पिकांचे पंचनामे करून भरपाईची मागणी

By Admin | Updated: May 9, 2014 23:08 IST2014-05-09T18:10:51+5:302014-05-09T23:08:57+5:30

येवला : बेमोसमी अवकाळी पाऊस व गारपिटीने नुकसान झालेल्या पिकांचे नुकसान होऊनदेखील प्रशासनाने पंचनामे केले नाही. पंचनामे त्वरित करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी येवला तालुका शिवसेनेच्या वतीने निवेदनाद्वारे केली आहे.

The demand for compensation by the crops of the crops | पिकांचे पंचनामे करून भरपाईची मागणी

पिकांचे पंचनामे करून भरपाईची मागणी

येवला : बेमोसमी अवकाळी पाऊस व गारपिटीने नुकसान झालेल्या पिकांचे नुकसान होऊनदेखील प्रशासनाने पंचनामे केले नाही. पंचनामे त्वरित करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी येवला तालुका शिवसेनेच्या वतीने निवेदनाद्वारे केली आहे.
शिवसेना तालुकाप्रमुख झुंजार देशमुख, शहरप्रमुख राजेंद्र लोणारी, उपजिल्हाप्रमुख वाल्मीक गोरे, रावसाहेब नागरे, गुड्डू जावळे यांच्यासह १२ पदाधिकार्‍यांच्या स्वाक्षर्‍या असलेले निवेदन नायब तहसीलदार खैरे यांना दिले आहे. या निवेदनात, नुकसानीचे पंचनामे अनेक ठिकाणी झाले नाही. प्रशासनाला वारंवार सांगूनदेखील कार्यवाही झाली नाही. एप्रिलअखेरच्या वादळानेही कांद्यासह चाळींचेही नुकसान झाले आहे.
तळवाडे येथील शेतकर्‍यांनी उपोषण करूनही पंचनामे केले गेले नाही. या मागणीसाठी मंगळवारी (दि. २०) येवला-विंचूर चौफुलीवर रास्ता रोको करणार असल्याचा इशाराही दिला आहे. नेऊरगाव-जळगाव नेऊर परिसरातील राहिलेले पंचनामे त्वरित करण्याचेही म्हटले आहे. दोन महिने उलटून गेले तरी अनेक गावांना नुकसानभरपाईदेखील मिळाली नाही. (वार्ताहर)
---

Web Title: The demand for compensation by the crops of the crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.