शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
3
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
4
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
5
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
6
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
8
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
9
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
10
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
11
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
12
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
13
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
14
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
15
‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
16
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
17
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
18
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
19
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
20
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 

नियतीची निर्दयी खेळी, एकाच कुटुंबातील पाच जणांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 18:36 IST

नाशिक : नियती कधी-कधी किती क्रूर होऊन जाते, हे येवला तालुक्यातील राजापूर येथे हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेने अधारेखित झाले आहे. राजापूरमधील जाधव कुटुंबीयांतील पाच जणांचा एकाच सप्ताहात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अंगावर शहारे आणणाऱ्या या दु:खद घटनेने अवघे राजापूर गाव सुन्न झाले आहे.

ठळक मुद्देनाशिक जिल्ह्यातील घटना : राजापुरात आठवडाभरात जाधव कुटुंबावर आघात

नाशिक : नियती कधी-कधी किती क्रूर होऊन जाते, हे येवला तालुक्यातील राजापूर येथे हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेने अधारेखित झाले आहे. राजापूरमधील जाधव कुटुंबीयांतील पाच जणांचा एकाच सप्ताहात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अंगावर शहारे आणणाऱ्या या दु:खद घटनेने अवघे राजापूर गाव सुन्न झाले आहे.राजापूर येथील स्वस्त धान्य दुकानदार अरुण माधवराव जाधव यांच्या आई मालनबाई माधवराव जाधव या आजारी असल्याने त्यांच्या दोन बहिणी मुंबई येथून आईला भेटण्यासाठी राजापूर येथे आल्या होत्या. मात्र, त्यांना त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले. त्यानंतर जाधव यांच्या कुटुंबात एकेकाला त्रास जाणवायला सुरुवात झाली. तेथून नियतीचा खेळ सुरू झाला आणि सप्ताहभरातच जाधव कुटुंबीयांतील स्वतः अरुण जाधव, मुलगा अमित जाधव, आई मालनबाई जाधव आणि अरुण जाधव यांच्या दोन बहिणी शोभा सातदिवे व छाया वाघ यांचा एकापाठोपाठ मृत्यू झाला. सप्ताहभरातच जाधव कुटुंबीयांतील पाच सदस्य इहलोक सोडून गेल्याने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. मागील वर्षीच अरुण जाधव त्यांच्या पत्नीचे निधन झाले. त्या दुःखातुन सावरत नाही तोच एकाच कुटुंबातील पाच जण दगावल्याची घटना घडली. या घटनेने राजापूर गाव सुन्न आणि नि:शब्द झाले आहे.दिव्यांग मुलाच्या भवितव्याचा प्रश्नजाधव यांना एक मतिमंद मुलगा असून, या दुर्दैवी घटनेमुळे या मुलाचा संगोपन करण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अरुण जाधव यांच्या कुटुंबातील कर्ता मुलगा अमित जाधव हाच एकमेव या कुटुंबाचा आधार होता. मात्र नियतीने अमितच्याही पत्नी व मुलाच्या भवितव्याचा प्रश्न उभा केला आहे. अमित यास पत्नी व लहान मुलगा असून, त्याचा दिव्यांग असलेल्या लहान भावाचीही जबाबदारी तो सांभाळत होता. या घटनेने राजापूर गावात हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :Deathमृत्यूhospitalहॉस्पिटल