शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पाण्याची गळती रोखण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:10 IST

----- चंदनपुरीत गोंधळाच्या कार्यक्रमांना गर्दी मालेगाव : उत्तर महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या श्री खंडोबा महाराजांच्या चंदनपुरीत भाविकांची गर्दी होत आहे. ...

-----

चंदनपुरीत गोंधळाच्या कार्यक्रमांना गर्दी

मालेगाव : उत्तर महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या श्री खंडोबा महाराजांच्या चंदनपुरीत भाविकांची गर्दी होत आहे. सध्या लग्नसराईची धामधूम सुरू झाली आहे. यामुळे गोंधळाचे कार्यक्रम व दिवट्या-बुधल्या करण्यासाठी भाविक चंदनपुरीत दाखल होत आहेत. परिणामी चंदनपुरीतील आर्थिक उलाढाल वाढली आहे.

-----

माळमाथा भागात विजेचा लपंडाव

मालेगाव : तालुक्यातील माळमाथा भागात वीज वितरण कंपनीकडून भारनियमन केले जात आहे. विजेच्या लपंडावामुळे रब्बी पिकांसह लागवडीस अडचणी निर्माण झाल्या आहेत. सध्या शेती शिवारातील विहिरींना मुबलक पाणी आहे. मात्र विजेअभावी पिकांना पाणी देता येत नाही. शेतकऱ्यांची कोंडी होत आहे.

-----

मालेगावी सर्रास गुटखा विक्री

मालेगाव : शहर व तालुक्यात सर्रास गुटखा विक्री केली जात आहे. राज्यात गुटखाबंदी असताना मालेगावी सर्रास पान दुकानांवर गुटखा विक्री केली जात आहे. याकडे पोलीस व अन्न व औषध प्रशासन विभागाने सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केले आहे. गुटखा विकणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.

-----

दहीकुटेत पाणी सोडण्याची मागणी

मालेगाव : तालुक्यातील दहीकुटे धरण पावाळ्यात १०० टक्के भरले होते; मात्र सद्य:स्थितीत धरणातील जलसाठा कमी झाला आहे. मोसममाळ कालवा व खडकी बंधाऱ्यातून दहीकुटे धरणात पाणी सोडल्यास जलसाठ्यात वाढ होणार आहे. परिणामी उन्हाळ्यात पाण्याची टंचाई या भागाला जाणवणार नाही. पाटबंधारे विभागाने धरण पूर्णक्षमतेने भरून द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

-----

पेट्रोलच्या दरवाढीमुळे वाहनधारक त्रस्त

मालेगाव : पेट्रोलचे दर गगनाला भिडले आहेत. शहरात पेट्रोलचे दर ९०.८८ रुपयांवर गेले आहेत. दोन वर्षानंतर पुन्हा एकदा दरवाढ झाल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. पेट्रोल व डिझेलचे दर वाढल्याने इतर वस्तूंच्या किमतीही वाढण्याची शक्यता आहे. पेट्रोल दरवाढीचा सर्वसामान्य नागरिकांना फटका बसला आहे.

----

नुकसानग्रस्तांना भरपाईची मागणी

मालेगाव : शहरालगतच्या द्याने भागात आगीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. संसारोपयोगी साहित्यासह कागदपत्रे जळून खाक झाले आहेत. या कुटुंबांना शासकीय मदत देऊन नवीन कागदपत्रे तयार करून द्यावी, अशी मागणी मालेगाव आवामी पार्टीचे अध्यक्ष रिजवान बॅटरीवाला यांनी प्रांताधिकारी विजयानंद शर्मा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

-----

शांतता समिती होणार नव्याने गठित

मालेगाव : शहर शांतता समिती व मोहल्ला कमिटी नव्याने गठित करण्याच्या सूचना शासनाकडून प्राप्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीस ठाण्यांकडून स्वच्छ प्रतिमेच्या व्यक्तींची माहिती संकलित केली जात आहे. गुन्हे दाखल असलेल्या सदस्यांना समितीतून वगळण्यात येणार आहे. सण, उत्सव व तणावग्रस्त परिस्थितीत शांतता समितीचे सदस्य जनतेशी व प्रशासनात समन्वय साधण्याचे काम करणार आहेत.

-----

सुकामेव्याला वाढती मागणी

मालेगाव : शहर व परिसरात थंडीचे प्रमाण वाढले आहे. परिणामी बाजारपेठेत सुकामेव्याला मागणी वाढली आहे. हिवाळ्यात पोषक आहार म्हणून सुकामेवा खरेदी केला जात असतो. मेथीचे लाडू बनविण्यााठीदेखील सुक्यामेव्याचा वापर केला जातो. सुक्यामेव्याच्या किमतीत वाढ झाली आहे.

-----

गटारी साफसफाईची मागणी

मालेगाव : शहरातील गटारी तुडुंब भरल्या आहेत. गटारींचे सांडपाणी रस्त्यांवर येत आहेत. महापालिकेने माेठ्या नाल्यांबरोबरच लहान गटारींची स्वच्छता करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. महापालिकेच्या स्वच्छता विभागाकडून केवळ चौकांमधील गटारींची स्वच्छता केली जात आहे.