शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
3
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
4
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
5
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
6
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
7
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
8
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
9
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
10
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
11
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
12
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
13
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
14
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
15
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
16
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
17
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
18
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
19
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
20
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर

भातपिकावर रोगांचे आक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 7:11 PM

वाडीवºहे : इगतपुरी तालुक्यातील खरीप हंगामातील भातपिकावर दिवसेंदिवस विविध रोगांचे आक्रमण होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. भातावर मावा, करपा पडला असून, विमा कंपन्यांनी याची दखल घेऊन तत्काळ विमे मंजूर करून भरपाईची रक्कम देण्याची मागणी इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांमधून होत आहे.

ठळक मुद्देशेतकरी हवालदिल : विमा कंपन्यांनी भरपाई देण्याची मागणी

वाडीवºहे : इगतपुरी तालुक्यातील खरीप हंगामातील भातपिकावर दिवसेंदिवस विविध रोगांचे आक्रमण होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. भातावर मावा, करपा पडला असून, विमा कंपन्यांनी याची दखल घेऊन तत्काळ विमे मंजूर करून भरपाईची रक्कम देण्याची मागणी इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांमधून होत आहे.मागील वर्षीच्या आॅक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात म्हणजेच भात सोंगणीचा हंगाम संपल्यानंतरही परतीचा अवकाळी पाऊस बरसतच होता. मागील वर्षीच्या सुरुवातीलाही भातरोपांची दुबार पेरणी करावी लागली होती. अतिवृष्टीचे प्रमाण इतके होते की, शेतात लावणी केलेले भातपीक अक्षरश: वाहून गेले. या अतिवृष्टीच्या तडाख्यातून बचावलेले भातपीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी अपार मेहनत घेतली; मात्र ऐन निसवण्याच्या कालावधीपासूनच भातावर करपा, मावा, तुडतुडे आदी रोगांनी आक्र मण केले व त्यातून भातपिकाची मोठी नासाडी झाली होती. २००९ मध्ये बिगरमोसमी पावसाने १७ हजार ३४३ शेतकºयांच्या पिकांचे नुकसान झाले होते. त्यात सर्वाधिक नुकसान भाताचेच होते. २०१० मध्येही अवकाळी पाऊस झाला. त्यात एकूण दहा हजार ८६३.६३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. त्यातही सर्वाधिक नऊ हजार ८६१.७६ हेक्टर इतके भाताचे क्षेत्र होते, तर २०११ मध्ये करपा रोगाने चार हजार हेक्टर भातपिकाचेच नुकसान झाले होते. याहीवर्षी वेळेत पाऊस न झाल्याने भातपिकांचे रोपे वाया गेल्याने दुबार पेरणी करून, कोरोनाच्या महामारीत दुप्पट लागवड खर्च करून भातपिकांची लागवड केली. आता ऐन निसवण्याच्या मोसमातच करपा, मावा, तुडतुडे या रोगांसह भेसळयुक्त बियाणं यामुळे भाताचे उत्पन्न घटण्याची भीती शेतकºयांमधून व्यक्त होत आहे. विमा कंपन्यांनी याची दखल घेत शासनाने रोगराईला बळी पडलेल्या पिकांचा पंचनामा करावा व विमे मंजूर करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.महागडे बियाणे, खते, लागवड खर्च व मेहनत करूनही भातपिकावर गंडांतर येत आहे. शासनाने रोगाला बळी पडलेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश देऊन रोगाला बळी पडलेल्या भातपिकांची विमा कंपन्यांनीही दखल घेत पिकविमे मंजूर करावे.- विठोबा दिवटे, शेतकरी, नांदूरवैद्य. 

 

 

 

 

 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी