शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
14
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
15
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
16
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
17
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
18
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
19
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार

मिसळच्या तर्रीत गेली आरोपांची मटकी बुडून...

By किरण अग्रवाल | Published: May 05, 2019 12:07 AM

निवडणुकीच्या प्रचारात विकासाची चर्चा न करता एकमेकांवर व्यक्तिगत आरोप-प्रत्यारोप करणारे उमेदवार व विविध पक्षीय नेत्यांनी मिसळ पार्टीसाठी एकत्र येत अराजकीय मैत्रीचा नवा पॅटर्न घडवून आणला, हे बरेच झाले; पण त्यातून संबंधितांनी प्रचारादरम्यान जे काही म्हटले ते राजकीय जुमलेबाजीचाच भाग होता हे मात्र स्पष्ट व्हावे. अशा जुमल्यांवर भविष्यात कुणी कसा विश्वास ठेवावा ?

ठळक मुद्देझाले गेले विसरून उमेदवार व पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येत घडविला नवीन पॅटर्नमग कार्यकर्त्यांनी तरी का डोकेफोड करायची ? राजकीय आरोप करूनही मैत्रीपूर्ण संबंध अराजकीय मैत्रीचा नवा नाशिक पॅटर्न घडून येऊ पाहतोय.

सारांश

निकाल अजून लागायचा आहे, त्यामुळे मतदानोत्तर आडाखे-अंदाज व आकडेमोड जोरात सुरू आहेच; पण त्याचसोबत परस्परांविरोधात टोकाचे आरोप-प्रत्यारोप करीत निवडणूक लढलेले उमेदवार ‘मिसळ पार्टी’ साठी एकत्र आलेले बघावयास मिळाल्याने अराजकीय मैत्रीचा नवा नाशिक पॅटर्न घडून येऊ पाहतोय. अर्थात, निवडणुकांतले द्वंद्व मतदानानंतर विसरून जायचे असते व हातात हात घालून विकासाकडे लक्ष द्यायचे असते हे खरेच; परंतु मोठ्या अहमहमिकेने लढलेले नेते जेव्हा अशा सामीलकीचा प्रत्यय आणून देतात तेव्हा त्यांच्यासाठी म्हणून आपसात वैर करून बसलेल्या कार्यकर्ते वा समर्थकांची मोठी अडचण होऊन गेल्याशिवाय राहत नाही. नाशकातही तेच होताना दिसत आहे.

यंदाच्या निवडणूक प्रचारात विकासाच्या चर्चेपेक्षा व्यक्तिगत आरोप-प्रत्यारोपांचीच राळ मोठ्या प्रमाणात उडालेली दिसली. यातही सोशल मीडियातून प्रचाराला ऊत आलेला असल्याने नेत्यांमधील जाहीर आरोपांखेरीज समर्थकही मोठ्या हिरिरीने आपल्या उमेदवारासाठी व पक्षाकरिता लढताना दिसत होते. त्यातून उगाच व्यक्तिगत टीका-टिप्पणी करून बसलेले काही जण निवडणुकीपूर्वीच ठोकलेही गेलेत. तात्पर्य, नेत्यासांठी किंवा उमेदवारांसाठी कार्यकर्ते टोकाला जाऊन आपसात झुंजले, मार खाऊनही बसले तर अनेकजण विरोधकांच्या नजरेत भरून गेलेले आहेत. पण या राजकीय ‘हमरीतुमरी’ला चार दिवसही उलटत नाही तोच उमेदवार व पक्षप्रमुख एकत्र येत छानपैकी मिसळ पार्टी करताना दिसून आल्याने त्यांच्या परस्परांवरील आरोप-प्रत्यारोपांची मटकी मिसळच्या तर्रीत बुडुन गेली की काय, असा प्रश्न उपस्थित होऊन गेला आहे.

नाही तरी हल्ली राजकीय अभिनिवेश टोकाचे राहिलेले नाहीत कारण निष्ठेचा बाजार उठून गेला आहे. अशात राजकीय आरोप करूनही मैत्रीपूर्ण संबंध राखणे वेगळे आणि वैयक्तिक पातळीवर घसरून पुन्हा एकोपा प्रदर्शिणे वेगळे. मतदारांच्या धारणांना त्यातुन धक्के बसल्याखेरीज राहत नाही. उभयपक्षीयांत सलोखा हवाच, पण टोकाला जाऊन पुन्हा काही न झाल्यासारखे उसने प्रदर्शन घडून येते तेव्हा त्यातून कार्यकर्ते व मतदारांमध्ये आपली फसवणूक झाली की काय, अशी शंका घेतली जाण्यास संधी मिळून जाते. नाशकातील मिसळ पार्ट्यांकडे त्याचदृष्टीने बघता यावे.

विशेषत: अपक्ष उमेदवार माणिकराव कोकाटे यांनी आपण भुजबळांचे ‘मॅनेज’ उमेदवार असल्याचा आरोप खोडून काढताना उलट भुजबळांनीच हेमंत गोडसे यांची उमेदवारी शिवसेनेकडून मॅनेज केल्याचा आरोप केला होता, त्यामुळे मोठी चर्चा घडून आली होती. भाजपचे नेते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून ‘चौकीदार चोर है’चा घोषा विरोधकांकडून लावला गेल्याने या पक्षाचे नेते-कार्यकर्ते संतप्त होते. तर समीर भुजबळ यांच्यावरील आरोपांची उजळणी करीत जेलमध्ये जाणाऱ्यांना निवडून पाठविणार का, असा प्रश्न खुद्द मुख्यमंत्र्यांनी केला होता; पण ती सर्व राजकीय जुमलेबाजीच होती, हे या मिसळ पार्टीवरून स्पष्ट व्हावे. कारण, कोण कुणाला मॅनेज झाले हे नक्की सांगता येणार नसले तरी कोकाटे व भुजबळ दोघे सोबत मिसळवर ताव मारताना दिसले, तर निवडून देण्यासाठी जे भुजबळ भाजपला चालणार नव्हते ते सोबत मिसळ खायला मात्र भाजपच्याच आमदार सीमा हिरे व अन्य पदाधिकाऱ्यांना चालले; त्यामुळे नेत्यांची ही मिलीभगत पाहून त्यांचे कार्यकर्तेच बिचारे वेड्यात निघणे स्वाभाविक ठरले.

अर्थात, कार्यकर्तेही आता सुजाण झाले आहेत. तेव्हा खुद्द उमेदवार व नेत्यांनी एकत्रित येत मिसळ पार्टी केली म्हटल्यावर दुसºयाच दिवशी कार्यकर्त्यांच्या फळीनेही तसाच घाट घातला व ‘हम भी कुछ कम नही’चाच संकेत दिला. म्हटले तर हा उपक्रम चांगलाच झाला. राजकीय रागलोभ बाजूला सारत समन्वयवादी सामीलकीची पायवाटच जणू संबंधितांनी घालून दिली; पण हे चित्र कायम टिकून राहणार आहे का? तेव्हा, कार्यकर्त्यांनीच नव्हे तर मतदारांनीही या ‘पॅटर्न’पासून कुणाशीही उगाच न भिडण्याचा बोध घेण्याचीच गरज आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणSameer Bhujbalसमीर भुजबळShiv SenaशिवसेनाBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस