आहेत, असे प्रतिपादन मॅक्स फाउण्डेशनच्या विभागप्रमुख व ‘बिर्इंग ह्युमन’च्या विश्वस्त विजी व्यंकटेश यांनी केले.

नाशिक : थॅलेसेमिया असो की कॅन्सर अशा कुठल्याही दुर्धर आजाराशी लढा देताना कधीही स्वत:ला एकटे समजू नये. आपण एकाकीपणे या आजाराशी झुंज देत आहोत, असा गैरसमज मनातून काढून टाकावा. समाजातील संवेदनशील मनाचे अनेक हात मदतीसाठी उभे आहेत, असे प्रतिपादन मॅक्स फाउण्डेशनच्या विभागप्रमुख व ‘बिर्इंग ह्युमन’च्या विश्वस्त विजी व्यंकटेश यांनी केले.  अर्पण थॅलेसेमिया सोसायटी व एच.सी.जी. मानवता कॅन्सर सेंटरच्या संयुक्त विद्यमाने थॅलेसेमियाग्रस्त बालक व त्यांच्या पालकांसाठी आयोजित ‘दिवाळी मेळा’ व ‘बोन मॅरो ट्रान्सप्लान्ट’ केंद्राच्या शुभारंभप्रसंगी बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर अभिनेत्री शिल्पा शिंदे, डॉ. राज नगरकर, अर्पण सोसायटीचे अध्यक्ष नरेंद्र शाह, सचिव नंदकिशोर तातेड, डॉ. अतुल जैन, डॉ. गिरीश बदारखे, डॉ. नीलेश वासेकर आदी उपस्थित होते. या केंद्रात भौतिक व वैद्यकीय अद्ययावत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या केंद्रात सात ते दहा खाटा असून, कें द्रात बदारखे, वासेकर हे तज्ज्ञ डॉक्टर थॅलेसेमियाग्रस्त बालकांवर मोफत उपचार करणार असल्याचे यावेळी नगरकर यांनी सांगितले. यावेळी शिल्पा शिंदे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले, बॉलिवूडमध्ये सगळेच ‘हिरो’ असतात असे नाही तसेच वैद्यकीय क्षेत्रातदेखील सगळेच डॉक्टर ‘हिरो’ नसतात. जे समाजाच्या संवेदनांची जाणीव ठेवून वैद्यकीय पेशासोबत प्रामाणिक राहून कर्तव्य बजावतात तेच खरे ‘हीरो’ ठरतात. थॅलेसेमिया हा आजार रक्ताशी संबंधित असून, यासाठी मी रक्तदान वेळोवेळी करण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी माझ्या रक्ताची मात्रा अधिक चांगली टिकवून ठेवण्याकरिता मी योग्य व पौष्टिक आहार व व्यायामावर भर देत असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, शिंदे, व्यंकटेश यांचे स्वागत थॅलेसेमियाग्रस्त बालकांच्या हस्ते करण्यात आले. उच्चशिक्षण घेत यशोशिखर सर करणाऱ्या थॅलेसेमियाग्रस्त विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. प्रास्ताविक नगरकर यांनी केले.अत्याचाराविरुद्ध वेळीच आवाज उठवावा : शिंदेअन्याय-अत्याचाराविरुद्ध वर्षानुवर्षे गप्प राहून त्यानंतर ‘मी-टू’सारख्या चळवळीचा जन्म होण्याची प्रतीक्षा करणे योग्य नाही. अन्याय व अत्याचाराविरुद्ध वेळीच आवाज उठविणे गरजेचे आहे. समाजाच्या विकासासाठी ‘मी-टू’ चळवळ राबविली गेली पाहिजे. समाजातील विविध घटकांना मदतीच्या हातांची गरज आहे, त्याचा विचार करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.

टॅग्स :docterडॉक्टरNashikनाशिक