शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
2
"एलईडीच्या जमान्यात कंदील घेऊन फिरतायेत, तेही एकच घर उजळण्यासाठी…", नरेंद्र मोदींचा लालूंवर निशाणा
3
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
4
"तुम्ही तुमचे बघा, हस्तक्षेप खपवून घेणार नाही"; केजरीवालांनी पाकिस्तानी नेत्याला दाखवला आरसा
5
"मी आणि मिताली राज आम्ही दोघे...", Shikhar Dhawan चा मोठा खुलासा, म्हणाला...
6
"कोणताच मार्ग नव्हता, जीव वाचवण्यासाठी..."; 8 महिन्यांच्या गर्भवतीने 20 फुटांवरुन मारली उडी अन्...
7
VIDEO: भररस्त्यात गँगवॉर! शस्त्राने वार करत एकमेकांच्या अंगावर घातल्या गाड्या
8
पाकिस्तानच्या अडचणीत आणखी वाढ! पीठ, डाळींच्या किंमती वाढणार; IMF'ने मदत केली नाही
9
"कॉम्प्रोमाइज कर...", वयाच्या १७व्या वर्षी जुही परमारला करावा लागला होता कास्टिंग काउचचा सामना
10
हिंडेनबर्गच्या झटक्यातून बाहेर आली Adani ची 'ही' कंपनी, तोटा भरुन काढला; शेअर्समध्ये वाढ
11
दहावीच्या निकालासंदर्भात मोठी अपडेट! सोमवारी दुपारी लागणार निकाल, असा पाहा रिझल्ट
12
Ashish Shelar : "उद्धव ठाकरे लंडनच्या नालेसफाईची पाहणी करायला गेलेत का?"; आशिष शेलारांचा खोचक सवाल
13
Fact Check: अमित शाह म्हणाले की, निवडणुकीत गॅरंटी दिल्यानंतर मोदी विसरतात?; 'तो' Video अपूर्ण
14
Hardik Pandya Divorce: नताशाला ७०% संपत्ती अन् 'कंगाल' पांड्या; हार्दिकबद्दल का रंगतेय चर्चा?
15
'वर्षभरापासून मी बेरोजगार आहे कारण...' रत्ना पाठक शाहांनी सांगितलं सत्य
16
निवृत्त IAS अधिकाऱ्याच्या घरात चोरट्यांचा दरोडा, विरोध केल्याने पत्नीची हत्या
17
तुम्हीच ठरवा कोण जिंकतेय...! योगेंद्र यादवांच्या २६० च्या दाव्यावर प्रशांत किशोरांची प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Gold Rates Today : ३ दिवसांत सोनं ₹२००० नं झालं स्वस्त, पाहा २४ कॅरेट Goldचा आजचा भाव
19
Fact Check: मनोज तिवारींनी लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारला? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य
20
मराठमोळ्या देवदत्त नागेचं नशीब उजळलं, थेट राजामौलींच्या सिनेमात चमकणार!

खामखेडयातील टरबुजला परप्रांतात मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 5:21 PM

खामखेडा : देवळा तालुक्यातील खामखेडा गावाची ओळख आता कांदा, कोबी, टमाटे लाल व उन्हाळी कांदा या बरोबर आता खरबूज व टरबूज पीक उत्पादन घेणारे गाव म्हणून होवू लागली आहे. कारण खामखेडा येथील टरबूज, व खरबूज फळे खरेदीसाठी व्यापारी थेट शेतकऱ्यांच्या बंधावर येऊन लागला आहे.

ठळक मुद्देशेतकºयांचे श्रम, वेळ व पैशाची बचत होत आहे.

खामखेडा : देवळा तालुक्यातील खामखेडा गावाची ओळख आता कांदा, कोबी, टमाटे लाल व उन्हाळी कांदा या बरोबर आता खरबूज व टरबूज पीक उत्पादन घेणारे गाव म्हणून होवू लागली आहे. कारण खामखेडा येथील टरबूज, व खरबूज फळे खरेदीसाठी व्यापारी थेट शेतकऱ्यांच्या बंधावर येऊन लागला आहे.गेल्या काही वर्षा पासून आवकाळी पाऊस गारपिट आणि बदलते हवामान यामुळे कांदा, डाळीब आदी नगदी पिके धोक्यात सापडली आहेत. या परिसरातील शेतकरी डाळींब पिकांची मोठया प्रमाणात शेती करीत होता. त्याच्यातून त्याला चांगल्यापैकी उत्पादन येऊन मोठ्या प्रमाणात पैसा हाती येत असे. कांदा या पिकाकडे नगदी पिक म्हणून पाहिले जात असे. त्याच्यातूनही शेतकऱ्यांची चागली उलाढाल होत असे. परंतु गेल्या दोन-तीन वर्षापासून बेमौसमी आवकाळी पाऊस, गारपीट व बदलत्या हवामानाचा फटका त्यामुळे कांदा पिक धोक्यात आले आहे. चालु वर्षी उन्हाळी कांद्याचे उत्पादन चांगल्यापैकी आले .परंतु सध्या मात्र कवडीमोल भावाने विकला जात असल्याने कांदा पिकावर केलेला खर्चही भरून निघत नाही.खामखेडा परिसरात उन्हाळी हंगामात मिरची किंवा टमाटे पीक घेतले जात होते. परंतु गेल्या दोन वर्षांपासून कमी पाण्यात आता तरु ण शेतकरी टरबूज व खरबूज या पिकाकडे वळला आहे. उन्हाळ्यात विहिरींना कमी पाणी असते. तेव्हा आता ठिबक सिंचन व सुधारित पध्दतीचा अवलंब करून उन्हाळी हंगामात या वर्षी शेकडो शेतकरी खरबूज व टरबूज पिकाची करीत आहे. याही वर्षी शेकडो शेतकऱ्यांनी टरबूज व खरबूज पिकाची लागवड केली आहे. तेव्हा आता भरघोस उत्पादन असल्याने परप्रातिय व्यापारी आता शेतकºयाच्या बंधावर टरबूज पिकाची खरेदीसाठी येत आहे.सद्या टरबूज पिकाला सहा ते सात रु पये प्रति भाव मिळत आहे. एक टरबूज फळांचे वजन दोन ते दहा किलो पर्यत असते. तेव्हा एक टरबुजचे साधारण पंचवीस रु पये ते चाळीस रु पया मिळतात. हे टरबूज जोडण्यासाठी व गाडीत भरण्यासाठी माणसाची आवश्यकता असते. तेव्हा गावातील स्थानिक मजुरांना रोजगार उपलब्ध होत आहे. सद्या उन्हाळताचे दिवस आहे. उन्हाळ्यात टरबूज , खरबूज किंवा काकडी शरीरासाठी फार उपयोगी असते. मार्च महिन्याचे कडक ऊन पडत आहे. बाहेर पडणे मुश्किल झाले आहे. तेव्हा टरबुजला मोठ्या प्रमाणात मागणी असलंयाने परप्रतिय व्यापारी थेट टरबूज खरेदीसाठी शेतकºयांच्या बंधावर येऊ लागल्यामुळे शेतातच व्यवहार होवू लागल्याने शेतकºयांचे श्रम, वेळ व पैशाची बचत होत आहे.