शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
8
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
9
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
10
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
11
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
12
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
13
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
14
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
15
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
16
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
17
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
18
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
19
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
20
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल

शहरात डेंग्यूसदृश रुग्ण आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 12:14 AM

पावसाळ्याच्या तोंडावर साथीच्या रोगांची लागण रोखण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने प्रयत्न केले जात असल्याचा दावा केला जात असला तरी, प्रत्यक्षात पंचवटीतील हिरावाडी व इंदिरानगर परिसरातील पांडवनगरी या ठिकाणी डेंग्यूसदृश रुग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नाशिक : पावसाळ्याच्या तोंडावर साथीच्या रोगांची लागण रोखण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने प्रयत्न केले जात असल्याचा दावा केला जात असला तरी, प्रत्यक्षात पंचवटीतील हिरावाडी व इंदिरानगर परिसरातील पांडवनगरी या ठिकाणी डेंग्यूसदृश रुग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महापालिकेने तातडीने या भागांमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.  गेल्या दहा दिवसांत वडाळागावात सांधेदुखी व विषाणू तापाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे पाहून महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्वच्छता मोहीम राबविली तसेच डासांची उत्पत्ती होणारी ठिकाणे शोधली असता ४६ घरांमध्ये एडिस डासाची उत्पत्ती आढळून आली.  त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने औषध व धूर फवारणी करून डासांची उत्पत्ती नष्ट करण्याचा प्रयत्न युद्धपातळी चालविला असतानाच पांडवनगरी परिसरात दोन डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. पांडवनगरी परिसरात सुमारे ८० इमारती असून, दोन इमारतींदरम्यान मोठ्या प्रमाणात गाजर गवत व केरकचऱ्यामुळे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. तसेच काही ठिकाणी भूमिगत गटारींचे आणि शौचालयाच्या टाकीतील घाण बाहेर डबक्याच्या स्वरूपात साचले असल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. तातडीने आरोग्य विभागाने संबंधित मिळकतधारकांवर कारवाई करण्याची मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहेहिरावाडीत नागरिक भयभीतपंचवटी मलेरिया विभागाच्या वतीने संपूर्ण परिसरात नियमितपणे औषध व धूरफवारणी केल्याचा दावा केला जात असताना हिरावाडीतील (भगवतीनगरला) डेंग्यूसदृश आजाराचे दोन संशयित रुग्ण आढळून आल्याने मनपा प्रशासनाने केलेला दावा फोल ठरला आहे. डेंग्यूसदृश आजाराचे आढळलेले संशयित रुग्ण हे एकाच घरातील असून, ते कोणा एका अधिकाºयाचे नातेवाईक असल्याने खडबडून जागे झालेल्या मनपा प्रशासनाने तत्काळ रुग्ण आढळलेल्या संबंधित ठिकाणी जाऊन परिसरात साफसफाई मोहीम राबविली. तसेच ज्या घरात रुग्ण आढळले आहेत त्या रुग्णांचे रक्त नमुने घेण्यात येऊन ते प्रयोगशाळेत पाठविल्याचे समजते. परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, मनपाच्या संबंधित विभागाकडून केवळ मोजक्याच ठिकाणच्या भागात औषध व धूरफवारणी केली जात असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :dengueडेंग्यू